शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना मंत्रिपद नाही त्यांना भेटवस्तू नक्की, मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 11:49 IST

कर्नाटकचे वाचाळ मुख्यमंत्री सीमाभागातील गावांबद्दल वक्तव्ये करत आहेत; पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. कारण दोघे आदेश पाळणारे आहेत.

सातारा : सरकारची मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण झाली असून ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, त्यांना एक भेटवस्तू मिळणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हाणला. दरम्यान, निवडणुकीसाठी राज्याचे प्रकल्प गुजरातला पळवले. चार लाख लोकांचा रोजगार गेला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राच्या सांगण्यावरून गप्प बसल्याची टीकाही त्यांनी केली.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, गुजरात निवडणुकीत विजयाची खात्री नसल्यामुळेच महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले. इथल्या चार लाख लोकांचा रोजगार गेला; परंतु केंद्राने बोलू नका, असे सांगितल्यानेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यंमत्री काही बोलले नाहीत. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आलीय, आता आमचे प्रकल्प आम्हाला परत द्यावेत. निवडणुकीमुळेच कर्नाटकचे वाचाळ मुख्यमंत्री सीमाभागातील गावांबद्दल वक्तव्ये करत आहेत; पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. कारण दोघे आदेश पाळणारे आहेत.सध्याच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही आमच्याच सरकारची जुनी योजना आहे. योजना पारदर्शक कशी होईल, याची जबाबदारी शासनाने घ्यावी. मागच्या जलयुक्त शिवारमध्ये काही त्रुटी राहिल्या, तसे होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे पाटील म्हणाले.रोहित पवारांच्या विधानाची नितेश राणेंनी खिल्ली उडवत शक्ती कायदा झाला तर राष्ट्रवादीचेच तीन आमदार तुरुंगात जातील, असे म्हटले होते. याबाबत विचारले असता जयंत पाटलांनी त्यांच्या प्रत्येक विधानावर उत्तर द्यायची गरज नसल्याचे सांगत बगल दिली.सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या विचारात सरकारने दोन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात नाताळच्या सुट्याही येत आहेत. सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या विचारात आहे; परंतु जनतेचे प्रश्न अधिवेशनात मांडता आले पाहिजेत. यामुळे तीन आठवडे अधिवेशन सुरू राहण्यासाठी आग्रही असल्याचे पाटील यांनी सांगितले.सदावर्ते भाजपचे हस्तक गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे हस्तक आहेत. जे सत्ताधाऱ्यांना बोलता येत नाही, ते सदावर्ते यांच्या मार्फत बोलले जाते. सत्ताधारी त्यांचा वापर खुबीने कसा करतात, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तथापि, खासदार उदयनराजे भोसले यांचा सध्या संपर्क नसल्याचे सांगत ते राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत का नाहीत, यावर त्यांनी अधिक भाष्य टाळले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे