शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ज्यांना मंत्रिपद नाही त्यांना भेटवस्तू नक्की, मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 11:49 IST

कर्नाटकचे वाचाळ मुख्यमंत्री सीमाभागातील गावांबद्दल वक्तव्ये करत आहेत; पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. कारण दोघे आदेश पाळणारे आहेत.

सातारा : सरकारची मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण झाली असून ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, त्यांना एक भेटवस्तू मिळणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हाणला. दरम्यान, निवडणुकीसाठी राज्याचे प्रकल्प गुजरातला पळवले. चार लाख लोकांचा रोजगार गेला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राच्या सांगण्यावरून गप्प बसल्याची टीकाही त्यांनी केली.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, गुजरात निवडणुकीत विजयाची खात्री नसल्यामुळेच महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले. इथल्या चार लाख लोकांचा रोजगार गेला; परंतु केंद्राने बोलू नका, असे सांगितल्यानेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यंमत्री काही बोलले नाहीत. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आलीय, आता आमचे प्रकल्प आम्हाला परत द्यावेत. निवडणुकीमुळेच कर्नाटकचे वाचाळ मुख्यमंत्री सीमाभागातील गावांबद्दल वक्तव्ये करत आहेत; पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. कारण दोघे आदेश पाळणारे आहेत.सध्याच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही आमच्याच सरकारची जुनी योजना आहे. योजना पारदर्शक कशी होईल, याची जबाबदारी शासनाने घ्यावी. मागच्या जलयुक्त शिवारमध्ये काही त्रुटी राहिल्या, तसे होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे पाटील म्हणाले.रोहित पवारांच्या विधानाची नितेश राणेंनी खिल्ली उडवत शक्ती कायदा झाला तर राष्ट्रवादीचेच तीन आमदार तुरुंगात जातील, असे म्हटले होते. याबाबत विचारले असता जयंत पाटलांनी त्यांच्या प्रत्येक विधानावर उत्तर द्यायची गरज नसल्याचे सांगत बगल दिली.सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या विचारात सरकारने दोन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात नाताळच्या सुट्याही येत आहेत. सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या विचारात आहे; परंतु जनतेचे प्रश्न अधिवेशनात मांडता आले पाहिजेत. यामुळे तीन आठवडे अधिवेशन सुरू राहण्यासाठी आग्रही असल्याचे पाटील यांनी सांगितले.सदावर्ते भाजपचे हस्तक गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे हस्तक आहेत. जे सत्ताधाऱ्यांना बोलता येत नाही, ते सदावर्ते यांच्या मार्फत बोलले जाते. सत्ताधारी त्यांचा वापर खुबीने कसा करतात, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तथापि, खासदार उदयनराजे भोसले यांचा सध्या संपर्क नसल्याचे सांगत ते राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत का नाहीत, यावर त्यांनी अधिक भाष्य टाळले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे