शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या घामाच्या दामावर कारखानदारांचा दरोडा, ‘स्वाभिमानी’चा आरोप 

By नितीन काळेल | Updated: July 26, 2023 18:49 IST

गावोगावी बैठका घेऊन हिशोब चुकता करण्याचा इशाराही

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दोन वर्षांपासून रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या घामाच्या दामावर दरोडा टाकण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटना याबाबत गावोगावी बैठक घेऊन कारखानदारांचा हिशाेब चुकता करणार आहे, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राजू शेळके यांनी म्हटले आहे की, साखर कारखानदारांकडून रिकव्हरी कमी दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच इथेनॉलसह इतर उपपदार्थांची निर्मिती करून रिकव्हरीत जाणून बुजून घट दाखवायची अन् आम्ही एफआरपीप्रमाणे पैसे दिल्याचे मिरवायचे, असे प्रकारही कारखानदारांनी सुरू केले आहेत. त्याचबरोबर उसापासून मिळणाऱ्या उपपदार्थांचे पैसेही कारखानदार गडप करू लागलेत. हे कारखानदार उपपदार्थांचे उत्पादन वाढवतात आणि साखरेचे थोडेसे कमी करतात. यामुळे कारखान्याची रिकव्हरी कमी होते. त्यामुळे साहजिकच रिकव्हरीवर आधारित एफआरपीही कमी होत आहे. अशा पध्दतीने शेतकर्यांना लुटण्याचा नवा मार्ग कारखानदारांनी शोधला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कंगाल होऊ लागला आहे. कारखानदार मात्र, शेतकऱ्यांचे पैसे बुडवून मालामाल होत चाललेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाम गाळून, कर्ज काढून, प्रचंड कष्ट व मेहनत करून ऊस पिकवलेला असतो. या उसाच्या बिलातून त्याला कर्ज फेडायचे असते. इतर खर्च भागवायचे असतात. मात्र, त्याच्या घामाच्या दामाला योग्य भावच कारखानदार देत नाही. तसेच त्यांची विविध पध्दतीने लूट केली जात आहे.साखर कारखानदार रिकव्हरी कमी करून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतायचे काम करू लागले आहेत. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज जनजागृती अभियानाच्या अंतर्गत जागृती करून शेतकऱ्यांना संघटीत केले जाणार आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच सातारा जिल्ह्यात गावोगावी बैठका, सभा घेऊन आगामी काळात कारखानदारांचा सर्व हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे.

सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर दरोडा टाकत आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांत जागृती करुन याचा हिशोब कारखानदारांकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर यंदाच्या हंगामात सगळे हिशोब चुकते केल्याशिवायही शांत बसणार नाही. हे कारखानदारांनी व शासनानेनीही लक्षात घेण्याची गरज आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी