शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील ग्रामीण डाकसेवक संपावर; टपाल सेवा, आर्थिक व्यवहार ठप्प

By सचिन काकडे | Updated: December 12, 2023 17:18 IST

सातारा : आधुनिक संचार माध्यमांच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या टपाल खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी मंगळवारपासून (दि. १२) देशव्यापी संप ...

सातारा : आधुनिक संचार माध्यमांच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या टपाल खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी मंगळवारपासून (दि. १२) देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात राज्यातील वीस हजार व सातारा जिल्ह्यातील सर्व डाकसेवक सहभागी झाले आहेत. या संपामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सातारा विभागीय सेक्रेटरी राजकुमार चव्हाण व कऱ्हाड विभागीय सेक्रेटरी जयवंत शिर्के यांनी दिला. ग्रामीण भागातील डाक सेवकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामाची वेळ आठ तासाची असून त्यांना चार तासाचेच वेतन मिळत आहे. संघटनेच्या वतीने जीडीएस कर्मचाऱ्यांना आठ तासाचे काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करावे, २०१६ रोजीच्या कमलेशचंद्र  कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यात, विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीए, डीए, पेन्शन, वैद्यकीय सुविधा, शिक्षण भत्ता सुविधा लागू कराव्यात, इंडीया पोस्ट पेमेंट बँकेचे काम कमिशन ऐवजी वर्कलोडमध्ये सामाविष्ट करण्यात यावे, अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत केंद्रशासन वेळ काढूपणा करत असल्याने संघटनेने देशव्यापी संप पुकारला असून, सातारा जिल्ह्यातील डाक सेवक या संपात सहभागी झाले आहेत. साताऱ्यातील पोवई नाक्यावर असलेल्या मुख्य टपाल कार्यालयाबाहेर टपाल सेवकांकडून मंगळवारी दुपारी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या संपामुळे ग्रामीण भागातील बचत खाते भरणा, स्पीड बुकिंग वाटप, मुलाखत पत्र, मनीऑर्डर सेवा, रजिस्ट्री पत्र, आरडी, वीज बिल भरणा, सुकन्या योजनेचे काम ठप्प झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPost Officeपोस्ट ऑफिसagitationआंदोलन