शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

कोरोना संसर्गात साताऱ्याची धोक्याकडे वाटचाल..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

सातारा : कोरोना संसर्गित रुग्ण संख्येमुळे सातारा जिल्ह्याची धोक्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल नऊ हजार ...

सातारा : कोरोना संसर्गित रुग्ण संख्येमुळे सातारा जिल्ह्याची धोक्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल नऊ हजार ९७४ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या सोमवारी दुपारी १३ हजार ८५२ झाली. या संख्येमुळे सातारा जिल्हा राज्यात सक्रिय रुग्णसंख्येत ''टॉप टेन''च्या उंबरठ्यावर आहे. १२ ते १९ एप्रिल या कालावधीत १८२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१५३ झाली आहे.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या दररोज सरासरी एक हजाराच्या घरात वाढत आहे. आतापर्यंतच्या रुग्णसंख्या वाढीचे विक्रम दररोज मोडले जात आहेत. सातारकर मात्र अजूनही शहरांमधून बिनधास्त फिरत आहेत. जिल्हा प्रशासनाला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने कोरोनाची साखळी कशी तोडायची, हा अवघड प्रश्न बनला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, यातून जिल्ह्याला सावरण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला खासदार, आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी आदी बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी संकट काळात घरात कोंडून घेणे पसंत केल्याचे दिसत आहे.

कोरोना बाधित रुग्णांसाठी बेड वेळेवर उपलब्ध होत नाही. बेड मिळाला तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळेलच, याची खात्री नाही. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाइकांना परजिल्ह्यात जाऊन धावाधाव करावी लागत आहे. यामुळे रुग्ण आणि नातेवाईक यांचा जीव टांगणीला लागला आहे. साताऱ्यात रविवारी केवळ ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने एका वृद्धाला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे कोरोनाने कोणती पातळी गाठली आहे, याची कल्पनाच न केलेली बरी. आतातरी लोकप्रतिनिधींनी जागे होऊन सर्वसामान्यांना आरोग्य सेवा कशी उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

चौकट

लोकप्रतिनिधी अज्ञातवासात

कोरोनाचा उद्रेक होत असताना लोकप्रतिनिधी मात्र अज्ञातवासात गेले आहेत. जिल्ह्याला दोन मंत्री मिळाले असले तरी बेडअभावी रुग्णाला जीव गमवावा लागतो. आमदार, खासदार कोठेही मदत कार्यात सक्रिय असल्याचे दिसत नाहीत. रुग्णालय उभारावे, अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवाव्यात, असे एकाही लोकप्रतिनिधींना वाटत नाही. गृह विलगीकरनातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना बाहेर पडावेच लागणार नाही, यासाठी आवश्यक बाबी पुरवण्याचे काम राजकीय कार्यकर्त्यांनी केले तरी शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बाधितांची संख्या नियंत्रणात येऊ शकते.

दहाव्या क्रमांकावर

राज्यात रविवारी जळगाव जिल्ह्यात १२ हजार ७९५ सक्रिय रुग्ण होते. त्यामुळे जळगाव जिल्हा दहाव्या क्रमांकावर होता. तर सातारा जिल्ह्यात रविवारी तेरा हजार ७६ रुग्णांवर उपचार सुरू होते. तो सोमवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १३ हजार १५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे जिल्ह्याचा राज्यात टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे.