शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST

औंध : औंध येथील केदारेश्वरनजीकचा लोकवस्तीतील बंधारा निर्लेखित करण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे ...

औंध : औंध येथील केदारेश्वरनजीकचा लोकवस्तीतील बंधारा निर्लेखित करण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्याहस्ते सरबत घेऊन त्यांनी उपोषण सोडले.

औंध (ता. खटाव) येथील सिमेंट बंधाऱ्यात दूषित पाणी राहणार नाही, याबाबत कृषी विभाग आणि ग्रामपंचायत यांनी चार दिवसांत कार्यवाही करावी व बंधारा अतितत्काळ निर्लेखित करण्यासाठी सोमवारी प्रस्ताव सादर करावा, असे लेखी पत्र प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी दिल्यानंतर उपोषणकर्ते सागर जगदाळे यांनी सहाव्यादिवशी उपोषण मागे घेतले.

प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी जनार्दन कासार, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ठिगळे, डॉ. विलास साळुंखे, ग्रामविकास अधिकारी चाँदशा काझी, मंडल अधिकारी गजानन कुलकर्णी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बंधारा परिसराची पाहणी केली आणि सागर जगदाळे यांच्याबरोबर चर्चा केली. यामध्ये कृषी विभागाने आरोग्य अधिकारी यांच्याकडून आरोग्यविषयक अहवाल तसेच स्थळ फोटो घेऊन बंधारा निर्लेखित करण्यासाठी तत्काळ वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करावा. तसेच बंधाऱ्यातील दूषित पाणी भौगोलिक परिस्थितीमुळे उपाययोजना करता येत नाहीत. बंधारा नागरी वस्तीत असल्याने लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी बंधारा निर्लेखित करावा, असा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा, असे प्रशासनाच्यावतीने लेखी स्वरुपात पत्र दिले. यावर सागर जगदाळे यांचे समाधान झाल्याने उपविभागीय अधिकारी कासार यांच्याहस्ते सरबत घेऊन त्यांनी उपोषण सोडले.

यावेळी सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, दत्तात्रय जगदाळे, राजेंद्र माने, वसंत पवार, तानाजी इंगळे, गणेश चव्हाण, संदीप इंगळे, कृषी सहायक उत्तमराव तिकुटे, मोहन मदने, ग्रामस्थ महिला उपस्थित होते.

कोट..

औंध येथील केदारेश्वरनजीकच्या बंधाऱ्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते. प्रशासनाला निवेदन देऊनही काही फरक पडला नसल्याने लोकशाहीच्या मार्गाने उपोषण केले व सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय आहे.

- सागर जगदाळे, उपोषणकर्ते, औंध

(चौकट)

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची मध्यस्थी

माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी प्रशासनाशी फोनवरून चर्चा करून बंधाऱ्याविषयी गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासन आणि उपोषणकर्ते सागर जगदाळे यांची सकारात्मक चर्चा झाली.

०६औंध

फोटो : - प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्याहस्ते सरबत घेऊन सागर जगदाळे यांनी उपोषण सोडले. (छाया - रशिद शेख)