शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रयत क्रांती संघटनेची 'वारी शेतकऱ्याची' साताऱ्यात; सदाभाऊंनी वाजवला ढोल

By नितीन काळेल | Updated: May 25, 2023 15:34 IST

रयत क्रांती शेतकरी संघटनेने विविध मागण्यासाठी २२ मे पासून ' वारी शेतकऱ्यांची ' ही पदयात्रा सुरू केली आहे.

सातारा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी कऱ्हाड येथून निघालेली रयत क्रांती शेतकरी संघटनेची 'वारी शेतकऱ्यांची ' पदयात्रा गुरुवारी दुपारी ढोल वाजवत साताऱ्यात धडकली. यावेळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यादरम्यान सदाभाऊ खोत यांनी शासनाने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत धडक देणार असल्याचा इशारा दिला. तर शहरात येण्यापूर्वी सदाभाऊंनी शिवराज चौकात महामार्गावरच ठिय्या मांडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.    

रयत क्रांती शेतकरी संघटनेने विविध मागण्यासाठी २२ मे पासून ' वारी शेतकऱ्यांची ' ही पदयात्रा सुरू केली आहे. कऱ्हाड येथील महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करूनही यात्रा मार्गस्थ झाली. तीन मुक्कामानंतर ही यात्रा गुरुवारी दुपारच्या सुमारास सातारा शहरात आली. यावेळी शिवराज पेट्रोल पंप चौकात सदाभाऊ खोत यांच्याबरोबरच शेतकऱ्यांनी महामार्गावरच ठिय्या मांडला. यामुळे वाहतुकीला अडथळा आला. तसेच पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी विनंती केल्यानंतर सदाभाऊ पुन्हा पदयात्रेबरोबर चालत बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आले. त्यानंतर ही पदयात्रा जिल्हा परिषद मार्गे पोवई नाक्यावर आली. यावेळी शेकडो शेतकरी तसेच सरपंच परिषदेचे पदाधिकारी व ऊस वाहतूकदार सहभागी झाले होते.      

पोवई नाक्यावर पदयात्रा आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मागण्याविषयी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर सदाभाऊ खोत म्हणाले,  आमच्या मागण्या सरकारकडे मांडण्यात आल्या आहेत. सरकारमधील काही मंत्री आम्हाला सामोरे येत आहेत. या शासनाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचे म्हणणे आम्हाला योग्य वाटले तर आम्ही थांबू. नाहीतर आम्ही मुंबईला जाणारच आहोत. दरम्यान, सातारा येथून सदाभाऊ लगेच पुढे मार्गस्थ झाले. महामार्गाशेजारील यशोदा कॅम्पस येथे दुपारची विश्रांती त्यांनी घेतली. या आहेत प्रमुख मागण्या... 

रयत क्रांती संघटनेने विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढली आहे. यामध्ये गुजरातच्या धर्तीवर उसाला दर देण्यात यावा. इथेनॉल निर्मितीसाठी शेतकरी कंपनीला परवानगी मिळावी. दोन साखर कारखान्यामधील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल अट बँकांनी बंद करावी. ऊस तोडणीचे करार महामंडळाच्या वतीने करण्यात यावेत. मुंबईत सरपंच भवन उभारण्यात यावे. सरपंचांनाही एसटीत मोफत प्रवास मिळावा, अशा या मागण्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन