शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

सातारची पोरं खातायंत पौष्टिक डबा

By admin | Updated: July 5, 2017 13:08 IST

शाळांमधील चित्र : कॅन्टीन नसल्यामुळे विद्यार्थ्यांना डब्यात पोळी भाजी आणण्याची सक्ती

सातारा : बदललेल्या खाद्य संस्कृतीचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसू लागल्याने गत महिन्यात महाराष्ट्र शासनाने शाळांच्या कॅन्टीनमध्ये जंक फुड बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांची पाहणी केली असता बहुतांश शाळांमध्ये कॅन्टीन नाही आणि जिथे कॅन्टीन आहे, तिथे विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक अन्न मिळत असल्याचे चित्र दिसले. काही शाळांनी तर विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये पोळी भाजी सक्तीने आणण्याची सूचनाही लिहून दिल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीबरोबरच खाद्यसंस्कृतीही बदल चालली आहे. घरात शिजवलेले, सकस आणि पौष्टिक अन्नाची जागा जंक फुडने घेतली आहे. घरातल्या मोठ्या माणसांच्या बरोबरीने लहान मुलेही मिटक्या मारत हे पदार्थ खाताना दिसतात. यामुळे लहान वयात वजन वाढणे आणि वाढत्या वजनाबरोबरीने येणारे आजार मुलांना जडत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्य शासनाने जंक फूड, अधिक शर्करा असणारे, मीठ अतिप्रमाणात असलेले, मेदयुक्त पदार्थांवर बंदी घातली होती. त्याऐवजी डब्यात पोळी भाजीसारखा आहार द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता.

सातारा शहरात माध्यमिक सैनिक स्कूल ही निवासी शाळा आहे. तर सिनर्जी आणि युनिव्हर्सल या दोन शाळांमध्ये कॅन्टीन आहे. या दोन्ही शाळांच्या कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या आहाराचा चार्ट लावण्यात आला आहे. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांना रोजच्या रोज सकस अन्न मिळत असल्याचे चित्र दिसले.

शाळेच्या बाहेर दुकानांची गर्दी

 

शहरात बहुतांश शाळांच्या बाहेर जंक फुड विक्री जोरदार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थी वाहतूक वाहनातून उतरणाऱ्या मुलांचा जथ्थाच्या जथ्था या दुकानांमध्ये गर्दी करतो. शाळा भरण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर या दुकानांमध्ये तुडुंब गर्दी असते. ज्या विद्यार्थ्यांनी डबा आणला नाही, ते विद्यार्थी शाळेची परवानगी घेऊन बाहेरून वेफर्स, वडापाव यासारखे पदार्थ आणून खात असल्याचे पाहायला मिळाले.

वडापाव पार्टी ठरलेली

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या काही शाळा परिसरात वडापावचा धंदा जोरात चालत असल्याचे चित्र दिसते. माध्यमिक शाळांतील विद्यार्थी वडापाव खाण्याकडे अधिक वळतात. कित्येकदा मित्राचा वाढदिवस साजरा करण्याचं ठिकाण म्हणून ही वडापावच्या गाडीचा आसरा घेतला जातो. शाळा भरण्यापूर्वी, मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यानंतर असं तीन वेळेला वडापावची भट्टी पेटते. काहींनी तर वडापाव उधारीवर घेऊन त्याची स्वतंत्र वहीही घातली असल्याचे स्पष्ट झाले.

विद्यार्थ्यांवर सक्ती... शिक्षकांचेही लक्ष

शहरातील अनेक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने डब्यात पोळी भाजी आणण्याच्या सूचना केल्या होत्या. प्राथमिक स्तरावर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये ही सूचना लिहून दिली होती. विद्यार्थी डब्यात काय आणतात, हे पाहण्याची जबाबदारी त्या वगार्तील विद्यार्थ्यांकडे दिली जाते. जर कोणी पोळी भाजी व्यतिरिक्त काहीही अन्य खाद्य पदार्थ आणला असेल तर तो जप्त करतात. तर वगार्तील सर्व त्याला आपल्या डब्यातील खाऊ देतात. त्यानंतर त्याच्या पालकाला डायरीमध्ये याविषयी तक्रार लिहून दिली जाते.

अतिरिक्त क्लास अन् जंक फुड!

माध्यमिक वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना पालकांनी भरमसाठ खासगी क्लासेस लावले आहेत. त्यामुळे सकाळी सहा वाजता गेलेली लेकरं संध्याकाळी सात वाजताच घरी येतात. घरातून सकाळी लवकर तयार करून घेतलेला डबा दुपारपर्यंत गार होतो. एकच भाजी दोन-दोनदा खाणे अहस्य होते. त्यामुळे शाळे बाहेर मिळणारा वडापाव, सामोसा हे पर्याय आम्हाला बरे वाटतात, असे एक विद्यार्थी लोकमतशी बोलताना म्हणाला.

पालकांची धावपळ अन् डब्याचा शॉर्टकट

नोकरी आणि व्यवसायाच्या मागे लागलेल्या पालकांना विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळावे हे कितीही वाटत असले तरीही शाळेच्या वेळेत ते तयार होणं अवघड झाले आहे. त्यामुळे काहीदा विद्यार्थ्यांच्या डब्यात शिळे अन्नही शिक्षकांना आढळले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर हे अन्न नासते आणि विद्याथ्यार्ला उपाशी राहावे लागते. पालकांच्या व्यस्त दिनचयेर्मुळे ते मुलांच्या डब्याला शॉर्टकट शोधतात आणि मग घरातील शिळी चपाती किंवा शिल्लक राहिलेली आदल्या दिवशीची भाजी त्यांच्या डब्यात जाते.