शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

राज्य शासनाचे ‘मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स’ धोरण, मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 13:32 IST

कृत्रिम प्लास्टिक फुलांच्या वापरावर निर्बंध आणण्याच्यादृष्टीने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक

सातारा : राज्यात शाश्वत शेती आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी कृत्रिम प्लास्टिक फुलांच्या वापरावर निर्बंध आणण्याच्यादृष्टीने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये राज्य शासन कृत्रिम फुलांबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा विचारात आहे. तसेच ‘मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स’ धोरण अमलात आणण्यासाठीही सकारात्मक असल्याची माहिती मंत्री मुंडे यांनी दिली.मुंबईतील विधान भवनात ही बैठक झाली. बैठकीला रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आमदार महेश शिंदे, विश्वजित कदम, सुनील शेळके, अमल महाडिक, रोहित पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मंत्री व आमदारांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे राज्यातील फूल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याबाबत चिंता व्यक्त केली.बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, राज्यात कृत्रिम फुलांच्या बाबतीत उत्पादन, आयात, विक्री व नियमन आणण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे. कृषी फुलांचा वापर वाढवणाऱ्या शासकीय व सार्वजनिक उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. कृषी फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान, प्रशिक्षण आणि हरितगृह तयार करण्यासाठी सवलती द्याव्यात. पर्यावरण व आरोग्यविषयक अभ्यास समितीमार्फत कृत्रिम फुलांचे दुष्परिणाम यावरही सखोल शास्त्रीय अहवाल तयार करण्यात यावा. 'मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स' अशा अभियानाच्या माध्यमातून फुलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. राज्यातील शेतकरी गुलाब, झेंडू, जास्वंद, ट्युलिप, कार्नेशन, रजनीगंधा, आदी निर्यातक्षम फुलांची उत्पादन क्षमता विकसित करत आहेत. हरितगृह शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे भवितव्यही धोक्यात आलेले आहे. कृत्रिम फुलांचे उत्पादन प्रामुख्याने न विघटनशील घटकांपासून म्हणजे पॉलीस्टर, नायलॉन, प्लास्टिक आणि सिंथेटिक रंगांपासून होते. त्यामुळे त्याचा पर्यावरणावर दीर्घकाळ विपरीत परिणाम होतो.

कृत्रिम फुलांचा वापर मारक..शेतीसाठी अनुकूल धोरण आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. कृत्रिम फुलांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्याबाबत विचार सुरू असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले, तर मंत्री गोगावले यांनी हरितगृह शेती, ठिबक सिंचन, नियंत्रित तापमान या आधुनिक पद्धतींचा वापर करून शेतकरी फुलांची निर्यातक्षम उत्पादन क्षमता वाढवत आहेत. कृत्रिम फुलांचा अनियंत्रित वापर हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला मारक आहे, असे सांगितले.