शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

२०० कोटींची योजना १४०० कोटींंवर : उरमोडीच्या सिंचन कामावर १०६२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:31 IST

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना

ठळक मुद्देपुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची कामे अद्यापही अपूर्ण

नितीन काळेल ।सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना २१२.०७ कोटींची होती. आता त्याची सुधारित किंमत १४१७.७५ कोटींवर पोहोचली आहे. या योजनेतील कालव्याची कामे

गतीने सुरू असतानाही अद्याप प्रकल्पग्रस्त स्थलांतरित होणाºया काही गावठाणातील कामे अपूर्ण आहेत.राज्यात १९९५ मध्ये युती शासन सत्तेत आल्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धरणाची कामे हाती घेण्यात आली. त्यावेळी सातारा तालुक्यातील परळीजवळ उरमोडी नदीवर धरण बांधण्याचा निर्णय झाला. उरमोडी प्रकल्पांतर्गत धरणाचे काम पूर्ण झाले असून, २०१० च्या जून महिन्यापासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे.

उरमोडी नदीवर असणारे हे धरण ५०.१० मीटर उंचीचे असून, १८६० मीटर लांबी आहे. या धरणात एकूण ९.९६ टीएमसी इतका पाणीसाठा होत आहे. या धरणातील पाण्यावर माण, खटाव आणि सातारा तालुक्यातील बहुतांशी शेती अवलंबून आहे. त्यासाठी आवश्यक असणाºया कालव्याची कामे अद्यापही सुरू आहेत. या सिंचन प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यताप्राप्त किंमत २१२.०७ कोटी (२०००-२००१ ची दरसूची) होती. तर अद्ययावत सुधारित किंमत १४१७.७५ कोटींवर पोहोचली आहे.दरवर्षी शेतकºयाला हेक्टरी चार हजार खर्चउरमोडी धरणावर अवलंबून असणाºया पाणी योजनेमुळे माण आणि खटाव तालुक्याला मोठा फायदा होणार आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरवर होणारे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. तसेच उन्हाळ्यातही सिंचनाची सुविधा होणार आहे. या योजनेसाठी शेतकºयाला दरवर्षी हेक्टरी अवघा चार हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच सध्या या सिंचन योजनेतून अवघे ३५०० हेक्टर क्षेत्र भिजत आहे. माणमध्ये कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी सुरू आहे. कामे पूर्ण नसल्याने अनेक ठिकाणी ओढे, तलावात पाणी सोडण्यात येत आहे.

धरणातील पाण्याचा वापर सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्याचे नियोजन आहे; पण सध्या कालव्यांची कामे सुरू असल्याने फक्त ४ ते ५ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे धरणात बरेच पाणी शिल्लक राहते. येत्या दोन वर्षांत संपूर्ण पाण्याचा वापर होईल, असे उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSatara areaसातारा परिसर