शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सातारा : अन्नदात्यासाठी होणार अन्नत्याग आंदोलन, १ मार्चपासून शेतकरी संघटना आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:57 IST

सरसकट कर्जमुक्तीची गनिमी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली. वास्तविक शासनाने कर्जमुक्ती नव्हे तर करवसुलीचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ मार्चपासून विविध टप्प्यांवर आंदोलन आक्रमक करून शासनाला जाब विचारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकरी संघटना आक्रमक, अन्नदात्यासाठी होणार अन्नत्याग आंदोलन१ मार्चपासून विविध आंदोलनाद्वारे होणार शेतकरी हिताची लढाई

सातारा : सरसकट कर्जमुक्तीची गनिमी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली. वास्तविक शासनाने कर्जमुक्ती नव्हे तर करवसुलीचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ मार्चपासून विविध टप्प्यांवर आंदोलन आक्रमक करून शासनाला जाब विचारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.रघुनाथ पाटील म्हणाले, राज्यभरात जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्जमाफी झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना आले. प्रत्यक्षात मात्र, कर्जमाफी झालीच नाही. आधी बाकीचे पैसे भरा मगच शासनाचे दीड लाख रुपये तुमच्या हातात देऊ, अशी भाषा बँकेकडून वापरली जाऊ लागली आहे.

या सर्व मनमानीला आळा घालण्यासाठी शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटना एकत्र आली असून, त्या माध्यमातून आंदोलन छेडले जाणार आहे. यावेळी गणेश जगताप, कालीदास आपटे, सीमा परदेशी, विकास जाधव, अंकुश देशमुख, दीपक मोरे, भगवान पालव, शिवाजी कोळेकर, राजनंदन शिंदे, प्रकाश फडतरे उपस्थित होते.

असे आहेत आंदोलनाचे टप्पे१. शेतकऱ्यांच्या वीज बिलापेक्षा जास्तीची रक्कम शासनाने वीज मंडळाकडे जमा केली आहे. त्यामुळे शेतकरी आता घरगुती वापराच्या विजेचे बिल भरणार नाहीत. जे अधिकारी वीज तोडायला येतील त्यांना काळे फासण्याचे आंदोलन राज्यभरात १ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.२. इस्लामपूर येथील साहेबराव करपे आणि मालती करपे या शेतकरी जोडप्याने आपल्या चारही लेकरांना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. १९ मार्च १९८६ रोजी झालेल्या या घटनेला ३२ वर्षे झाली. १९८६ ते २०१८ पर्यंत राज्यात ७५ हजार लोकांनी आहुती दिली आहे. शासनाच्या निष्क्रीयतेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर १९ मार्चला अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.३. देशाच्या स्वातंत्र्यात आपले तारुण्य कामी लावणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतींना अभिवादन करून २३ मार्चपासून सांगली येथून हुतात्मा अभिवादन दौरा काढण्यात येणार आहे. याची सांगता २७ मार्चला पुण्यात सभा घेऊन होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५ संघांच्या मदतीने ४ दिवसांत ७५० सभांचे नियोजन करण्यात आले आहे.४. कामगार दिनाच्या आदल्यादिवशी म्हणजेच ३० एप्रिलला राज्यभरातून २५ लाख शेतकऱ्यांना एकत्रित करून मुंबईत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीChakka jamचक्काजाम