शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सातारा : दुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं, पर्यटकांची पावले वळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:38 IST

काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब असून पाणी निळाशार जलाशयासारखे दिसत आहे.

ठळक मुद्देदुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं नालाबांध तुडूंब; पर्यटकांची पावले वळली

नितीन काळेल/सचिन मंगरूळे म्हसवड : काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब असून पाणी निळाशार जलाशयासारखे दिसत आहे. तर आता येथे पर्यटकांचीही पावले वळत असून यावर्षी दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत.पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेली वॉटर कप स्पर्धा राज्यालाच दिशा देऊन गेली. या स्पर्धेत माण तालुक्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम केले आहे. या तालुक्यातीलच भांडवली गाव हे खऱ्या अर्थाने पाण्याचे भांडवल ठरले. तालुक्याची वार्षिक पावसाची सरासरी सुमारे ४५० मिलीमीटर एवढी आहे. तर आतापर्यंत भांडवली गावात २५० मिलीमीटर ऐवढा पाऊस झालेला आहे.

मोठे सहा ते सात पाऊस झाले. त्यामुळे नालाबांध, सीसीटी, डीपसीसीटी, तलावात पूर्ण पाणीसाठा झाला आहे. ओढ्यातून पाणी वाहून न जाता ते अडले गेले. त्यामुळे जागोजागी पाणी दिसत आहे. यामुळे आपण काश्मीरमध्ये असल्याचा साक्षात्कार घडत आहे.माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडीपासून तसेच सुमारे १५ किलोमीटरवर असलेले हे गाव आहे. तब्बल १५ हून अधिक दऱ्यात पहुडलेल्या या गावात अनेक गावांची तहान भागविण्याची ताकद आहे. त्यामुळेच दरवर्षी टंचाईच्या काळात गावातून पाण्याचे टँकर भरभरून जात असतात.

मुळातच स्वत:ची गरज भागवून या गावाने माणदेशी मातीतील अनेक गावांची तहान भागवण्याचे काम केलं आहे. आजही माण तालुक्यात पाणी पोहोचविणारे टँकर याच भांडवली गावातून भरून जातात याचा सार्थ अभिमान भांडवलीकरांना वाटत आहे.वॉटर कप स्पर्धेतील ४५ दिवसांने गावात चमत्कारच झाला. गावातील लोकांनी श्रमदान करून कामाचा प्रचंड डोंगर निर्माण केला. उद्दिष्टापेक्षा कितीतरी पटीने जास्त काम झालं अन् विश्वास बसणार नाही एवढं जबरदस्त काम निर्माण करण्यात आलं. निसर्गानेही गावाला साथ दिली. आजपर्यंत पाच-सहा वेळा पाऊस कोसळला. खोऱ्यातील आणि डोंगरमाथ्यावरील पाण्याने नालाबांध, समतल चरी भरून गेल्या.एक दिवसाचे पावसाळी डेस्टिनेशनयेथील सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालायला लावणारे असेच आहे. म्हणूनच या गावाकडे पर्यटकांचे पाय वळू लागले आहेत. पुण्या-मुंबईचे पर्यटक गावाला भेट देऊ लागले आहेत. भविष्यात संपूर्ण एका दिवसाचे पावसाळी डेस्टिनेशन म्हणून भांडवली या गावकडे पाहिले जाईल, यात शंका नाही अशीच स्थिती आहे आणि हाच भाव संपूर्ण ग्रामस्थांच्या डोळ्यांमध्ये चमकतोय.आता फळबाग, दुग्ध व्यवसायावर भरभांडवलीचा ५० टक्के भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे येथे कांदा, टोमॅटो, ज्वारी, गहू, बाजरी ही मुख्य पिके असायची. गेल्या चार वर्षांपूर्वी अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून गाव परिसरात बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे पाणी उपलब्ध झाले. तर आताच्या जलसंधारणामुळे पाणीसाठा मुबलक झाला आहे. त्यामुळे फळबाग आणि दुग्ध व्यवसायावर भर देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा