शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

रयत क्रांती संघटनेची 'वारी शेतकऱ्याची' साताऱ्यात; सदाभाऊंनी वाजवला ढोल

By नितीन काळेल | Updated: May 25, 2023 15:34 IST

रयत क्रांती शेतकरी संघटनेने विविध मागण्यासाठी २२ मे पासून ' वारी शेतकऱ्यांची ' ही पदयात्रा सुरू केली आहे.

सातारा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी कऱ्हाड येथून निघालेली रयत क्रांती शेतकरी संघटनेची 'वारी शेतकऱ्यांची ' पदयात्रा गुरुवारी दुपारी ढोल वाजवत साताऱ्यात धडकली. यावेळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यादरम्यान सदाभाऊ खोत यांनी शासनाने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत धडक देणार असल्याचा इशारा दिला. तर शहरात येण्यापूर्वी सदाभाऊंनी शिवराज चौकात महामार्गावरच ठिय्या मांडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.    

रयत क्रांती शेतकरी संघटनेने विविध मागण्यासाठी २२ मे पासून ' वारी शेतकऱ्यांची ' ही पदयात्रा सुरू केली आहे. कऱ्हाड येथील महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करूनही यात्रा मार्गस्थ झाली. तीन मुक्कामानंतर ही यात्रा गुरुवारी दुपारच्या सुमारास सातारा शहरात आली. यावेळी शिवराज पेट्रोल पंप चौकात सदाभाऊ खोत यांच्याबरोबरच शेतकऱ्यांनी महामार्गावरच ठिय्या मांडला. यामुळे वाहतुकीला अडथळा आला. तसेच पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी विनंती केल्यानंतर सदाभाऊ पुन्हा पदयात्रेबरोबर चालत बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आले. त्यानंतर ही पदयात्रा जिल्हा परिषद मार्गे पोवई नाक्यावर आली. यावेळी शेकडो शेतकरी तसेच सरपंच परिषदेचे पदाधिकारी व ऊस वाहतूकदार सहभागी झाले होते.      

पोवई नाक्यावर पदयात्रा आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मागण्याविषयी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर सदाभाऊ खोत म्हणाले,  आमच्या मागण्या सरकारकडे मांडण्यात आल्या आहेत. सरकारमधील काही मंत्री आम्हाला सामोरे येत आहेत. या शासनाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचे म्हणणे आम्हाला योग्य वाटले तर आम्ही थांबू. नाहीतर आम्ही मुंबईला जाणारच आहोत. दरम्यान, सातारा येथून सदाभाऊ लगेच पुढे मार्गस्थ झाले. महामार्गाशेजारील यशोदा कॅम्पस येथे दुपारची विश्रांती त्यांनी घेतली. या आहेत प्रमुख मागण्या... 

रयत क्रांती संघटनेने विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढली आहे. यामध्ये गुजरातच्या धर्तीवर उसाला दर देण्यात यावा. इथेनॉल निर्मितीसाठी शेतकरी कंपनीला परवानगी मिळावी. दोन साखर कारखान्यामधील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल अट बँकांनी बंद करावी. ऊस तोडणीचे करार महामंडळाच्या वतीने करण्यात यावेत. मुंबईत सरपंच भवन उभारण्यात यावे. सरपंचांनाही एसटीत मोफत प्रवास मिळावा, अशा या मागण्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन