शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सातारा : अन्नदात्यासाठी होणार अन्नत्याग आंदोलन, १ मार्चपासून शेतकरी संघटना आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:57 IST

सरसकट कर्जमुक्तीची गनिमी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली. वास्तविक शासनाने कर्जमुक्ती नव्हे तर करवसुलीचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ मार्चपासून विविध टप्प्यांवर आंदोलन आक्रमक करून शासनाला जाब विचारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकरी संघटना आक्रमक, अन्नदात्यासाठी होणार अन्नत्याग आंदोलन१ मार्चपासून विविध आंदोलनाद्वारे होणार शेतकरी हिताची लढाई

सातारा : सरसकट कर्जमुक्तीची गनिमी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली. वास्तविक शासनाने कर्जमुक्ती नव्हे तर करवसुलीचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ मार्चपासून विविध टप्प्यांवर आंदोलन आक्रमक करून शासनाला जाब विचारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.रघुनाथ पाटील म्हणाले, राज्यभरात जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्जमाफी झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना आले. प्रत्यक्षात मात्र, कर्जमाफी झालीच नाही. आधी बाकीचे पैसे भरा मगच शासनाचे दीड लाख रुपये तुमच्या हातात देऊ, अशी भाषा बँकेकडून वापरली जाऊ लागली आहे.

या सर्व मनमानीला आळा घालण्यासाठी शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटना एकत्र आली असून, त्या माध्यमातून आंदोलन छेडले जाणार आहे. यावेळी गणेश जगताप, कालीदास आपटे, सीमा परदेशी, विकास जाधव, अंकुश देशमुख, दीपक मोरे, भगवान पालव, शिवाजी कोळेकर, राजनंदन शिंदे, प्रकाश फडतरे उपस्थित होते.

असे आहेत आंदोलनाचे टप्पे१. शेतकऱ्यांच्या वीज बिलापेक्षा जास्तीची रक्कम शासनाने वीज मंडळाकडे जमा केली आहे. त्यामुळे शेतकरी आता घरगुती वापराच्या विजेचे बिल भरणार नाहीत. जे अधिकारी वीज तोडायला येतील त्यांना काळे फासण्याचे आंदोलन राज्यभरात १ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.२. इस्लामपूर येथील साहेबराव करपे आणि मालती करपे या शेतकरी जोडप्याने आपल्या चारही लेकरांना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. १९ मार्च १९८६ रोजी झालेल्या या घटनेला ३२ वर्षे झाली. १९८६ ते २०१८ पर्यंत राज्यात ७५ हजार लोकांनी आहुती दिली आहे. शासनाच्या निष्क्रीयतेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर १९ मार्चला अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.३. देशाच्या स्वातंत्र्यात आपले तारुण्य कामी लावणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतींना अभिवादन करून २३ मार्चपासून सांगली येथून हुतात्मा अभिवादन दौरा काढण्यात येणार आहे. याची सांगता २७ मार्चला पुण्यात सभा घेऊन होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५ संघांच्या मदतीने ४ दिवसांत ७५० सभांचे नियोजन करण्यात आले आहे.४. कामगार दिनाच्या आदल्यादिवशी म्हणजेच ३० एप्रिलला राज्यभरातून २५ लाख शेतकऱ्यांना एकत्रित करून मुंबईत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीChakka jamचक्काजाम