शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट जुमला पार्टीमुळे राज्यातील वातावरण गढूळ, रोहिणी खडसे यांचे जोरदार टीकास्त्र

By दीपक देशमुख | Updated: January 24, 2024 17:18 IST

शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास 

सातारा : राज्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून वातावरण गढूळ गेले आहे. त्यामुळे स्वकियांपेक्षा भविष्यात आमच्यासमोर या भ्रष्ट जुमला पार्टीचेच आव्हान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले.सातारा येथे राष्ट्रवादी भवनात महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रोहिणी खडसे आल्या होत्या. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, समिंद्रा जाधव, राजकुमार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, देशात व राज्यात भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. दबावतंत्राच्या या विचारधारेविरोधात राष्ट्रवादी खंबीरपणे उभा आहे. मोदी सरकारविराधोत खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दौरे सुरू असल्याचे खडसे म्हणाल्या.खडसे म्हणाल्या, माझी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचा दौरा केला आहे. यादरम्यान महागाई, बेरोजगारीमुळे महिलांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. अत्याचाराच्या घडल्या तरी कार्यवाही होत नाही. देशातही अशीच परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला मल्लांना पारितोषिक परत करावे लागणे, हे दुर्दैवी आहे.राष्ट्रवादी काँग्रेस महिलांमध्ये अंतर्गत वाद नाहीत. मतभेद असू शकतात. परंतु, मनभेद नाहीत. पक्षात मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हा पक्ष लोकशाहीनुसार चालतो. कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली जाते. इतर पक्षांमध्ये दबावतंत्र वापरले जाते, कार्यकर्त्याला बोलू दिले जात नाही, तशी परिस्थिती राष्ट्रवादीत नाही. गेल्या दहा वर्षाची आकडेवारी पाहता भाजपाच्या काळात सर्वात कमी महिला लोकप्रतिनिधी निवडून गेले आहेत. परंतु, राष्ट्रवादी पक्षातून जास्तीत जास्त संधी देण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याबाबत विचारले असता सुनील माने म्हणाले, मी अजित पवार यांच्यासमवेत अनेक वर्षे राजकारण केले आहे. तथापि, मी शरद पवार यांच्या विचारांचा कार्यकर्ता असून शेवटपर्यंत त्यांच्याच पाठीशी उभा राहणार आहे.

सायबांना सोडणारा निवडून येत नाहीसध्या राष्ट्रवादीतून अनेकजण पक्ष सोडून गेल्याबाबत विचारले असता रोहिणी खडसे म्हणाल्या, खासदार शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली, ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास आहे. २०१९मध्येही याची प्रचिती आली असल्याचे यावेळी खडसे म्हणाल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohini Khadseरोहिणी खडसेBJPभाजपा