शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

साताऱ्याचा पारा पुन्हा घसरला, १५ अंशाची नोंद; थंडीतही चढ-उतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 17:37 IST

सातारकरांना यावर्षी लवकर थंडीला सामोरे जावे लागले

सातारा : जिल्ह्यात दिवाळीच्यावेळी गारठा वाढला होता. मात्र, मागील सहा दिवसांपासून किमान तापमान कधी कमी, तर कधी अधिक नोंद होत आहे. यामुळे थंडीतही चढ-उतार होत आहे, तर साताऱ्याचा पारा पुन्हा घसरला असून मंगळवारी १५ अंशाची नोंद झाली.जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस पडतो. त्यामुळे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात थंडी जाणवण्यास सुरुवात होते. मात्र, यावर्षी दहा दिवस अगोदरच थंडीला सुरुवात झाली आहे. कारण, ऑक्टोबर महिना असतानाही ‘हिट’ जाणवली नाही. ऑक्टोबर महिन्याच्या २० तारखेपर्यंत परतीचा पाऊसच पडत होता. यामुळे पावसाळी वातावरण होते. त्यातच सतत साडेचार महिने पाऊस असल्याने जिल्हावासीयांना नकोसे झालेले, पण दिवाळीच्या अगोदर काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडीप राहिली. त्यामुळे वातावरणात एकदम बदल होऊन पारा घसरला.जिल्ह्यात दिवाळीची धामधूम सुरू असतानाच गुलाबी थंडीची चाहूल लागली. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच थंडी जाणवू लागली होती. त्यातच शीतलहर असल्याने दिवसाही गारठा चांगला जाणवू लागला. त्यानंतरही आठ दिवस जिल्ह्यात चांगलीच थंडी जाणवत होती. किमान तापमान १५ अंशाच्या खाली आले होते. सातारा शहराचा पारा तर १४ अंशाच्या दरम्यान राहिला होता. त्यामुळे सातारकरांना यावर्षी लवकर थंडीला सामोरे जावे लागले. असे असतानाच सहा दिवसांपासून किमान तापमान वाढले आहे. साताऱ्यातील किमान तापमान तर २० अंशावर गेले होते. त्यानंतर पारा काही अंशाने घसरला. मंगळवारी तर १५ अंशाची नोंद झाली, तर महाबळेश्वरचा पारा १८.०६ अंश होता.

सातारा शहरातील किमान तापमान असे :दि. २५ ऑक्टोबर १४.०१, २६ ऑक्टोबर १४.०८, २७ ऑक्टोबर १५.०१, दि. २८ ऑक्टोबर १४.०८, २९ ऑक्टोबर १५.०२, ३० ऑक्टोबर १४.०३, ३१ ऑक्टोबर १४.०२, दि. १ नोव्हेंबर १४.०४, २ नोव्हेंबर १७.०३, ३ नोव्हेंबर २०.०४, दि. ४ नोव्हेंबर १७.०९, ५ नोव्हेंबर १६.०३, ६ नोव्हेंबर १६.०९ , ७ नोव्हेंबर १५.०५ आणि ७ नोव्हेंबर १५.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान