शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST

खंडाळा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या ...

खंडाळा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी थंडी जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागत आहेत.

कचऱ्यामुळे दुर्गंधी

सातारा : येथील समर्थ मंदिर ते पोवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात लोकांकडून ओला कचरा टाकण्यात येत आहे. खराब अन्नपदार्थ, मृत जनावरे, आदी कचरा ओढ्यात टाकला जात असल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करून खबरदारी घेण्याची मागणी केली जात आहे.

दुभाजकांत गवत वाढले

सातारा : शहरातील मुख्य रस्त्यांमध्ये असलेल्या दुभाजकातील गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या गवताकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेच्यावतीने गवत काढण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हे गवत वाळल्यास शहराच्या सौंदर्याला बट्टा लागत आहे.

दुचाकी चोऱ्यांत वाढ

फलटण : परिसरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होऊ लागली आहे. तसेच शहर व परिसरात बेवारस दुचाकी आणि चारचाकी सापडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भटक्या कुत्र्यांचा त्रास

सातारा : सातारा शहरातील शेटे चौकात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. या चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाशेजारी आसपासचे नागरिक कचरा आणून टाकतात. त्यानंतर हा कचरा या कुत्र्यांकडून विस्कटला जातो.

अस्ताव्यस्त वाहनांमुळे पार्किंगची समस्या

सातारा : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात येत आहेत. त्यामुळे इतर वाहने काढताना अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा परिषदेसमोर दुचाकीसाठी पार्किंग आहे. या ठिकाणी नोकरदार दुचाकी लावतात. तसेच कामानिमित्त येणाऱ्यांच्या गाड्या असतात; पण अनेकवेळा पार्किंगमध्ये जागा उरत नाही.

आरोग्याची काळजी

सातारा : सध्या वातावरणात बदल झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे. सध्या साथरोगांचा त्रास काही लोकांना जाणवू लागला असून, त्यापासून बचाव करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांना दिला जात आहे.

कोरोनाची भीती

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माणमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या कमी होती. मात्र, सध्या नव्याने काही गावांमध्ये कोरोनाचे संक्रमण दिसून येऊ लागले आहे. रुग्णसंख्याही वेगाने वाढू लागली आहे.

करंजे परिसरातील पुलाकडेला कचरा

सातारा : करंजे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलाच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. काचेच्या बाटल्या, थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, बॉटल आदींसह खाद्यपदार्थ कचऱ्यामध्ये पडत असल्याने त्यातून दुर्गंधी येत आहे. येथे नेहमीच प्रत्येक प्रकारचा कचरा टाकण्यात येतो. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून पुलाकडेला कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.