विक्रेत्यांनो... तुम्हाला गिऱ्हाईकावर भरवसा नाय काय
By Admin | Updated: July 12, 2017 15:39 IST2017-07-12T15:39:24+5:302017-07-12T15:39:24+5:30
साताऱ्यातील स्थिती : पदपथावर पादचाऱ्यांपेक्षा मंडईचाच बाजार

विक्रेत्यांनो... तुम्हाला गिऱ्हाईकावर भरवसा नाय काय
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि.१३ : लाखो रुपए खर्च करून सातारा नगर पालिकेने बांधलेल्या मंडईत वाणवा आणि पदपथांवर विक्रेत्यांची गर्दी अशी स्थितीत राजवाडा परिसरात दिसत आहे. त्यामुळे विक्रेत्यांनो... तुम्हाला गिऱ्हाईकावर भरवसा नाय काय..? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
शहराचे मुख्य वर्दळीचे ठिकाण म्हणून राजवाडा परिसर अनेकांना परिचित आहे. संध्याकाळी तर या रस्त्यावरून वाहनांबरोबरचं पादचाऱ्यांचीही गर्दी मोठी असते. नेमके याचवेळी पदपथावर मिनी मंडई भरायला सुरूवात झाल्याने पदपथावर चालणे मुश्किल होत असल्याचे चित्र पहायला मिळते.