शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

पाऊस आला धावून; टँकरची संख्या २१८ वरून आली ३२ वर! ४३ गावे अन् १६३ वाड्यांनाच पुरवठा

By नितीन काळेल | Updated: June 25, 2024 19:50 IST

Satara News: जून महिन्यात वेळेमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. टँकरची संख्याही २१८ वरून ३२ पर्यंत खाली आली आहे, तर सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांनाच पाणीपुरवठा केला जात असून, फलटण, कऱ्हाड, खंडाळा तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

- नितीन काळेलसातारा - जून महिन्यात वेळेमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. टँकरची संख्याही २१८ वरून ३२ पर्यंत खाली आली आहे, तर सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांनाच पाणीपुरवठा केला जात असून, फलटण, कऱ्हाड, खंडाळा तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली, तसेच टंचाईही वाढली होती. यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासूनच अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता, तर मार्चनंतर टंचाईची दाहकता अधिक वाढली. यामुळे अडीच लाख नागरिकांना टँकरच्याच पाण्याचा आधार होता. मात्र, जून महिन्यात वेळेत मान्सून दाखल झाला, तसेच बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे.

जिल्ह्यात ७ जून रोजी २१८ गावे आणि ७१७ वाड्यावस्त्यांना टँकरने, तसेच विहिरी, बोअरवेल अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यासाठी २१८ टँकरचा धुरळा पाणीपुरवठा करण्यासाठी उडत होता. मात्र, याचदरम्यान पावसाला सुरुवात झाल्यानंतर टँकरची संख्या कमी झाली. सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांची तहान टँकर आणि अधिग्रहण केलेल्या विहिरींवर अवलंबून आहे. माण तालुक्यात टंचाई कमी झाली असली तरी सध्या २२ गावे आणि १५३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येतोय. १६ टँकरवर ५१ हजार नागरिकांची तहान भागत आहे. तालुक्यातील पांगरी, मोही, शेवरी, राणंद, भाटकी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, रांजणी, हिंगणी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, पर्यंती, इंजबाव, परकंदी आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा होतोय, तर खटाव तालुक्यात फक्त ६ गावे आणि ४ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. मोळ, मांजरवाडी, नवलेवाडी, गारुडी, गारळेवाडी येथे टँकर सुरू आहेत. फलटण तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने टंचाई निवारण झाले. त्यामुळे टँकर बंद झाले. कोरेगाव तालुक्यात ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १६ हजार नागरिक आणि १० हजार पशुधन टँकरवर अवलंबून आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टंचाई अजून कायम आहे.

खंडाळा तालुक्यात टँकर बंद झाले; पण वाई तालुक्यात अजूनही ५ गावे आणि ६ वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत. ३ टँकरवर ५ हजार नागरिक आणि ३ हजार ७११ जनावरांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यात टँकर सुरू नाही. जावळीत एकाच गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड तालुक्यात एकही टँकर सुरू नाही.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर