शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

रेवंडे खुनात ‘लोकमत’ वृत्त ठरले ‘सुमोटो’ सातारा पोलिसांकडून गुन्हा दाखल : एकाला अटक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:05 AM

सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या लक्ष्मण बाबूराव माने (वय ४९, रा. रेवंडे, ता. सातारा) यांचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.

ठळक मुद्देपरस्पर न्यायनिवाडा करणाऱ्या पंचांचा पर्दाफाश

दत्ता यादव ।सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या लक्ष्मण बाबूराव माने (वय ४९, रा. रेवंडे, ता. सातारा) यांचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.

‘लोकमत’च्या या वृत्ताची दखल घेऊन ‘सुमोटो’द्वारे पोलिसांनी गुरुवारी पहाटे पावणेदोन वाजता खुनाचा गुन्हा दाखल करून एकाला अटकही केली.जितेंद्र हणमंत भोसले (वय ३३, रा. रेवंडे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ‘खूनप्रकरणी गावात समांतर न्यायालय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या अजब घटनेने समाजमन ढवळून निघाले. अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे ‘लोकमत’ने पंच कमिटीच्या निर्णयाची प्रत सादर केली. त्यावेळी तेही हा अजब न्यायनिवाडा पाहून चकीत झाले.

तक्रारदार नसेल तरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये ‘सुमोटो’ने तक्रार देणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करतच त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. अधीक्षकांनी अधिकाºयांना सुनावल्यानंतर रेवंडे येथे टीम दाखल झाली. त्यानंतर पुढील सुत्रे हालली. त्यानंतर पंच कमिटीचा पर्दाफाश पोलिसांनी केला.

या प्रकरणामध्ये पोलीस हेड कान्स्टेबल हणमंत सावंत यांनी स्वत: तक्रार दिली असून, तक्रारीत म्हटले आहे की, पीडित मुलीचा विनयभंग केल्याच्या कारणावरून लक्ष्मण बाबूराव माने हे दारूच्या नशेत जितेंद्र भोसले याला गावात रस्त्याने येता जाता शिवीगाळ करीत होते. या कारणावरून २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रेवंडे गावातील मुख्य रस्त्यावर जितेंद्र भोसले याने लक्ष्मण माने यांच्या डोक्यात कशाने तरी जखम करून त्यांना ठार मारले.पंच कमिटीने न्यायनिवाड्याची प्रत केली सादरखुनासारख्या गंभीर घटनेचा न्यायनिवाडा चक्क गावात होतो, हे कायद्याला आव्हान देण्यासारखे होते. गुन्हा कबूल करून पंच कमिटी जो निर्णय देईल, तो संशयितांनी मान्य केला होता. या अजब न्यायनिवाड्याची प्रत सुरुवातीलाच ‘लोकमत’ने पोलीस अधीक्षकांकडे सादर केली होतीच; परंतु खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वत: पंच कमिटीच्या सदस्याने मूळ प्रत तपासी अधिकारी प्रदीपकुमार जाधव यांच्याकडे सादर केली. त्यामुळे आता तपासाला गती मिळणार आहे.तिघांचे जबाब पूर्णखून झाल्यानंतर लक्ष्मण माने यांच्यावर तातडीने अत्यंसंस्कार करण्यात आले असून, पुरावा शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांनी सध्या बाबूराव माने, रुक्मिणी माने, विनोद भोसले यांचे जबाब घेतले आहेत. पंच कमिटीतील तेरा जणांचे अद्यापही जबाब घेणे बाकी आहे. हे जबाब पूर्ण झाल्यानंतर या खून प्रकरणातील नेमकी माहिती समोर येणार आहे.काय आहे रेवंडी प्रकरण...महाविद्यालयात जाताना एका अल्पवयीन मुलीची तरुणाने छेड काढली होती. त्यानंतर हा प्रकार तिने आपल्या चुलत्याला सांगितला. संबंधित चुलत्याने मुलाला याचा जाब विचारून गावच्या पाराजवळ येऊन शिवीगाळ केली. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी पीडित मुलीचा चुलता रात्री साडेनऊच्या सुमारास ‘दरडी’ नामक भागात मृतावस्थेत आढळून आला होता.या प्रकारानंतर गावकºयांमध्ये खळबळ उडाली. एवढेच नव्हे तर घाईघाईत अत्यंविधीही उरकला गेला. या प्रकाराची माहिती बाहेर पडू नये म्हणून प्रचंड खबरदारी घेऊन तातडीची बैठकही बोलविली गेली. या बैठकीमध्ये दोन्ही कुटुंबांसह काही गावकरी होते. ‘माझ्या मुलीची छेड काढली म्हणून जाब विचारायला गेल्यामुळेच संबंधितांनी माझ्या भावाला मारहाण केली. हेच लोक त्याला जबाबदार आहेत,’ असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी या बैठकीत संबंधितांवर केला होता.या बैठकीमध्ये पंच कमिटी तयार करण्यात आली. या कमिटीने कागदावर अकरा जणांच्या सह्या घेतल्या. त्यामध्ये ‘आमच्यावर केलेला आरोप कबूल असून, या गोष्टीबद्दल ग्रामस्थ जो निर्णय ठरवतील, तो आम्हाला मान्य आहे,’ असे संबंधित संशयितांनी लिहून दिले. खुनासारखा गुन्हा होऊनही पंच कमिटी परस्पर शिक्षा देणारी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता.