शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दहा तारखेपासून

By admin | Updated: April 10, 2015 00:23 IST

शिक्षण विभागाचा निर्णय : परीक्षा वेळापत्रकात केला बदल--लोकमतचा दणका

मांढरदेव : सातारा जिल्ह्यात ‘पाचवी ते आठवीपर्यंतच्या परीक्षांबाबत संभ्रमावस्था’ या सदराखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जाग आली आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पंधरा एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता दहा एप्रिलपासून सुरू करण्याबाबतचे परिपत्रक या विभागाने काढले आहे. पाचवी ते आठवीपर्यंतच्या परीक्षा दरवर्षी १ एप्रिलला सुरू होतात. प्राथमिक शाळा वगळता माध्यमिक शाळांमध्ये या परीक्षा १ एप्रिलपासून सुरू असतात. मात्र, या परीक्षा १५ एप्रिलला घ्याव्यात,असा फतवा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढला होता. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परीक्षेनंतर मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांकडे एकच आठवडा उपलब्ध होता. यात निकाल तयार करणे अवघड होते. विशेषत: माध्यमिक शाळांत पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या मोठी असते. येथे अनेक अडचणी निकाल तयार करताना येणार होत्या. आरटीई कायद्यानुसार ‘ड’ श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक पूरक मार्गदर्शन करण्यासाठी परीक्षेनंतर पंधरा दिवस कालावधी उपलब्ध असणे आवश्यक असते. हा कालावधीदेखील पुरेसा उपलब्ध नव्हता, यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यातच पालक व विद्यार्थी यांचे सुटीचे वेळापत्रक पूर्ण कोलमडले होते. १५ एप्रिलला परीक्षा सुरू कराव्यात या फतव्याचे सातारा जिल्ह्यातील काही शाळांनी मान्य करून १५ एप्रिलला परीक्षा सुरू केल्या. मात्र, बऱ्याचशा शाळांनी या परीक्षा १ एप्रिल व सहा एप्रिलला सुरू केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या परीक्षांमध्ये एकवाक्यता असणे आवश्यक आहे. (वार्ताहर)परीक्षा पद्धतीत एकवाक्यता हवीचालू वर्षीच्या गोंधळानंतर येणाऱ्या पुढील वर्षी तरी संबंधित शिक्षण विभागाने आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांचे कामाचे दिवस व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यासपूर्वक विचार करून परीक्षा पद्धतीमध्ये एकवाक्यता आणावी, अशी मागणी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.