शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: साताऱ्याच्या १९०५ च्या संमेलनामुळे पडला दरवर्षीचा पायंडा !

By नितीन काळेल | Updated: June 9, 2025 13:44 IST

तिसऱ्या संमेलनापासून वारसा : जिल्ह्यातील ७ वा साहित्य सोहळा

नितीन काळेलसातारा : सातारा जिल्ह्याला १६ व्या, १७ व्या शतकापासून साहित्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नामांकित साहित्यिक होऊन गेले आहेत, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनातही साताऱ्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या ९९ व्या संमेलनाचा मानही साताऱ्याला मिळालेला आहे. त्यामुळे सातारा शहरातील हे चाैथे, तर जिल्ह्यातील ७ वे संमेलन ठरणार आहे. विशेष म्हणजे १९०५ ला साताऱ्यात अखिल भारतीयचे तिसरे संमेलन झाले. त्यानंतरच दरवर्षीच संमेलने पार पडू लागली.सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व आहे, तसेच जिल्हा साहित्यिकांचाही आहे. या भूमीतूनच अनेक नामांकित साहित्यिक घडले, तसेच त्यांनी साहित्यातून विचारांची पेरणीही केली. त्यामुळे जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने अधिक संख्येने होत आहेत. यासाठी सातारकरांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्यासारखाच आहे.

कारण, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या साहित्य संमेलनांना सुरुवात झाली. १८७८ आणि १८८५ मध्ये पुण्यात संमेलने पार पडली. त्यानंतर १९०५ मध्ये तिसरे साहित्य संमेलन साताऱ्यात झाले. जिल्ह्यातील हे पहिले संमेलन ठरले; पण यानंतरच दरवर्षी साहित्य संमेलन घेण्याचा पायंडा पडला. १९०५ च्या संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात वकील रघुनाथ पांडुरंग तथा दादासाहेब करंदीकर होते. ते लोकमान्य टिळक यांचे जवळचे सहकारी होते. यानंतर तब्बल ५७ वर्षांनी १९६२ मध्ये साताऱ्यात ४४ वे संमेलन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि साहित्यिक नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ अध्यक्ष होते. जिल्ह्यातील हे दुसरे संमेलन ठरले.१९६२ नंतर १३ वर्षांनी १९७५ मध्ये कऱ्हाडमध्ये ५१ वे साहित्य संमेलन झाले. जिल्ह्यातील तिसरे संमेलन होते. प्रख्यात साहित्यिका दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष त्यावेळचे केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण होते. देशातील आणीबाणीच्या काळात संमेलन झाल्याने जोरदार चर्चा झाली होती. यानंतर जिल्ह्यात साहित्य संमेलन होण्यासाठी १८ वर्षे वाट पाहावी लागली.१९९३ मध्ये ६६ वे संमेलन झाले. सातारा शहरातील तिसरे, तर जिल्ह्यातील चाैथे संमेलन होते. ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विद्याधर गोखले संमेलनाचे अध्यक्ष, तर मंत्री अभयसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष होते. यानंतर १० वर्षांनी २००३ मध्ये कऱ्हाडमध्ये ७६ वे आणि जिल्ह्यातील पाचवे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष भेंडे होते. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे संमेलनाचे उद्घाटक होते.

महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अध्यक्षाविना..२००९ मध्ये सातारा आणि कऱ्हाडनंतर जिल्ह्यातीलच महाबळेश्वरमध्ये प्रथमच संमेलन झाले. हे ऐकून ८२ वे संमेलन होते. जिल्ह्यातील सहावे ठरले. अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव होते; पण त्यांच्या एका पुस्तकामुळे वाद वाढला होता. त्यामुळे यादव यांनी अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. अध्यक्षाविना संमेलन पार पडले. यानंतर जिल्ह्यात १६ वर्षांनी संमेलन होत आहे. हे जिल्ह्यातील ७ वे आणि साताऱ्यातील चाैथे संमेलन ठरणार आहे.

१७ अध्यक्ष सातारा जिल्ह्यातील..अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आतापर्यंत ९८ पार पडली आहेत. यामध्ये १७ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सातारा जिल्ह्याने (विभागणीपूर्वीचाही जिल्हा धरून) भूषविले आहे. ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे.

साताऱ्यातील संमेलन आदर्शवत ठरेल..साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साताऱ्यात संमेलन व्हावे या उद्देशानेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना करण्यात आली होती. गेली १२ वर्षे सतत साताऱ्यात संमेलन होण्यासाठी मागणी करत होतो. अखेर महामंडळाने मागणी मान्य केली. सातारा शहराला ३२ वर्षांनंतर पुन्हा संमेलन मिळवून देण्यात योगदान देऊ शकलो याचा अत्यंत आनंद आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सातारकरांच्या पाठबळावर राज्यात नाही तर देशात आदर्शवत ठरेल, असे संमेलन पार पाडून दाखवू. - विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ