शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आंतरजातीय नवदाम्पत्यांसाठी सातारा जिल्ह्यात सुरक्षा गृह 

By नितीन काळेल | Updated: April 4, 2024 19:03 IST

सुरुवातीला हक्काचा निवारा : शासनाकडून उचलण्यात आले पाऊल 

सातारा : शासनाकडून जातीभेदाच्या भिंती दूर करण्यासाठी प्रयत्न होत असलेतरी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीनेच आंतरजातीय आणि अंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांसाठी जिल्ह्यात सुरक्षा गृह (सेफ हाऊस) उभारण्यात येणार आहे. यामुळे या नवदाम्पत्याला सुरुवातीच्या काळात हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे.समाजात अनेक चालीरीती आहेत. तसेच विविध जाती आहेत. समाजातील जाती-पातीच्या भिंती दूर करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येतात. यासाठी शासनाचेही आर्थिक बळ मिळते. त्यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्श्यातून ५० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येते. पण, असा विवाह करणाऱ्या नवदाम्पत्याला नातेवाईकांच्या त्रासाला सामाेरे जावे लागते.त्यातच आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहानंतर कुटुंबियांच्या विरोधामुळे अनेकांना सुरुवातीच्या काळात स्वत:च्या घरी तसेच गावीही जाता येत नाही. नातेवाईक चुकीचे पाऊलही टाकू शकतात. अशा परीस्थितीत संबंधितांना सुरक्षित निवारा देणाऱ्या केंद्राची गरज असते.यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या गृह विभागाने अंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या दाम्पत्याला संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन करुन जोडप्यांना सुरक्षा गृह उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न केलेल्या दाम्पत्यांसाठी जिल्ह्यात सुरक्षा गृह (सेफ हाऊस) उभारण्यात येणार आहे. यासाठी समाजकल्याण विभागाकडून आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

सुरक्षा पुरविण्यासाठी विशेष कक्ष...

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी विशेष कक्ष असणार आहे. या कक्षाचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक असणार आहेत. तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी सदस्य आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

जास्तीतजास्त एक वर्ष राहता येणार..आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा गृहाची मदत पुरविण्यात येणार आहे. हे सुरक्षा गृह पोलिस संरक्षण देता येईल अशा ठिकाणी असेल. तसेच या दाम्पत्याला सुरुवातीला एक महिन्यासाठी नाममात्र शुल्कावर सुरक्षा गृह उपलब्ध असेल. त्यानंतर प्रकरणाचे गांभिर्य ओळखून जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या नव दाम्पत्यांसाठी सुरक्षा गृह उभारण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव समाजकल्याण आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. या सुरक्षा गृहामुळे आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडप्यांसाठी सुरक्षित निवारा तयार होणार आहे. - डॉ. सपना घोळवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्नHomeसुंदर गृहनियोजन