शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विश्वास नांगरे-पाटील यांनी माझ्यावरचा राग शांतिदूतवर काढला, सुरेश खोपडे यांचा सनसनाटी आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:19 IST

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने लेख लिहून पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत सुधारणा सूचवल्या होत्या. तसेच सातत्याने नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवल्याने विश्वास नांगरे-पाटील यांना राग आला. त्यामुळेच त्यांनी परिवर्तनाचे प्रतीक असलेला शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविला आहे, असा आरोप निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देनिवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप प्रशासनाने संयुक्त कारण द्यावे, अन्यथा त्याच ठिकाणी पुतळा बसवावापुतळा हटवण्यात जनतेचे हित नसून नांगरे-पाटील यांचा अहंकार

सातारा : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने लेख लिहून पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत सुधारणा सूचवल्या होत्या. तसेच सातत्याने नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवल्याने विश्वास नांगरे-पाटील यांना राग आला. त्यामुळेच त्यांनी परिवर्तनाचे प्रतीक असलेला शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविला आहे, असा आरोप निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला.दरम्यान, शांतिदूत हटवण्यासाठी पोलिसांना दोन वेळा घुमजाव करणे, म्हणजे प्रशासकीय बाब असूच शकत नाही. प्रशासकीय बाब म्हणजे जनतेच्या हिताचा निर्णय होय. पुतळा हटवण्यात जनतेचे हित नसून नांगरे-पाटील यांचा अहंकार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शांतिदूत हटवण्याचे संयुक्तिक कारण द्यावे, अन्यथा त्याच ठिकाणी पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी केली.सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयासमोरील असलेला शांतिदूत पुतळा गुरुवारी रात्री अचानक पोलिसांनी हटविला. या पार्श्वभूमीवर सुरेश खोपडे यांनी सोमवारी साताऱ्यांत येऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे, नरेंद्र पाटील, विजय मांडके उपस्थित होते.खोपडे म्हणाले, मुख्यालयासमोर पूर्वी चार तोफा होत्या. त्या पाहिल्यानंतर सामान्य माणसाच्या मनात दडपण येत होते. त्यामुळे मुख्यालयात येण्यासाठी लोकांना भीती वाटत होती. ही परिस्थिती बदलून पोलीस कल्याण निधी आणि कार्यालयीन खर्चातून रिकाम्या पुंगळ्या वितळवून शांतिदूत पुतळा उभारण्यात आला होता.

हे सामान्य आणि पीडित लोकांच्या रक्षणाचे प्रतीक होते. मी सातत्याने प्रशासनातील बदलावर बोलत असल्याने नोकरशाहीला असे बदल नको आहेत. त्यामुळे मला आणि मी मांडत असलेला परिवर्तनाचा विचार दाबण्यासाठी अशी प्रतिके हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस