शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षसंवर्धनासाठी शिक्षकाची दोन दशकांची तपश्चर्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:52 IST

सातारा : तापमान वाढ, पावसाचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे झाडांची कमी झालेली संख्या, हे चित्र पालटून तसेच ...

सातारा : तापमान वाढ, पावसाचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे झाडांची कमी झालेली संख्या, हे चित्र पालटून तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रकाश कदम या शिक्षकाने गेल्या दोन दशकांपासून वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.कोरेगाव तालुक्यातील देऊर परिसर हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या परिसरात मागील वीस-तीस वर्षांपूर्वी बारमाही पाणी उपलब्ध होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. मात्र वसना नदीकाठी वसलेल्या देऊर गावात दरवर्षी टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा करावा लागत आहे. मागील काही वर्षांपासून परिसरासह काही गावांना पाणीटंचाईचा प्रश्न जाणवू लागला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाशी निगडित असलेल्या अनेक गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. हे सर्व देऊर येथील शिक्षण संस्थेतील शिक्षक प्रकाश कदम यांनी यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की परिसरातील झाडांच्या कत्तलीमुळे यासारखे प्रश्न उद्भवत आहेत. यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी वृक्षसंवर्धन मोहीम हाती घेतली. यासाठी शाळेतील विद्यार्थी आणि परिसरातील वृक्षप्रेमींना बरोबर घेऊन वृक्षारोपण केले.विद्यार्थ्यांसह कुटुंबासमवेत ज्या परिसरात भेटी देत अथवा सहलीला जात असे अशा परिसरातून ते दुर्मीळ झाडांची रोपे किंवा बिया आपल्यासोबत घरी घेऊन येतात. त्या बियांची लागवड करून त्यांचे रोप तयार करून परिसरात लागवड करतात.दुर्मीळ झाडांसाठी प्रयत्नकोल्हापूर येथून गोरख चिंच, सज्जनगड येथील बकुळा, राजस्थानहून कमी पाण्यात येणाऱ्या आंब्याच्या कुया, धुळे जिल्ह्यातून काटेसावर आधी झाडांच्या बिया आणून त्यांनी आपल्या परसबागेत रोपे तयार केली. आज त्यांच्या परसबागेत करवंद, हनुमा फळ, बाहवा, मेहंदी, गुलमोहर, जांभूळ, सीताफळ, नीलमोहर, कडुलिंबाच्या आदी रोपे आहेत.