शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

सोयाबीनसाठी खर्च २५ हजार, उत्पन्न मिळाले सात हजार; खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 14:10 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात फायद्याऐवजी तोटाच सहन करावा लागला

शंकर पोळकोपर्डे हवेली : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने शेतकऱ्यांचा सतत वांदा केला. त्यामुळे पीक नुकसानीला सामोरे जावे लागले. कऱ्हाड तालुक्यातील शामगावचे शेतकरी यशवंत चंद्रू पोळ यांना तर एक एकर क्षेत्रातून फक्त १३० किलोच सोयाबीन मिळाले. पैशामध्ये विचार केल्यास सोयाबीनची किंमत ७ हजार होते; पण त्यासाठी २४ हजार ८०० रुपये खर्च झाला आहे. शामगाव येथील यशवंत पोळ हे पाण्याची उपलब्धता बघूनच दोन पिके घेतात. यंदाच्या हंगामात त्यांनी खरिपाचे पीक म्हणून सोयाबीनची एक एकरावर लागवड केली होती. यंदाच्या हंगामात पाऊस उशिरा सुरू झाल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली. त्यानंतर सोयाबीन पिकाची उगवण चांगली झाली. मात्र, त्यानंतर पुढील १५ दिवसांपासून पावसाची सतंतधार सुरू झाली. तर फुलकळी लागण्याच्या वेळी पाऊसच गायब झाला.नंतरच्या काही दिवसांत पावसाने पुन्हा सुरुवात केली. हा पाऊस काढणीपर्यंत सुरूच होता. त्यामुळे  पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या उघडीपीनंतर रानातून सोयाबीन काढून आणले. त्यानंतर मळणी केल्यावर केवळ एक एकर क्षेत्रावर १३० किलोच सोयाबीन झाले. याची किंमत सध्याच्या दराने साडेसहा ते सात हजार होत आहे. पण, या शेतकऱ्याने सोयाबीन घेण्यापासून काढणीपर्यंत २५ हजार रुपये खर्च केला. उत्पादन पाहता हा सर्व खर्च वायाच गेला आहे. खरिपाने दगा दिला, आता रब्बी हंगाम काहीतरी आधार देईल, आशा आशेवर पोळ आहेत.

यावर्षीच्या खरीप हंगामात फायद्याऐवजी तोटाच सहन करावा लागला. त्यातच डोंगरी गाव म्हणून शासनाच्या सुविधाही मिळत नाहीत. जमीन पाडून ठेवायची नाही म्हणून आम्ही शेती करतो; पण यावर्षी सोयाबीन पिकातून घातलेला खर्चही निघालेला नाही.  - यशवंत पोळ, शेतकरी  

 

खर्च असा    नांगरट २५०० रुपये, फणणी १५००, पेरणी १६००, बियाणे २५००, खते १९००, औषधांची फवारणी ५ हजार रुपये, कोळपणी १ हजार, भांगलणी ३ हजार, काढणी ३ हजार , मळणी ३०० आणि मजुरी १ हजार

टॅग्स :Sa Re Ga Ma Pa Showसा रे ग म पSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी