शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ

By दीपक शिंदे | Updated: July 5, 2023 17:38 IST

अगोदर शिवेंद्रसिंहराजे नंतर उदयनराजे आणि आता रामराजे

दीपक शिंदेसातारा : नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात साताऱ्यातून करताना शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन गुरुदर्शन घेतले. पण, त्यांचीच काही तत्त्वे अंमलात न आणल्यामुळे त्यांच्यापुढे काही अडचणी निर्माण झाल्या. काळानुसार त्यांनी घेतलेले निर्णय गरजेचे असतीलही, पण त्याचा फटका पक्षाला बसला हे मात्र नक्की. यशवंतराव चव्हाण यांनी राजघराण्याला सत्तेपासून लांब ठेवले होते. सर्वसामान्यांमध्ये सत्ता असली पाहिजे असे त्यांना वाटत होते. पण, शरद पवारांनी राजघराण्याचे जनमानसातील वाढलेले महत्त्व लक्षात घेता राजघराण्यात सत्ता दिली. आता हेच राजे पवारांना सोडून इतर पक्षात गेल्याने राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करताना सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसमध्ये फार मोठी घराणेशाही करण्याचा प्रयत्न केला नाही. किसन वीर, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील यांना सत्तेच्या प्रवाहात सहभागी करून घेतले. जाणीवपूर्वक राजघराण्यांना बाजूला ठेवले. फलटणचे निंबाळकर घराणे राजकारणात असले तरी मालोजीराजे यांच्यानंतर काहीकाळ पोकळी निर्माण झाली होती.साताऱ्यातील राजघराणी लांब जाण्यास केवळ त्यांचाच दोष आहे असेही नाही. तर, शरद पवारांनीदेखील दोन्ही दगडांवर हात ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राजघराण्यांना पक्षात सहभागी करून घेतले तरी सत्तेत सहभागी करून घ्यायला त्यांची फारशी मानसिकता नव्हती. त्यामुळे दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांना सत्तेत सहभागी करून घेतले तरीदेखील फारशी महत्त्वाची पदे मिळाली नाहीत.कोल्हापूरचे राजे पक्षात आले अन् परत गेलेशरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पक्षात घेतले. राजघराण्यांचा सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी वापर करता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढविता येईल यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. पण, राष्ट्रवादीमध्ये ते रमले नाहीत. लोकसभेसाठी त्यांचा पराभव झाला आणि भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली.

शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे अन रामराजेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीनही राजे असल्याने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता. त्याला इतरांचीही साथ मिळत होती. पण, पक्षांतर्गत धुसफुस वाढली. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राष्ट्रवादीकडून फारसा विचार होईना. अजित पवारांनी शब्द दिला तरी शरद पवार ताकद देईनात म्हटल्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत निवडून येऊनही उदयनराजेंनी भाजपचाच झेंडा हातात घेतला. रामराजेंना तर शरद पवारांनी सर्वकाही दिले, पण अखेर तेही सोबत राहिले नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर