शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

भ्रष्ट जुमला पार्टीमुळे राज्यातील वातावरण गढूळ, रोहिणी खडसे यांचे जोरदार टीकास्त्र

By दीपक देशमुख | Updated: January 24, 2024 17:18 IST

शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास 

सातारा : राज्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून वातावरण गढूळ गेले आहे. त्यामुळे स्वकियांपेक्षा भविष्यात आमच्यासमोर या भ्रष्ट जुमला पार्टीचेच आव्हान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले.सातारा येथे राष्ट्रवादी भवनात महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रोहिणी खडसे आल्या होत्या. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, समिंद्रा जाधव, राजकुमार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, देशात व राज्यात भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. दबावतंत्राच्या या विचारधारेविरोधात राष्ट्रवादी खंबीरपणे उभा आहे. मोदी सरकारविराधोत खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दौरे सुरू असल्याचे खडसे म्हणाल्या.खडसे म्हणाल्या, माझी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचा दौरा केला आहे. यादरम्यान महागाई, बेरोजगारीमुळे महिलांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. अत्याचाराच्या घडल्या तरी कार्यवाही होत नाही. देशातही अशीच परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला मल्लांना पारितोषिक परत करावे लागणे, हे दुर्दैवी आहे.राष्ट्रवादी काँग्रेस महिलांमध्ये अंतर्गत वाद नाहीत. मतभेद असू शकतात. परंतु, मनभेद नाहीत. पक्षात मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हा पक्ष लोकशाहीनुसार चालतो. कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली जाते. इतर पक्षांमध्ये दबावतंत्र वापरले जाते, कार्यकर्त्याला बोलू दिले जात नाही, तशी परिस्थिती राष्ट्रवादीत नाही. गेल्या दहा वर्षाची आकडेवारी पाहता भाजपाच्या काळात सर्वात कमी महिला लोकप्रतिनिधी निवडून गेले आहेत. परंतु, राष्ट्रवादी पक्षातून जास्तीत जास्त संधी देण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याबाबत विचारले असता सुनील माने म्हणाले, मी अजित पवार यांच्यासमवेत अनेक वर्षे राजकारण केले आहे. तथापि, मी शरद पवार यांच्या विचारांचा कार्यकर्ता असून शेवटपर्यंत त्यांच्याच पाठीशी उभा राहणार आहे.

सायबांना सोडणारा निवडून येत नाहीसध्या राष्ट्रवादीतून अनेकजण पक्ष सोडून गेल्याबाबत विचारले असता रोहिणी खडसे म्हणाल्या, खासदार शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली, ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास आहे. २०१९मध्येही याची प्रचिती आली असल्याचे यावेळी खडसे म्हणाल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohini Khadseरोहिणी खडसेBJPभाजपा