शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

वडूज बाजार समितीवर स्वाभिमानीचा हल्लाबोल, शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:00 IST

व्यापाऱ्यांचे गाळे बंद केले

वडूज : स्वाभिमानी शेतकरी संघटना व पीडित शेतकऱ्यांनी थेट वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर हल्लोबोल करत व्यापाऱ्यांचे गाळे बंद केले. यामुळे चार ते पाच तास येथील तणावाचे वातावरण तयार झाले होते. व्यापारी, बाजार समितीचे आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बराच वेळ चर्चा होऊनही मार्ग निघत नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या खरीप हंगामात घेवडा, मूग, उडीद आणि इतर सर्व कडधान्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, आवकेचे प्रमाण वाढल्यानंतर कडधान्याच्या दराच्या बाबतीमध्ये तफावत जाणवू लागली आहे. मात्र, तरीही शेतकरी उरावर धोंडा ठेवून सणाच्या तोंडावर केवळ पैशांच्या निकडीसाठी शेतमाल व्यापाऱ्यांना घालत आहेत. शेती माल देऊन महिना उलटला, तरी पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांनाच धमकी व शिवीगाळ होत असल्याचे समजताच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समितीतील कारभार सुधारण्यासाठी लेखी निवेदन ही यापूर्वीच दिलेले होते.संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, ‘संघटनेची ताकद काय असते, ती या हल्लाबोलनंतर शेतकऱ्यांसह संबंधित प्रशासनाला समजली आहे. शेतीमालाची पक्की पावती दिली पाहिजे, अन्यथा त्या व्यापाऱ्याचे परवाने रद्द करावे. व्यापाऱ्यांकडून थकीत रक्कम माण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली, तसेच बेजबाबदारपणे बोलणाऱ्यांनीही जाहीर माफी मागितली, हा विजय एकीचा आहे. यापुढील काळात असेच संघटित राहून कार्यरत राहू यात. व्यापारी व शेतकरी यांच्यात स्नेहपूर्ण वातावरण पूर्वीपासून आहे. जगाच्या पोशिंद्याला सन्मान द्या.दत्तू घार्गे म्हणाले, ‘बाजार समितीचे प्रशासन बघ्याची भूमिका घेत, गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. मंदीचे कारण देऊन पैसे देण्याचा वायदा उलटल्यानंतरही व्यापारी वेळेवर पैसे देत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. व्यापारी खेळवाखेळवी करू लागल्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. काही व्यापारी शेतकऱ्यांच्या अंगावरही धावून जाऊ लागले आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे बाजार समितीचा प्रशासन मूग गिळून गप्प आहे.’

यावेळी सूर्यकांत भुजबळ, श्रीकांत लावंड, विजय शिंदे, योगेश जाधव, अजय पाटील, विजय देवकर, बांबू सूर्यवंशी, संतोष बागल, राजू बागल, बाबा फडतरे आदींसह खटाव-माण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुन्हा निवडणुका लागल्यावर शेतकऱ्यांच्या दारात मत मागायला जायचे आहे, हे विसरू नका. आता शेतकरी अडचणीत असताना बाजार समितीमधील सत्ताधारी आणि विरोधक ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही बाब शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवणार आहे याचे भान आता राज्यकर्त्यांनी ठेवावे. - तानाजी देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी