शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय नवदाम्पत्यांसाठी सातारा जिल्ह्यात सुरक्षा गृह 

By नितीन काळेल | Updated: April 4, 2024 19:03 IST

सुरुवातीला हक्काचा निवारा : शासनाकडून उचलण्यात आले पाऊल 

सातारा : शासनाकडून जातीभेदाच्या भिंती दूर करण्यासाठी प्रयत्न होत असलेतरी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीनेच आंतरजातीय आणि अंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांसाठी जिल्ह्यात सुरक्षा गृह (सेफ हाऊस) उभारण्यात येणार आहे. यामुळे या नवदाम्पत्याला सुरुवातीच्या काळात हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे.समाजात अनेक चालीरीती आहेत. तसेच विविध जाती आहेत. समाजातील जाती-पातीच्या भिंती दूर करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येतात. यासाठी शासनाचेही आर्थिक बळ मिळते. त्यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्श्यातून ५० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येते. पण, असा विवाह करणाऱ्या नवदाम्पत्याला नातेवाईकांच्या त्रासाला सामाेरे जावे लागते.त्यातच आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहानंतर कुटुंबियांच्या विरोधामुळे अनेकांना सुरुवातीच्या काळात स्वत:च्या घरी तसेच गावीही जाता येत नाही. नातेवाईक चुकीचे पाऊलही टाकू शकतात. अशा परीस्थितीत संबंधितांना सुरक्षित निवारा देणाऱ्या केंद्राची गरज असते.यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या गृह विभागाने अंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या दाम्पत्याला संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन करुन जोडप्यांना सुरक्षा गृह उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न केलेल्या दाम्पत्यांसाठी जिल्ह्यात सुरक्षा गृह (सेफ हाऊस) उभारण्यात येणार आहे. यासाठी समाजकल्याण विभागाकडून आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

सुरक्षा पुरविण्यासाठी विशेष कक्ष...

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी विशेष कक्ष असणार आहे. या कक्षाचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक असणार आहेत. तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी सदस्य आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

जास्तीतजास्त एक वर्ष राहता येणार..आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा गृहाची मदत पुरविण्यात येणार आहे. हे सुरक्षा गृह पोलिस संरक्षण देता येईल अशा ठिकाणी असेल. तसेच या दाम्पत्याला सुरुवातीला एक महिन्यासाठी नाममात्र शुल्कावर सुरक्षा गृह उपलब्ध असेल. त्यानंतर प्रकरणाचे गांभिर्य ओळखून जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या नव दाम्पत्यांसाठी सुरक्षा गृह उभारण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव समाजकल्याण आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. या सुरक्षा गृहामुळे आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडप्यांसाठी सुरक्षित निवारा तयार होणार आहे. - डॉ. सपना घोळवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्नHomeसुंदर गृहनियोजन