शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वाभिमानीचे ऊसतोड बंद आंदोलन: कोयता थांबला; वाहतूक खोळंबली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 13:01 IST

संघटनेने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मागण्यांसाठी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता.

सातारा : एक रकमी एफआरपी, वजनकाटे ऑनलाईन करणे, रिकव्हरीतील चोरी थांबविणे आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दि. १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी ऊसतोड बंद आंदोलन जाहीर केले असून, पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. ऊसतोडबरोबरच वाहतूक बंद होती. त्यामुळे शिल्लक उसावरच कारखाने सुरू होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद मागील महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात झाली होती. या ऊस परिषदेत विविध ठराव झाले होते. तसेच अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर संघटनेने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मागण्यांसाठी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. तरीही मागण्यांबाबत निर्णय न झाल्याने संघटनेने राज्यातच १७ आणि १८ नोव्हेंबरला ऊसतोड बंद आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारपासून या आंदोलनाला सुरुवात होत आहे.याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले, ‘तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा कायदा राज्य शासनाने केला आहे. हा कायदा रद्द करुन एक रकमी एफआरपी देण्याची आमची मागणी आहे. तसेच रिकव्हरीतील चोरी थांबवावी, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद करावेत. दरवर्षी मजूर आणि मुकादम ऊस वाहतूकदारांना गंडा घालतात. याला आळा घालण्यासाठी ऊस मजूर महामंडळाची स्थापना करावी. या महामंडळामार्फत मजूर पुरवावेत. तसेच ही प्रक्रिया ऑनलाईन करावी, महामंडळाला निधी जमा करण्यासाठी प्रती टन १० रुपयांची कपात करावी, आदी आमच्या मागण्या असून त्या शेतकरी हिताच्या आहेत.दरम्यान, गुरुवारी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी ऊसतोड बंद होती. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड मजुरांना भेटून आवाहन केले. तर ऊसतोड झाली नसल्याने वाहतूक बंद होती. फक्त बुधवारी तोडलेला ऊसच कारखान्याकडे घेऊन जाताना एखादे वाहन दिसत होते.

जिल्ह्यातील कारखानेही ३० मार्चच्या पुढे चालणार नाहीत, असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आंदोलनादरम्यान तोडी घेऊ नयेत. वाहतूकदारांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना