किसान मोर्चा चिटणीसपदी संदीप इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:39 IST2021-02-16T04:39:42+5:302021-02-16T04:39:42+5:30
औंध : खटाव तालुक्यातील औंध येथील संदीप प्रभाकर इंगळे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात ...

किसान मोर्चा चिटणीसपदी संदीप इंगळे
औंध : खटाव तालुक्यातील औंध येथील संदीप प्रभाकर इंगळे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. यापूर्वी इंगळे यांनी विविध प्रश्नांवर उपोषण केले होते, याची दखल पक्षाने घेतली होती. यावेळी औंध विकास सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन चंद्रकांत पवार, गणेश चव्हाण, डॉ. रवींद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संदीप इंगळे म्हणाले, ‘पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार आजपर्यंत काम करत आलो आहे. सर्वसामान्य लोकांना या पदाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. तसेच पक्षवाढीसाठी, संघटनात्मक बांधणी करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शेखर चरेगावकर, रूपेश कुंभार यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले
आयकार्ड फोटो..
१५संदीप इंगळे