शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर कायम; पाटणला युवक वाहून गेला, नीरा नदीवरील पूल पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:22 IST

कोयना धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर रविवारीही कायम असून, पाटण तालुक्यात वनकुसवडे गावातील पळासरी वस्तीतील युवक शनिवारी रात्री वाहून गेला. वीर, गुंजवणी धरणांतून विसर्ग वाढवल्यामुळे नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली असून, पाडेगाव-नीरा जुना पूल, भोर-पुणे मार्गावरील हरतळी-माळवाडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरम्यान, कोयना धरणातून ५२ हजार क्युसेक विसर्ग कायम ठेवून पाणीसाठा ८६.६३ टीएमसीपर्यंत स्थिर ठेवला आहे.सातारा जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर पश्चिमेकडे जास्त असून पाटण, जावली, महाबळेश्वरला तालुक्यात तीन दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काेयना नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांनाही पूर आला आहे. शनिवारी रात्री पाटण तालुक्यात वनकुसवडेतील पळासरी वस्तीमधील अशोक धोंडिबा मिसाळ (वय २३) हा युवक शनिवारी वाहून गेला. सायंकाळी चरायला गेलेली जनावरे आणण्यासाठी मिसाळ गेला होता, मात्र गावानजीकच्या ओढ्यात तो वाहून गेला.

कोयना धरणात सुमारे ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने पायथा वीजगृहातून २१०० आणि वक्री दरवाजातून ५० हजार असा ५२ हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात ८६.६३ टीएमसी पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरणातही पाण्याची आवक वाढलेली आहे. नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीवरील पाडेगाव, वाठार-वीर पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.कोयनेचा पाणीसाठा चार दिवसांपासून ८६ टीएमसीवरकोयना धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून, पाणीसाठा दि. १ रोजीच ८६.१९ टीएमसी झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असून, ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी ५२ हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे रविवारपर्यंत पाणीसाठा ८६ टीएमसीपर्यंतच स्थिर ठेवण्यात आला. तथापि, विसर्ग करतानाही शेजारील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी