शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 12:30 IST

अजून दोन महिने बाकी : आतापर्यंत सरासरी ११०० मिलीमीटर पाऊस  

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने थैमान घातले असून आतापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडून ११००  मिलीमीटरचा टप्पही पार केला आहे. त्यामुळे पावाळ्याचे अजून पावणे दोन महिने पाहता पावसाची वाटचाल ही २००५ च्या पर्जन्यमानाकडे सुरू असल्याचे दिसत आहे. कारण, त्यावेळी तब्बल २ हजार ८७ मिलीमीटर पाऊस झालेला. 

जिल्ह्यातील पावसाची जून ते सप्टेंबर दरम्यानच्या चार महिन्यातील पावसाची सरासरी  ८३४ मिलीमीटर आहे. त्या तुलनेत दरवर्षी कमी अधिक पाऊस पडत असतो. पण, यंदा या पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडलीय.  ५ ऑगस्टपर्यंत पाऊस ९३६ मिलीमीटर होऊन ११२ टक्के सरासरी राहिलीय. तर ८ ऑगस्टच्या सकाळपर्यंत सरासरी १०९५ मिलीमीटर पाऊस पडलाय. यातील अधिक करुन पाऊस हा गेल्या दहा दिवसांतीलच आहे. 

सध्याचे प्रमाण पाहता पावसाची वाटचाल २००५ या वर्षाकडे सुरू असल्याचे दिसते. कारण, त्यावेळी पावसाळ्यात तब्बल २ हजार ८७ मिलीमीटर पाऊस झालेला. सातारा तालुक्यात १८२१ मिलीमीटर, जावळी २७०२, कोरेगाव १३९५, कºहाड ११८४, पाटण ३२८९, फलटण ४४९, माण ५४२, खटाव ६०५, वाई १५३७, महाबळेश्वरला ८६३९ तर खंडाळा तालुक्यात ७७८ मिलीमीटर पाऊस झालेला. 

२००५ वर्षासारखी आतापर्यंतच्या १४ वर्षात कधीच पर्जन्यवृष्टी झालेली नाही. कारण त्यानंतर २००६ ला जिल्ह्यात सरासरी १९५० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली. तर २००७ ला १५१०, २००८ मध्ये ११६९, २००९ ला ११३६, २०१० ला १२९७, २०११ मध्ये १२८३, २०१३ ला ११२९, २०१४ मध्ये १२१६, २०१६ साली १२३७, २०१७ मध्ये ११८२ आणि २०१८ साली ११३२ मिलीमीटर पाऊस झाला होता.   २०१५ ला कमी पाऊस...गेल्या १४ वर्षांत फक्त २०१२ आणि १५ सालीच पाऊस कमी झालेला. १२ साली ९३१ तर १५ ला अवघा ७७५ मिलीमीटर पाऊस झालेला. त्यावेळी जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती होती.   

टॅग्स :Satara Floodसातारा पूरWaterपाणी