शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

साताऱ्यात मान्सून ६५ टक्केच बरसला, दुष्काळ गंभीर बनला

By नितीन काळेल | Updated: November 20, 2023 18:55 IST

परतीच्या पावसाचीही हुलकावणी; प्रशासनाचे नियोजन, दुष्काळी तालुके हवालदिल

सातारा : जिल्ह्याला मान्सूनने दगा दिल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यात अवघा ६५ टक्के पाऊस बरसला. त्यामुळे यंदा तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्यातच सर्वच तालुक्यातही कमी पर्जन्यमान झाले असून परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे दुष्काळी भागात पाझर तलाव, ओढे कोरडे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन सुरू असून जनता हवालदिल झालेली आहे.सातारा जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे गणित सुरू होते. यंदा मात्र, हवामान विभागाने चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविलेला. पण, सातारा जिल्ह्यासाठी तरी हा अंदाज खोटा ठरलेला आहे. कारण, जूनपासून सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्याच्या चार महिन्यात पावसाने सतत दगा दिला. मोठा पाऊस नसल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यात जिल्ह्यात फक्त ६५.०४ टक्केच पर्जन्यमानाची नोंद झाली.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८८६.०२ मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. यंदा ३० सप्टेंबरअखेर फक्त ५७९.६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती. याचाच अऱ्थ यावर्षी तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्याचबरोबर सर्वच तालुक्यात कमी पावसाची नोंद झाली. यंदा कोणत्याही तालुक्यात १०० टक्के पाऊस झालेला नाही. यामध्ये सर्वात कमी पाऊस कोरेगाव तालुक्यात ४८ टक्केच झाला. तर सर्वाधिक पाऊस सातारा तालुक्यात ७६ टक्क्यांपर्यंत पडला आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील पावसाची स्थिती समजून येते.

दुष्काळी तालुके हवालदिल..दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यात पावसाने डोळे वटारलेले दिसून आले. यामुळे या तालुक्यात चिंताजनक स्थिती आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत कोरेगाव तालुक्यात ४८.०१ टक्के पाऊस झाला. तर माणमध्ये ६१.५, खटाव ६८.६, फलटण ४९.१, खंडाळा तालुक्यात ५२.५ टक्के पाऊस पडला आहे. यामुळे चारा टंचाई जाणवणार आहे. त्याचबरोबर माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळRainपाऊस