शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

पाऊस आला धावून; टँकरची संख्या २१८ वरून आली ३२ वर! ४३ गावे अन् १६३ वाड्यांनाच पुरवठा

By नितीन काळेल | Updated: June 25, 2024 19:50 IST

Satara News: जून महिन्यात वेळेमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. टँकरची संख्याही २१८ वरून ३२ पर्यंत खाली आली आहे, तर सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांनाच पाणीपुरवठा केला जात असून, फलटण, कऱ्हाड, खंडाळा तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

- नितीन काळेलसातारा - जून महिन्यात वेळेमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. टँकरची संख्याही २१८ वरून ३२ पर्यंत खाली आली आहे, तर सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांनाच पाणीपुरवठा केला जात असून, फलटण, कऱ्हाड, खंडाळा तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली, तसेच टंचाईही वाढली होती. यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासूनच अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता, तर मार्चनंतर टंचाईची दाहकता अधिक वाढली. यामुळे अडीच लाख नागरिकांना टँकरच्याच पाण्याचा आधार होता. मात्र, जून महिन्यात वेळेत मान्सून दाखल झाला, तसेच बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे.

जिल्ह्यात ७ जून रोजी २१८ गावे आणि ७१७ वाड्यावस्त्यांना टँकरने, तसेच विहिरी, बोअरवेल अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यासाठी २१८ टँकरचा धुरळा पाणीपुरवठा करण्यासाठी उडत होता. मात्र, याचदरम्यान पावसाला सुरुवात झाल्यानंतर टँकरची संख्या कमी झाली. सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांची तहान टँकर आणि अधिग्रहण केलेल्या विहिरींवर अवलंबून आहे. माण तालुक्यात टंचाई कमी झाली असली तरी सध्या २२ गावे आणि १५३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येतोय. १६ टँकरवर ५१ हजार नागरिकांची तहान भागत आहे. तालुक्यातील पांगरी, मोही, शेवरी, राणंद, भाटकी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, रांजणी, हिंगणी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, पर्यंती, इंजबाव, परकंदी आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा होतोय, तर खटाव तालुक्यात फक्त ६ गावे आणि ४ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. मोळ, मांजरवाडी, नवलेवाडी, गारुडी, गारळेवाडी येथे टँकर सुरू आहेत. फलटण तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने टंचाई निवारण झाले. त्यामुळे टँकर बंद झाले. कोरेगाव तालुक्यात ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १६ हजार नागरिक आणि १० हजार पशुधन टँकरवर अवलंबून आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टंचाई अजून कायम आहे.

खंडाळा तालुक्यात टँकर बंद झाले; पण वाई तालुक्यात अजूनही ५ गावे आणि ६ वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत. ३ टँकरवर ५ हजार नागरिक आणि ३ हजार ७११ जनावरांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यात टँकर सुरू नाही. जावळीत एकाच गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड तालुक्यात एकही टँकर सुरू नाही.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर