शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

वृक्षसंवर्धनासाठी शिक्षकाची दोन दशकांची तपश्चर्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:52 IST

सातारा : तापमान वाढ, पावसाचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे झाडांची कमी झालेली संख्या, हे चित्र पालटून तसेच ...

सातारा : तापमान वाढ, पावसाचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे झाडांची कमी झालेली संख्या, हे चित्र पालटून तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रकाश कदम या शिक्षकाने गेल्या दोन दशकांपासून वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.कोरेगाव तालुक्यातील देऊर परिसर हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या परिसरात मागील वीस-तीस वर्षांपूर्वी बारमाही पाणी उपलब्ध होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. मात्र वसना नदीकाठी वसलेल्या देऊर गावात दरवर्षी टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा करावा लागत आहे. मागील काही वर्षांपासून परिसरासह काही गावांना पाणीटंचाईचा प्रश्न जाणवू लागला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाशी निगडित असलेल्या अनेक गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. हे सर्व देऊर येथील शिक्षण संस्थेतील शिक्षक प्रकाश कदम यांनी यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की परिसरातील झाडांच्या कत्तलीमुळे यासारखे प्रश्न उद्भवत आहेत. यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी वृक्षसंवर्धन मोहीम हाती घेतली. यासाठी शाळेतील विद्यार्थी आणि परिसरातील वृक्षप्रेमींना बरोबर घेऊन वृक्षारोपण केले.विद्यार्थ्यांसह कुटुंबासमवेत ज्या परिसरात भेटी देत अथवा सहलीला जात असे अशा परिसरातून ते दुर्मीळ झाडांची रोपे किंवा बिया आपल्यासोबत घरी घेऊन येतात. त्या बियांची लागवड करून त्यांचे रोप तयार करून परिसरात लागवड करतात.दुर्मीळ झाडांसाठी प्रयत्नकोल्हापूर येथून गोरख चिंच, सज्जनगड येथील बकुळा, राजस्थानहून कमी पाण्यात येणाऱ्या आंब्याच्या कुया, धुळे जिल्ह्यातून काटेसावर आधी झाडांच्या बिया आणून त्यांनी आपल्या परसबागेत रोपे तयार केली. आज त्यांच्या परसबागेत करवंद, हनुमा फळ, बाहवा, मेहंदी, गुलमोहर, जांभूळ, सीताफळ, नीलमोहर, कडुलिंबाच्या आदी रोपे आहेत.