शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

गुन्हे होऊच नयेत यासाठीच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:36 PM

गावागावत सीसीटीव्ही, ग्रामपंचायतींवर भोंगा आणि ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावांच्या सुरक्षेची घेतलेली काळजी चोरांच्या मनातही धडकी भरवतेय. - अजय गोरड, सहायक पोलीस निरीक्षक, उंब्रज

ठळक मुद्देमहामार्ग अन् गावांची सुरक्षितता महत्त्वाची..!

दीपक शिंदे।सातारा : गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पण चोºया होऊच नयेत, यासाठी काही अधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग राबविले आणि त्यामध्ये त्यांना यशही आल्याचे उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले.

प्रश्न : वाढत्या चो-या रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या?उत्तर : चोरी करणाºया व्यक्तीला आपल्याला कोणी पाहिलं ही भीती असते. त्याच्या या कमजोरीचाच आम्ही शस्त्र म्हणून वापर केला. या चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर केला. प्रत्येक गावामध्ये सीसीटीव्ही लावला जावा, असा आग्रह धरला. त्यामुळे चोरट्यांवर पहिल्यांदा सीसीटीव्हीचा आणि नंतर पोलिसांचा वचक बसला. आपल्याला कोणी पाहत नाही, असा त्याचा भ्रम निघून गेला आणि चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले.

प्रश्न : गाव पातळीवर गावकºयांचे सहकार्य कसे मिळते?उत्तर : गावातील लोक उत्स्फूर्तपणे पोलिसांच्या मदतीला येतात. अशा लोकांची ग्राम सुरक्षा पथकामध्ये नेमणूक केली. त्यामध्ये तरुण, मध्यमवयीन ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांचा समावेश केला. त्यामुळे प्रत्येक घटना पोलिसांना कळू लागली. यामुळेही चोºया आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.

प्रश्न : यात्राकाळात काय खबरदारी घेण्यात आली ?उत्तर : पालीची खंडोबा आणि उंब्रजची सीतामाई या दोन मोठ्या यात्रा होतात. याठिकाणी चोºयांचे प्रमाण टाळण्यासाठी मोठ्या स्पीकरवरून लोकांना माहिती दिली. सर्वजण सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेºयाच्या नजरेत असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे लोकांमध्ये वचक निर्माण होऊन यात्रांमधील चोºयांचे प्रमाण घटले.

  • गुन्हेगारांची कुंडली मांडण्याचा उपक्रम

उंब्रज परिसरात असलेल्या छोट्या-मोठ्या सर्वच गुन्हेगारांची कुंडलीच पोलीस स्टेशनमध्ये मांडण्यात आली आहे. असा गुन्हेगार जेव्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये पुन्हा अटक होईल तेव्हा त्याने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची कुंडलीच त्याच्यासमोर मांडली जाते. त्याने केलेले चुकीचे काम आणि त्यामध्ये होत नसलेली सुधारणा यामुळे त्याला जास्तीत जास्त शासन होईल अशा प्रकारचे नियोजन करण्यात येते. त्यामुळे वचकही बसतो.

  • गावक-यांच्या सुरक्षितेसाठी भोंगा

ग्रामसुरक्षा दलाच्या नजरेत एखाद्या चुकीचा प्रकार किंवा चोरीची घटना घडणार असल्याचे दिसले तर पोलीस पाटलांनी ग्रामपंचायतीवर बसविण्यात आलेला भोंगा वाजवायचा. यामुळे गावातील लोक जागे होतात आणि चोरीच्या उद्देशाने आलेले चोरटेही आपला उद्देश साध्य होणार नाही, असे समजून निघून जातात. या भोंग्याला पोलीस सायरनचा आवाज देण्यात आला आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर