शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ

By दीपक शिंदे | Updated: July 5, 2023 17:38 IST

अगोदर शिवेंद्रसिंहराजे नंतर उदयनराजे आणि आता रामराजे

दीपक शिंदेसातारा : नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात साताऱ्यातून करताना शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन गुरुदर्शन घेतले. पण, त्यांचीच काही तत्त्वे अंमलात न आणल्यामुळे त्यांच्यापुढे काही अडचणी निर्माण झाल्या. काळानुसार त्यांनी घेतलेले निर्णय गरजेचे असतीलही, पण त्याचा फटका पक्षाला बसला हे मात्र नक्की. यशवंतराव चव्हाण यांनी राजघराण्याला सत्तेपासून लांब ठेवले होते. सर्वसामान्यांमध्ये सत्ता असली पाहिजे असे त्यांना वाटत होते. पण, शरद पवारांनी राजघराण्याचे जनमानसातील वाढलेले महत्त्व लक्षात घेता राजघराण्यात सत्ता दिली. आता हेच राजे पवारांना सोडून इतर पक्षात गेल्याने राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करताना सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसमध्ये फार मोठी घराणेशाही करण्याचा प्रयत्न केला नाही. किसन वीर, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील यांना सत्तेच्या प्रवाहात सहभागी करून घेतले. जाणीवपूर्वक राजघराण्यांना बाजूला ठेवले. फलटणचे निंबाळकर घराणे राजकारणात असले तरी मालोजीराजे यांच्यानंतर काहीकाळ पोकळी निर्माण झाली होती.साताऱ्यातील राजघराणी लांब जाण्यास केवळ त्यांचाच दोष आहे असेही नाही. तर, शरद पवारांनीदेखील दोन्ही दगडांवर हात ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राजघराण्यांना पक्षात सहभागी करून घेतले तरी सत्तेत सहभागी करून घ्यायला त्यांची फारशी मानसिकता नव्हती. त्यामुळे दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांना सत्तेत सहभागी करून घेतले तरीदेखील फारशी महत्त्वाची पदे मिळाली नाहीत.कोल्हापूरचे राजे पक्षात आले अन् परत गेलेशरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पक्षात घेतले. राजघराण्यांचा सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी वापर करता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढविता येईल यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. पण, राष्ट्रवादीमध्ये ते रमले नाहीत. लोकसभेसाठी त्यांचा पराभव झाला आणि भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली.

शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे अन रामराजेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीनही राजे असल्याने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता. त्याला इतरांचीही साथ मिळत होती. पण, पक्षांतर्गत धुसफुस वाढली. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राष्ट्रवादीकडून फारसा विचार होईना. अजित पवारांनी शब्द दिला तरी शरद पवार ताकद देईनात म्हटल्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत निवडून येऊनही उदयनराजेंनी भाजपचाच झेंडा हातात घेतला. रामराजेंना तर शरद पवारांनी सर्वकाही दिले, पण अखेर तेही सोबत राहिले नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर