शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

सातारा : तळहिरा तलावातून पाण्याची राजरोस चोरी, पाणीसाठा खालावला : तीन गावांत पाणी टंचाईचे सावट; इलेक्ट्रिक मोटारीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 1:09 PM

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळहिरा पाझर तलावातून इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात या भागाला पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

ठळक मुद्देपाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट लक्ष न दिल्यास भविष्यात पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय नाहीइलेक्ट्रिक मोटारी टाकून दिवस-रात्र तलावातील पाणी चोरण्याचा धक्कादायक प्रकार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळहिरा पाझर तलावातून इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात या भागाला पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.यावर्षी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे तळहिरा तलावात कमी पाणीसाठा झाला. परिणामी या तलावावर अवलंबून असलेल्या अनेक गावांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे.

कारण असलेला पाणीसाठा टिकला तरच उन्हाळ्यातील काही महिने या परिसरातील गावांची तहान भागणार आहे. मात्र, सध्या दिवस-रात्र या तलावातील पाणी इलेक्ट्रिक मोटारी टाकून चोरण्याचा धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू आहे. हे पाणी दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे.

वाठार स्टेशन, तळिये व देऊर या प्रमुख तीन गावांची तहान भागवणारा हा तळहिरा तलाव आहे. गेल्या पाच वर्षांत पूर्ण क्षमतेने कधीच भरला नाही. चालू वर्षीही जिल्ह्यातील सर्वच मोठी धरणे, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले असताना तळहिरा तलावात मात्र केवळ ३० टक्के एवढाच पाणीसाठा झाला आहे.

यातून देऊरमधील हंगामी शेती तसेच परवानाधारक शेतकरी यांच्यासाठी या पाणी सोडले गेले तर या तलावात पाणीच शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या या तलावात परवानाधारक शेतकºयांशिवाय अनेक बिनापरवाना मोटारीद्वारे या तलावातील पाणी शेतीसाठी वापरले जात आहे.देऊर व तळिये गावात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या तलावात गेल्या त्यांच्यासाठी या तलावातून पाणी देण्याची व्यवस्था असल्याने शेतीसाठी हे पाणी हे शेतकरी वापरत आहेत; परंतु असणाऱ्या परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी चोरी होत असल्याने या तलावातील पाणी रातोरात कमी होऊ लागले आहे. याला संबंधित पाटबंधारे विभागाने आळा घातला नाही तर असणारा पाणीसाठा अगदी काही दिवसांतच संपुष्टात येईल, अशी परिस्थिती आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी