शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: साताऱ्याच्या १९०५ च्या संमेलनामुळे पडला दरवर्षीचा पायंडा !

By नितीन काळेल | Updated: June 9, 2025 13:44 IST

तिसऱ्या संमेलनापासून वारसा : जिल्ह्यातील ७ वा साहित्य सोहळा

नितीन काळेलसातारा : सातारा जिल्ह्याला १६ व्या, १७ व्या शतकापासून साहित्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नामांकित साहित्यिक होऊन गेले आहेत, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनातही साताऱ्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या ९९ व्या संमेलनाचा मानही साताऱ्याला मिळालेला आहे. त्यामुळे सातारा शहरातील हे चाैथे, तर जिल्ह्यातील ७ वे संमेलन ठरणार आहे. विशेष म्हणजे १९०५ ला साताऱ्यात अखिल भारतीयचे तिसरे संमेलन झाले. त्यानंतरच दरवर्षीच संमेलने पार पडू लागली.सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व आहे, तसेच जिल्हा साहित्यिकांचाही आहे. या भूमीतूनच अनेक नामांकित साहित्यिक घडले, तसेच त्यांनी साहित्यातून विचारांची पेरणीही केली. त्यामुळे जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने अधिक संख्येने होत आहेत. यासाठी सातारकरांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्यासारखाच आहे.

कारण, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या साहित्य संमेलनांना सुरुवात झाली. १८७८ आणि १८८५ मध्ये पुण्यात संमेलने पार पडली. त्यानंतर १९०५ मध्ये तिसरे साहित्य संमेलन साताऱ्यात झाले. जिल्ह्यातील हे पहिले संमेलन ठरले; पण यानंतरच दरवर्षी साहित्य संमेलन घेण्याचा पायंडा पडला. १९०५ च्या संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात वकील रघुनाथ पांडुरंग तथा दादासाहेब करंदीकर होते. ते लोकमान्य टिळक यांचे जवळचे सहकारी होते. यानंतर तब्बल ५७ वर्षांनी १९६२ मध्ये साताऱ्यात ४४ वे संमेलन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि साहित्यिक नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ अध्यक्ष होते. जिल्ह्यातील हे दुसरे संमेलन ठरले.१९६२ नंतर १३ वर्षांनी १९७५ मध्ये कऱ्हाडमध्ये ५१ वे साहित्य संमेलन झाले. जिल्ह्यातील तिसरे संमेलन होते. प्रख्यात साहित्यिका दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष त्यावेळचे केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण होते. देशातील आणीबाणीच्या काळात संमेलन झाल्याने जोरदार चर्चा झाली होती. यानंतर जिल्ह्यात साहित्य संमेलन होण्यासाठी १८ वर्षे वाट पाहावी लागली.१९९३ मध्ये ६६ वे संमेलन झाले. सातारा शहरातील तिसरे, तर जिल्ह्यातील चाैथे संमेलन होते. ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विद्याधर गोखले संमेलनाचे अध्यक्ष, तर मंत्री अभयसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष होते. यानंतर १० वर्षांनी २००३ मध्ये कऱ्हाडमध्ये ७६ वे आणि जिल्ह्यातील पाचवे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष भेंडे होते. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे संमेलनाचे उद्घाटक होते.

महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अध्यक्षाविना..२००९ मध्ये सातारा आणि कऱ्हाडनंतर जिल्ह्यातीलच महाबळेश्वरमध्ये प्रथमच संमेलन झाले. हे ऐकून ८२ वे संमेलन होते. जिल्ह्यातील सहावे ठरले. अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव होते; पण त्यांच्या एका पुस्तकामुळे वाद वाढला होता. त्यामुळे यादव यांनी अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. अध्यक्षाविना संमेलन पार पडले. यानंतर जिल्ह्यात १६ वर्षांनी संमेलन होत आहे. हे जिल्ह्यातील ७ वे आणि साताऱ्यातील चाैथे संमेलन ठरणार आहे.

१७ अध्यक्ष सातारा जिल्ह्यातील..अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आतापर्यंत ९८ पार पडली आहेत. यामध्ये १७ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सातारा जिल्ह्याने (विभागणीपूर्वीचाही जिल्हा धरून) भूषविले आहे. ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे.

साताऱ्यातील संमेलन आदर्शवत ठरेल..साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साताऱ्यात संमेलन व्हावे या उद्देशानेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना करण्यात आली होती. गेली १२ वर्षे सतत साताऱ्यात संमेलन होण्यासाठी मागणी करत होतो. अखेर महामंडळाने मागणी मान्य केली. सातारा शहराला ३२ वर्षांनंतर पुन्हा संमेलन मिळवून देण्यात योगदान देऊ शकलो याचा अत्यंत आनंद आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सातारकरांच्या पाठबळावर राज्यात नाही तर देशात आदर्शवत ठरेल, असे संमेलन पार पाडून दाखवू. - विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ