शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

शिरवळ-लोणंद रस्ता : संपादित जमिनीच्या जाहीर निवाड्यात अनेकांची नावेच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 18:08 IST

शिरवळ-लोणंद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादित शेतकऱ्यांना मोबदला अद्याप मिळालेला नाही. न्यायालयाने याबाबत दिलेल्या सूचनांची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, प्रशासनाने संपादित जमिनीच्या जाहीर केलेल्या निवाड्यात अनेक खातेदारांची नावेच नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशिरवळ-लोणंद रस्ता : मोबदला अद्याप नाहीअंमलबजावणीत झालेल्या विलंबानंतर महसूल प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या

खंडाळा : शिरवळ-लोणंद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादित शेतकऱ्यांना मोबदला अद्याप मिळालेला नाही. न्यायालयाने याबाबत दिलेल्या सूचनांची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, प्रशासनाने संपादित जमिनीच्या जाहीर केलेल्या निवाड्यात अनेक खातेदारांची नावेच नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीला २०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला देण्याचा न्यायालयाचा निर्णय झाला आहे. याबाबत अंमलबजावणीत झालेल्या विलंबानंतर महसूल प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

वास्तविक संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रात ज्या खातेदारांची नावे सातबाऱ्यावर आहेत. त्यातील अनेकांची नावे जाहीर केलेल्या निवाड्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमित झालेले आहेत. खातेदारांची नावेच नसल्याने भरपाई नक्की कोणाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे शेतकरी कृती समितीने स्पष्ट केले आहे.शिरवळ-बारामती रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दहा वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. यासाठी लागणाऱ्या जमिनीची भसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. या रस्त्याचे शिरवळपासून भादेपर्यंत बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मात्र भादे, वाठार, शेडगेवाडी, अंदोरी, मरीआईचीवाडी या गावांच्या हद्दीतील काम गेली अनेक वर्षे ठप्प आहे. या ठिकाणी संपादित क्षेत्राला योग्य भाव मिळाला पाहिजे. यासाठी काही शेतकऱ्यांनी शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.वास्तविक, २०१३ च्या नवीन सुधारित भूसंपादन कायद्यानुसार संपादित क्षेत्राचा रेडिरेकनर दराप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. तसेच विलंबानुसार व्याजासह रक्कम अदा करावी, असा आदेश न्यायालयाने भूसंपादन विभागाला दिला आहे. त्यानुसार १२/२ च्या नोटिसा दिल्या असल्यातरी प्रत्यक्षात नावांचा घोळ कायम आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत.

रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा, यासाठी कृती समितीने लढा देऊन न्याय मिळविला. यामध्ये विकासकामाला अडचण करण्याची शेतकऱ्यांची कोणतीही भूमिका नव्हती. मात्र, प्रशासन शेतकऱ्यांना अडचण निर्माण करीत आहे. निवाड्यात प्रकल्पग्रस्त सर्वांची नावे समाविष्ट करून तातडीने शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, हीच अपेक्षा आहे .- कुंडलिक दगडे,शेतकरी कृती समिती

टॅग्स :highwayमहामार्गSatara areaसातारा परिसर