शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

साताऱ्यात मान्सून ६५ टक्केच बरसला, दुष्काळ गंभीर बनला

By नितीन काळेल | Updated: November 20, 2023 18:55 IST

परतीच्या पावसाचीही हुलकावणी; प्रशासनाचे नियोजन, दुष्काळी तालुके हवालदिल

सातारा : जिल्ह्याला मान्सूनने दगा दिल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यात अवघा ६५ टक्के पाऊस बरसला. त्यामुळे यंदा तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्यातच सर्वच तालुक्यातही कमी पर्जन्यमान झाले असून परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे दुष्काळी भागात पाझर तलाव, ओढे कोरडे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन सुरू असून जनता हवालदिल झालेली आहे.सातारा जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे गणित सुरू होते. यंदा मात्र, हवामान विभागाने चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविलेला. पण, सातारा जिल्ह्यासाठी तरी हा अंदाज खोटा ठरलेला आहे. कारण, जूनपासून सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्याच्या चार महिन्यात पावसाने सतत दगा दिला. मोठा पाऊस नसल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यात जिल्ह्यात फक्त ६५.०४ टक्केच पर्जन्यमानाची नोंद झाली.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८८६.०२ मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. यंदा ३० सप्टेंबरअखेर फक्त ५७९.६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती. याचाच अऱ्थ यावर्षी तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्याचबरोबर सर्वच तालुक्यात कमी पावसाची नोंद झाली. यंदा कोणत्याही तालुक्यात १०० टक्के पाऊस झालेला नाही. यामध्ये सर्वात कमी पाऊस कोरेगाव तालुक्यात ४८ टक्केच झाला. तर सर्वाधिक पाऊस सातारा तालुक्यात ७६ टक्क्यांपर्यंत पडला आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील पावसाची स्थिती समजून येते.

दुष्काळी तालुके हवालदिल..दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यात पावसाने डोळे वटारलेले दिसून आले. यामुळे या तालुक्यात चिंताजनक स्थिती आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत कोरेगाव तालुक्यात ४८.०१ टक्के पाऊस झाला. तर माणमध्ये ६१.५, खटाव ६८.६, फलटण ४९.१, खंडाळा तालुक्यात ५२.५ टक्के पाऊस पडला आहे. यामुळे चारा टंचाई जाणवणार आहे. त्याचबरोबर माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळRainपाऊस