शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या घामाच्या दामावर कारखानदारांचा दरोडा, ‘स्वाभिमानी’चा आरोप 

By नितीन काळेल | Updated: July 26, 2023 18:49 IST

गावोगावी बैठका घेऊन हिशोब चुकता करण्याचा इशाराही

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दोन वर्षांपासून रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या घामाच्या दामावर दरोडा टाकण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटना याबाबत गावोगावी बैठक घेऊन कारखानदारांचा हिशाेब चुकता करणार आहे, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राजू शेळके यांनी म्हटले आहे की, साखर कारखानदारांकडून रिकव्हरी कमी दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच इथेनॉलसह इतर उपपदार्थांची निर्मिती करून रिकव्हरीत जाणून बुजून घट दाखवायची अन् आम्ही एफआरपीप्रमाणे पैसे दिल्याचे मिरवायचे, असे प्रकारही कारखानदारांनी सुरू केले आहेत. त्याचबरोबर उसापासून मिळणाऱ्या उपपदार्थांचे पैसेही कारखानदार गडप करू लागलेत. हे कारखानदार उपपदार्थांचे उत्पादन वाढवतात आणि साखरेचे थोडेसे कमी करतात. यामुळे कारखान्याची रिकव्हरी कमी होते. त्यामुळे साहजिकच रिकव्हरीवर आधारित एफआरपीही कमी होत आहे. अशा पध्दतीने शेतकर्यांना लुटण्याचा नवा मार्ग कारखानदारांनी शोधला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कंगाल होऊ लागला आहे. कारखानदार मात्र, शेतकऱ्यांचे पैसे बुडवून मालामाल होत चाललेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाम गाळून, कर्ज काढून, प्रचंड कष्ट व मेहनत करून ऊस पिकवलेला असतो. या उसाच्या बिलातून त्याला कर्ज फेडायचे असते. इतर खर्च भागवायचे असतात. मात्र, त्याच्या घामाच्या दामाला योग्य भावच कारखानदार देत नाही. तसेच त्यांची विविध पध्दतीने लूट केली जात आहे.साखर कारखानदार रिकव्हरी कमी करून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतायचे काम करू लागले आहेत. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज जनजागृती अभियानाच्या अंतर्गत जागृती करून शेतकऱ्यांना संघटीत केले जाणार आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच सातारा जिल्ह्यात गावोगावी बैठका, सभा घेऊन आगामी काळात कारखानदारांचा सर्व हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे.

सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर दरोडा टाकत आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांत जागृती करुन याचा हिशोब कारखानदारांकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर यंदाच्या हंगामात सगळे हिशोब चुकते केल्याशिवायही शांत बसणार नाही. हे कारखानदारांनी व शासनानेनीही लक्षात घेण्याची गरज आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी