शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोना संसर्गात साताऱ्याची धोक्याकडे वाटचाल..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

सातारा : कोरोना संसर्गित रुग्ण संख्येमुळे सातारा जिल्ह्याची धोक्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल नऊ हजार ...

सातारा : कोरोना संसर्गित रुग्ण संख्येमुळे सातारा जिल्ह्याची धोक्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल नऊ हजार ९७४ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या सोमवारी दुपारी १३ हजार ८५२ झाली. या संख्येमुळे सातारा जिल्हा राज्यात सक्रिय रुग्णसंख्येत ''टॉप टेन''च्या उंबरठ्यावर आहे. १२ ते १९ एप्रिल या कालावधीत १८२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१५३ झाली आहे.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या दररोज सरासरी एक हजाराच्या घरात वाढत आहे. आतापर्यंतच्या रुग्णसंख्या वाढीचे विक्रम दररोज मोडले जात आहेत. सातारकर मात्र अजूनही शहरांमधून बिनधास्त फिरत आहेत. जिल्हा प्रशासनाला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने कोरोनाची साखळी कशी तोडायची, हा अवघड प्रश्न बनला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, यातून जिल्ह्याला सावरण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला खासदार, आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी आदी बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी संकट काळात घरात कोंडून घेणे पसंत केल्याचे दिसत आहे.

कोरोना बाधित रुग्णांसाठी बेड वेळेवर उपलब्ध होत नाही. बेड मिळाला तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळेलच, याची खात्री नाही. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाइकांना परजिल्ह्यात जाऊन धावाधाव करावी लागत आहे. यामुळे रुग्ण आणि नातेवाईक यांचा जीव टांगणीला लागला आहे. साताऱ्यात रविवारी केवळ ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने एका वृद्धाला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे कोरोनाने कोणती पातळी गाठली आहे, याची कल्पनाच न केलेली बरी. आतातरी लोकप्रतिनिधींनी जागे होऊन सर्वसामान्यांना आरोग्य सेवा कशी उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

चौकट

लोकप्रतिनिधी अज्ञातवासात

कोरोनाचा उद्रेक होत असताना लोकप्रतिनिधी मात्र अज्ञातवासात गेले आहेत. जिल्ह्याला दोन मंत्री मिळाले असले तरी बेडअभावी रुग्णाला जीव गमवावा लागतो. आमदार, खासदार कोठेही मदत कार्यात सक्रिय असल्याचे दिसत नाहीत. रुग्णालय उभारावे, अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवाव्यात, असे एकाही लोकप्रतिनिधींना वाटत नाही. गृह विलगीकरनातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना बाहेर पडावेच लागणार नाही, यासाठी आवश्यक बाबी पुरवण्याचे काम राजकीय कार्यकर्त्यांनी केले तरी शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बाधितांची संख्या नियंत्रणात येऊ शकते.

दहाव्या क्रमांकावर

राज्यात रविवारी जळगाव जिल्ह्यात १२ हजार ७९५ सक्रिय रुग्ण होते. त्यामुळे जळगाव जिल्हा दहाव्या क्रमांकावर होता. तर सातारा जिल्ह्यात रविवारी तेरा हजार ७६ रुग्णांवर उपचार सुरू होते. तो सोमवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १३ हजार १५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे जिल्ह्याचा राज्यात टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे.