शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सातारा : दुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं, पर्यटकांची पावले वळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:38 IST

काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब असून पाणी निळाशार जलाशयासारखे दिसत आहे.

ठळक मुद्देदुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं नालाबांध तुडूंब; पर्यटकांची पावले वळली

नितीन काळेल/सचिन मंगरूळे म्हसवड : काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब असून पाणी निळाशार जलाशयासारखे दिसत आहे. तर आता येथे पर्यटकांचीही पावले वळत असून यावर्षी दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत.पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेली वॉटर कप स्पर्धा राज्यालाच दिशा देऊन गेली. या स्पर्धेत माण तालुक्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम केले आहे. या तालुक्यातीलच भांडवली गाव हे खऱ्या अर्थाने पाण्याचे भांडवल ठरले. तालुक्याची वार्षिक पावसाची सरासरी सुमारे ४५० मिलीमीटर एवढी आहे. तर आतापर्यंत भांडवली गावात २५० मिलीमीटर ऐवढा पाऊस झालेला आहे.

मोठे सहा ते सात पाऊस झाले. त्यामुळे नालाबांध, सीसीटी, डीपसीसीटी, तलावात पूर्ण पाणीसाठा झाला आहे. ओढ्यातून पाणी वाहून न जाता ते अडले गेले. त्यामुळे जागोजागी पाणी दिसत आहे. यामुळे आपण काश्मीरमध्ये असल्याचा साक्षात्कार घडत आहे.माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडीपासून तसेच सुमारे १५ किलोमीटरवर असलेले हे गाव आहे. तब्बल १५ हून अधिक दऱ्यात पहुडलेल्या या गावात अनेक गावांची तहान भागविण्याची ताकद आहे. त्यामुळेच दरवर्षी टंचाईच्या काळात गावातून पाण्याचे टँकर भरभरून जात असतात.

मुळातच स्वत:ची गरज भागवून या गावाने माणदेशी मातीतील अनेक गावांची तहान भागवण्याचे काम केलं आहे. आजही माण तालुक्यात पाणी पोहोचविणारे टँकर याच भांडवली गावातून भरून जातात याचा सार्थ अभिमान भांडवलीकरांना वाटत आहे.वॉटर कप स्पर्धेतील ४५ दिवसांने गावात चमत्कारच झाला. गावातील लोकांनी श्रमदान करून कामाचा प्रचंड डोंगर निर्माण केला. उद्दिष्टापेक्षा कितीतरी पटीने जास्त काम झालं अन् विश्वास बसणार नाही एवढं जबरदस्त काम निर्माण करण्यात आलं. निसर्गानेही गावाला साथ दिली. आजपर्यंत पाच-सहा वेळा पाऊस कोसळला. खोऱ्यातील आणि डोंगरमाथ्यावरील पाण्याने नालाबांध, समतल चरी भरून गेल्या.एक दिवसाचे पावसाळी डेस्टिनेशनयेथील सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालायला लावणारे असेच आहे. म्हणूनच या गावाकडे पर्यटकांचे पाय वळू लागले आहेत. पुण्या-मुंबईचे पर्यटक गावाला भेट देऊ लागले आहेत. भविष्यात संपूर्ण एका दिवसाचे पावसाळी डेस्टिनेशन म्हणून भांडवली या गावकडे पाहिले जाईल, यात शंका नाही अशीच स्थिती आहे आणि हाच भाव संपूर्ण ग्रामस्थांच्या डोळ्यांमध्ये चमकतोय.आता फळबाग, दुग्ध व्यवसायावर भरभांडवलीचा ५० टक्के भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे येथे कांदा, टोमॅटो, ज्वारी, गहू, बाजरी ही मुख्य पिके असायची. गेल्या चार वर्षांपूर्वी अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून गाव परिसरात बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे पाणी उपलब्ध झाले. तर आताच्या जलसंधारणामुळे पाणीसाठा मुबलक झाला आहे. त्यामुळे फळबाग आणि दुग्ध व्यवसायावर भर देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा