शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

सातारा : दुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं, पर्यटकांची पावले वळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 2:34 PM

काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब असून पाणी निळाशार जलाशयासारखे दिसत आहे.

ठळक मुद्देदुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं नालाबांध तुडूंब; पर्यटकांची पावले वळली

नितीन काळेल/सचिन मंगरूळे म्हसवड : काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब असून पाणी निळाशार जलाशयासारखे दिसत आहे. तर आता येथे पर्यटकांचीही पावले वळत असून यावर्षी दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत.पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेली वॉटर कप स्पर्धा राज्यालाच दिशा देऊन गेली. या स्पर्धेत माण तालुक्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम केले आहे. या तालुक्यातीलच भांडवली गाव हे खऱ्या अर्थाने पाण्याचे भांडवल ठरले. तालुक्याची वार्षिक पावसाची सरासरी सुमारे ४५० मिलीमीटर एवढी आहे. तर आतापर्यंत भांडवली गावात २५० मिलीमीटर ऐवढा पाऊस झालेला आहे.

मोठे सहा ते सात पाऊस झाले. त्यामुळे नालाबांध, सीसीटी, डीपसीसीटी, तलावात पूर्ण पाणीसाठा झाला आहे. ओढ्यातून पाणी वाहून न जाता ते अडले गेले. त्यामुळे जागोजागी पाणी दिसत आहे. यामुळे आपण काश्मीरमध्ये असल्याचा साक्षात्कार घडत आहे.माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडीपासून तसेच सुमारे १५ किलोमीटरवर असलेले हे गाव आहे. तब्बल १५ हून अधिक दऱ्यात पहुडलेल्या या गावात अनेक गावांची तहान भागविण्याची ताकद आहे. त्यामुळेच दरवर्षी टंचाईच्या काळात गावातून पाण्याचे टँकर भरभरून जात असतात.

मुळातच स्वत:ची गरज भागवून या गावाने माणदेशी मातीतील अनेक गावांची तहान भागवण्याचे काम केलं आहे. आजही माण तालुक्यात पाणी पोहोचविणारे टँकर याच भांडवली गावातून भरून जातात याचा सार्थ अभिमान भांडवलीकरांना वाटत आहे.वॉटर कप स्पर्धेतील ४५ दिवसांने गावात चमत्कारच झाला. गावातील लोकांनी श्रमदान करून कामाचा प्रचंड डोंगर निर्माण केला. उद्दिष्टापेक्षा कितीतरी पटीने जास्त काम झालं अन् विश्वास बसणार नाही एवढं जबरदस्त काम निर्माण करण्यात आलं. निसर्गानेही गावाला साथ दिली. आजपर्यंत पाच-सहा वेळा पाऊस कोसळला. खोऱ्यातील आणि डोंगरमाथ्यावरील पाण्याने नालाबांध, समतल चरी भरून गेल्या.एक दिवसाचे पावसाळी डेस्टिनेशनयेथील सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालायला लावणारे असेच आहे. म्हणूनच या गावाकडे पर्यटकांचे पाय वळू लागले आहेत. पुण्या-मुंबईचे पर्यटक गावाला भेट देऊ लागले आहेत. भविष्यात संपूर्ण एका दिवसाचे पावसाळी डेस्टिनेशन म्हणून भांडवली या गावकडे पाहिले जाईल, यात शंका नाही अशीच स्थिती आहे आणि हाच भाव संपूर्ण ग्रामस्थांच्या डोळ्यांमध्ये चमकतोय.आता फळबाग, दुग्ध व्यवसायावर भरभांडवलीचा ५० टक्के भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे येथे कांदा, टोमॅटो, ज्वारी, गहू, बाजरी ही मुख्य पिके असायची. गेल्या चार वर्षांपूर्वी अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून गाव परिसरात बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे पाणी उपलब्ध झाले. तर आताच्या जलसंधारणामुळे पाणीसाठा मुबलक झाला आहे. त्यामुळे फळबाग आणि दुग्ध व्यवसायावर भर देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा