शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

सातारा : अन्नदात्यासाठी होणार अन्नत्याग आंदोलन, १ मार्चपासून शेतकरी संघटना आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:57 IST

सरसकट कर्जमुक्तीची गनिमी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली. वास्तविक शासनाने कर्जमुक्ती नव्हे तर करवसुलीचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ मार्चपासून विविध टप्प्यांवर आंदोलन आक्रमक करून शासनाला जाब विचारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकरी संघटना आक्रमक, अन्नदात्यासाठी होणार अन्नत्याग आंदोलन१ मार्चपासून विविध आंदोलनाद्वारे होणार शेतकरी हिताची लढाई

सातारा : सरसकट कर्जमुक्तीची गनिमी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली. वास्तविक शासनाने कर्जमुक्ती नव्हे तर करवसुलीचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ मार्चपासून विविध टप्प्यांवर आंदोलन आक्रमक करून शासनाला जाब विचारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.रघुनाथ पाटील म्हणाले, राज्यभरात जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्जमाफी झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना आले. प्रत्यक्षात मात्र, कर्जमाफी झालीच नाही. आधी बाकीचे पैसे भरा मगच शासनाचे दीड लाख रुपये तुमच्या हातात देऊ, अशी भाषा बँकेकडून वापरली जाऊ लागली आहे.

या सर्व मनमानीला आळा घालण्यासाठी शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटना एकत्र आली असून, त्या माध्यमातून आंदोलन छेडले जाणार आहे. यावेळी गणेश जगताप, कालीदास आपटे, सीमा परदेशी, विकास जाधव, अंकुश देशमुख, दीपक मोरे, भगवान पालव, शिवाजी कोळेकर, राजनंदन शिंदे, प्रकाश फडतरे उपस्थित होते.

असे आहेत आंदोलनाचे टप्पे१. शेतकऱ्यांच्या वीज बिलापेक्षा जास्तीची रक्कम शासनाने वीज मंडळाकडे जमा केली आहे. त्यामुळे शेतकरी आता घरगुती वापराच्या विजेचे बिल भरणार नाहीत. जे अधिकारी वीज तोडायला येतील त्यांना काळे फासण्याचे आंदोलन राज्यभरात १ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.२. इस्लामपूर येथील साहेबराव करपे आणि मालती करपे या शेतकरी जोडप्याने आपल्या चारही लेकरांना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. १९ मार्च १९८६ रोजी झालेल्या या घटनेला ३२ वर्षे झाली. १९८६ ते २०१८ पर्यंत राज्यात ७५ हजार लोकांनी आहुती दिली आहे. शासनाच्या निष्क्रीयतेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर १९ मार्चला अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.३. देशाच्या स्वातंत्र्यात आपले तारुण्य कामी लावणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतींना अभिवादन करून २३ मार्चपासून सांगली येथून हुतात्मा अभिवादन दौरा काढण्यात येणार आहे. याची सांगता २७ मार्चला पुण्यात सभा घेऊन होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५ संघांच्या मदतीने ४ दिवसांत ७५० सभांचे नियोजन करण्यात आले आहे.४. कामगार दिनाच्या आदल्यादिवशी म्हणजेच ३० एप्रिलला राज्यभरातून २५ लाख शेतकऱ्यांना एकत्रित करून मुंबईत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीChakka jamचक्काजाम