शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

थकवलेले दोनशे कोटी रुपये द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:45 IST

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकवलेले दोनशे कोटी रुपये द्यावेत तसेच सातारा जिल्ह्यामध्ये यंदा पाऊसमान कमी झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ६ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सातारा : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकवलेले दोनशे कोटी रुपये द्यावेत तसेच सातारा जिल्ह्यामध्ये यंदा पाऊसमान कमी झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ६ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार इतका प्रोत्साहन भत्ता देणार असल्याचे घोषित केले. शेतकऱ्यांनी उसनवारी करून कर्जाच्या रकमा भरल्या; परंतु अद्याप त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. तसेच साखर कारखान्यांनी ऊस घेतल्यानंतर एफ आर पी च्या रकमा थकवलेल्या आहेत.हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कर्ज बाजारी होऊन पिकांची पेरणी लागवड केली; परंतु सातारा जिल्ह्यामध्ये पाऊसच न पडल्यामुळे पेरणी वाया जाऊन पिकाचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. आॅगस्ट महिना उजाडला तरी पाऊस नसल्यामुळे शासनाने सातारा जिल्'ात अति तातडीने आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करावा.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे सदस्य अर्जुनराव साळुंखे, देवानंद पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, राज्य प्रवक्ते अनिल पवार, दादासाहेब यादव, तानाजी देशमुख, रमेश पिसाळ, नितीन यादव, बापूराव साळुंखे, प्रमोद जगदाळे, संजय जाधव, संजय कांबळे, विजय चव्हाण, रामचंद्र मोरे, दत्ता पाटील, महादेव डोंगरे आदींनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSatara areaसातारा परिसर