शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

उन्हाची झळ; धरणे गाठतायत तळ

By admin | Updated: March 24, 2017 23:37 IST

जलस्त्रोत आटले : पूर्व भागाला टंचाईच्या झळा; पाणी काटकसरीने वापरण्याची गरज

सातारा : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत. परिणामी जिल्ह्याच्या पूर्व भागाला टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश धरणे निम्म्यावर आली असून, काही धरणांमधून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. सद्य:स्थिती पाहता पुढील दोन महिन्यांत धरणे तळ गाठणार असून, संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास १५ धरणे आहेत. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने कोयना, कण्हेर, उरमोडी, धोम, नीरा-देवघर, भाटघर, तारळी आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरली. तसेच कूपनलिका, विहिरी, ओढे व तलावांमध्येही मुबलक पाणीसाठी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्यांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत. परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या वतीने माण, फलटण तालुक्यांत पाणी टॅँकर सुरू करून ग्रामस्थांना दिलासा दिला असला तरी पुढील दोन महिन्यांत पूर्व भागातील पाणीटंचाईचे चित्र अधिक भीषण होणार आहे.एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असताना दुसरीकडे धरणांंमधील पाणीसाठाही खालावत चालला आहे. कोयना व उरमोडी धरण वगळता बहुतांश धरणे जवळपास निम्म्यावर आली आहेत. कोयना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात पाणीसाठा जास्त असला तरी वीजनिर्मिती व शेतीसाठी पाण्याचा वापर पाहता पावसाळा सुरू होईपर्यंत दोन्ही बाबींसाठी पाण्याचा मेळ घालणे कोयना व्यवस्थापनापुढे आव्हान असणार आहे. (प्रतिनिधी)कोयनेत ६.९५ टीएमसी पाणीसाठा अधिक१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण गेल्या वर्षी जवळपास शंभर टक्के भरले. धरणात आजमितीस ४८.१४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी याच दिवशी ४१.१९ टीएमसी पाणी शिल्लक होते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.९५ टीएमसी पाणी अधिक आहे. धरणातील १३ टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जाणार आहे. तर ६ टीएमसी पाणी सांगली लघू पाटबंधारे विभागाला वीज व शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. २३ टीएमसी पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील शेतीसाठी होणार आहे.