शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी, टोकणीच्या तुलनेत रोपांतून जास्त उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST

कोपर्डे हवेली : भाताची पेरणी, टोकणीच्या तुलनेत भाताची रोपे लावून घेतलेले उत्पादन जास्त निघते. त्यामुळे भाताची रोपे तयार करण्यासाठी ...

कोपर्डे हवेली : भाताची पेरणी, टोकणीच्या तुलनेत भाताची रोपे लावून घेतलेले उत्पादन जास्त निघते. त्यामुळे भाताची रोपे तयार करण्यासाठी शेतकरी काळजी घेत असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. काही शेतकऱ्यांच्या भातावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.

शेतकरी भाताचे उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीचा अवलंब केला जातो. त्यामध्ये सरी, पेरणी, कोकणी, भाताची रोपे आदींचा सामावेश आहे.

पंधरा ते वीस वर्षांपासून भाताची रोपे लावण्याची पद्धत कऱ्हाड तालुक्यात सुरू झाली. दरवर्षी भाताची रोपे लावून उत्पादन घेण्याचे क्षेत्र वाढत गेले.

भाताची रोपे लावण्यासाठी भात लागणीपूर्व रोपे तयार करावी लागतात. त्यासाठी हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच रोहिणी नक्षत्रावर वाफे तयार करुन भाताचे बियाणे त्यामध्ये टाकतात. सुमारे पंचेचाळीस दिवसांपासून साठ दिवसांपर्यंत रोपे लावली जातात. पाऊस लांबला तर रोपे लावण्याचा कालावधी लांबतो. जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये रोपांची लावणी केली जाते. रोपे चांगली येण्यासाठी शेतकरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या घेऊन खतांचा वापर करतात.

वेगवेगळ्या जातीची बियाणे वापरली जातात. इंद्रायणी, बासमती भाताची लागवड तुलनेत शेतकरी जादा करतात.

भाताच्या लावणी पूर्व शेतकरी जमिनीची चिखलणी करून रोपांची लावणी करतात. त्यामुळे जमिनीची मशागत होऊन तणाचे प्रमाण कमी होते.

चौकट

भात हे जादा पाण्यावर अवलंबून असणारे पीक असल्याने बागायती विभागात मोठ्या क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. जेवढा जादा पाऊस तेवढे भातपिकास वातावरण अनूकल असते. त्यामुळेच पूर्णपणे पावसाळा सुरू झाल्याशिवाय भाताच्या रोपांची लावण केली जात नाही.

कोट...

भाताचे रोप जेवढे निरोगी आणि तजेलदार असेल, तेवढे उत्पादन चांगले निघण्यास मदत होते. त्यासाठी रोपांची काळजी घेतो.

- अक्षय चव्हाण,

शेतकरी कोपर्डे हवेली.

फोटो १५कोपर्डे हवेली

कोपर्डे हवेली परिसरातील शेतकरी भातरोपांची काळजी घेत आहेत. (छाया : शंकर पोळ)