शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

वडूज बाजार समितीवर स्वाभिमानीचा हल्लाबोल, शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:00 IST

व्यापाऱ्यांचे गाळे बंद केले

वडूज : स्वाभिमानी शेतकरी संघटना व पीडित शेतकऱ्यांनी थेट वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर हल्लोबोल करत व्यापाऱ्यांचे गाळे बंद केले. यामुळे चार ते पाच तास येथील तणावाचे वातावरण तयार झाले होते. व्यापारी, बाजार समितीचे आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बराच वेळ चर्चा होऊनही मार्ग निघत नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या खरीप हंगामात घेवडा, मूग, उडीद आणि इतर सर्व कडधान्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, आवकेचे प्रमाण वाढल्यानंतर कडधान्याच्या दराच्या बाबतीमध्ये तफावत जाणवू लागली आहे. मात्र, तरीही शेतकरी उरावर धोंडा ठेवून सणाच्या तोंडावर केवळ पैशांच्या निकडीसाठी शेतमाल व्यापाऱ्यांना घालत आहेत. शेती माल देऊन महिना उलटला, तरी पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांनाच धमकी व शिवीगाळ होत असल्याचे समजताच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समितीतील कारभार सुधारण्यासाठी लेखी निवेदन ही यापूर्वीच दिलेले होते.संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, ‘संघटनेची ताकद काय असते, ती या हल्लाबोलनंतर शेतकऱ्यांसह संबंधित प्रशासनाला समजली आहे. शेतीमालाची पक्की पावती दिली पाहिजे, अन्यथा त्या व्यापाऱ्याचे परवाने रद्द करावे. व्यापाऱ्यांकडून थकीत रक्कम माण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली, तसेच बेजबाबदारपणे बोलणाऱ्यांनीही जाहीर माफी मागितली, हा विजय एकीचा आहे. यापुढील काळात असेच संघटित राहून कार्यरत राहू यात. व्यापारी व शेतकरी यांच्यात स्नेहपूर्ण वातावरण पूर्वीपासून आहे. जगाच्या पोशिंद्याला सन्मान द्या.दत्तू घार्गे म्हणाले, ‘बाजार समितीचे प्रशासन बघ्याची भूमिका घेत, गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. मंदीचे कारण देऊन पैसे देण्याचा वायदा उलटल्यानंतरही व्यापारी वेळेवर पैसे देत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. व्यापारी खेळवाखेळवी करू लागल्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. काही व्यापारी शेतकऱ्यांच्या अंगावरही धावून जाऊ लागले आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे बाजार समितीचा प्रशासन मूग गिळून गप्प आहे.’

यावेळी सूर्यकांत भुजबळ, श्रीकांत लावंड, विजय शिंदे, योगेश जाधव, अजय पाटील, विजय देवकर, बांबू सूर्यवंशी, संतोष बागल, राजू बागल, बाबा फडतरे आदींसह खटाव-माण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुन्हा निवडणुका लागल्यावर शेतकऱ्यांच्या दारात मत मागायला जायचे आहे, हे विसरू नका. आता शेतकरी अडचणीत असताना बाजार समितीमधील सत्ताधारी आणि विरोधक ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही बाब शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवणार आहे याचे भान आता राज्यकर्त्यांनी ठेवावे. - तानाजी देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी