शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सोयरिक करा; मानपान ठरवून घ्या ! कºहाडात काँगे्रस मेळाव्यातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:40 IST

राष्ट्रवादीबरोबरच्या घरोब्याचा यापूर्वीचा अनुभव चांगला नाही. आता नव्याने सोयरिक करायची असेल तर जरूर करूया; पण नुसतं लग्न ठरवून उपयोग नाही. याद्या तर कराव्याच लागतील; पण मानपान सन्मान

ठळक मुद्देआघाडी धर्म आम्हीच पाळायचा का? कार्यकर्त्यांचा प्रश्न

प्रमोद सुकरे ।कºहाड : राष्ट्रवादीबरोबरच्या घरोब्याचा यापूर्वीचा अनुभव चांगला नाही. आता नव्याने सोयरिक करायची असेल तर जरूर करूया; पण नुसतं लग्न ठरवून उपयोग नाही. याद्या तर कराव्याच लागतील; पण मानपान सन्मान ठरवून घ्या ! त्यांच्या वरवरच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असाच सूर जिल्हा काँॅग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आला.

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी कºहाडात झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी विरोधातील ‘राग’ आपल्या भाषणातून आळविला. आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर याचे साक्षीदार होते.पाटणच्या हिंदुराव पाटील यांनी ‘आघाडी धर्म फक्त आम्हीच पाळायचा का?’ असे म्हणत विषयाला तोंड फोडले तर ‘आघाडीतला मित्रपक्षच आम्हाला जमेल तेथे आडवायचं काम करतोय,’ असं खटावच्या विवेक देशमुख यांनी सांगितले. कºहाडच्या बंडानानांनी ‘राष्ट्रवादीच आपला खरा शत्रू आहे,’ असे सांगत आपल्या हातातून जिल्ह्यातील सत्ता का निटसली? याचा अभ्यास करण्याचा सल्ला देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली तर अजितराव पाटलांनी ‘तुमचं नांगरल्यावर आमचंही नांगरायचं आहे,’ हे राष्ट्रवादीकडून ठरवून घ्या, असे सांगितले. तर धैर्यशील कदमांनी दिवंगत शिवाजीराव देशमुखांना राष्ट्रवादीने अपमानास्पदपणे सभापतिपदावरून कसे काढले, याची आठवण करून दिली.

वाईच्या विराज शिंदेंनी लोकसभेला ‘तुमचं ऐकतो; पण विधानसभेला विरोधकांचा बदला घेण्याची मोकळीक द्या,’ अशी मागणी केली. तर शिवराज मोरे म्हणाले, ‘आमच्या मित्रपक्षाला ‘नवरा मेल्याचं दु:ख नाही; पण सवत विधवा होतेय,’ याचा आनंद वाटतोय, याचं काय करायचं?’ असा सवाल केला. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनीही ‘विधानसभेला किमान ४ मतदारसंघ जिल्ह्यात काँॅग्रेसला मिळाले पाहिजेत,’ असे मत मांडले. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या भाषणात आघाडी धर्म पाळायची गरज कार्यकर्त्यांना पटवून दिली.उपकारकर्त्यांना विसरू नका !वाईच्या मदन भोसलेंचे नाव न घेता आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘कोणाला कोणत्या पक्षात जायचं आहे त्यांनी जरूर जावे; पण उपकारकर्त्यांना विसरू नका. ज्या कारखान्यांवर तुम्ही मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलविताय, त्याला पृथ्वीबाबांनी मंजुरी दिली होती. हे लक्षात ठेवा. तेव्हा उगाच टीका करायच्या भानगडीत पडू नका.’त्यांच्या जाण्याने काय नुकसान होणार?मदन भोसले भाजपात गेले, त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे किती नुकसान झाले? असा प्रश्न मेळाव्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना केला. त्यावर ते म्हणाले, ‘भोसले गत १० वर्षे काँगे्रसमध्ये किती सक्रिय होते? हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने काय नुकसान होणार आहे? असा सवाल त्यांनी केला. असं एखाद्याच्या जाण्याने जिल्हा भाजपमय होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.म्हणून पवारांना माघार घ्यावी लागलीकाँग्रेसची ताकद काय आहे, याची जाणीव राष्ट्रवादीला झाली आहे. जयाभाऊ अन् रणजितदादांनी नुसती माढा मतदार संघातील काँगे्रस कार्यकर्ते व नाराजांची एक बैठक घेतली तर थोरल्या पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, असे फलटणच्या जयकुमार शिंदे यांनी सांगितले. शिवाय सातारा राष्ट्रवादीला तर माढा काँग्रेसला घ्या, अशी मागणी केली.

‘राष्ट्रवादी’वाले तरी कुठं ‘खूश’ आहेत !उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी जिल्ह्यातील सगळे राष्ट्रवादीवाले तरी कुठे खूश आहेत? असा चिमटा अजित पाटील-चिखलीकर यांनी बोलताना काढला; पण आता इलाज नाही. नशिबात आहे ते भोगलं पाहिजे, असे म्हणताच उपस्थितांच्यात हशा पिकला. तर तोच धागा पकडत उदयनराजे आपल्याला परके नाहीत. राष्ट्रवादीत राहून ते आपलंच काम करीत असल्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी बोलताना सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर