शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
3
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
4
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
5
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
6
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
7
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
8
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
9
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
10
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
11
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
12
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
13
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
14
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
15
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
16
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
17
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
18
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
19
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
20
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
Daily Top 2Weekly Top 5

२०० कोटींची योजना १४०० कोटींंवर : उरमोडीच्या सिंचन कामावर १०६२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:31 IST

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना

ठळक मुद्देपुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची कामे अद्यापही अपूर्ण

नितीन काळेल ।सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना २१२.०७ कोटींची होती. आता त्याची सुधारित किंमत १४१७.७५ कोटींवर पोहोचली आहे. या योजनेतील कालव्याची कामे

गतीने सुरू असतानाही अद्याप प्रकल्पग्रस्त स्थलांतरित होणाºया काही गावठाणातील कामे अपूर्ण आहेत.राज्यात १९९५ मध्ये युती शासन सत्तेत आल्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धरणाची कामे हाती घेण्यात आली. त्यावेळी सातारा तालुक्यातील परळीजवळ उरमोडी नदीवर धरण बांधण्याचा निर्णय झाला. उरमोडी प्रकल्पांतर्गत धरणाचे काम पूर्ण झाले असून, २०१० च्या जून महिन्यापासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे.

उरमोडी नदीवर असणारे हे धरण ५०.१० मीटर उंचीचे असून, १८६० मीटर लांबी आहे. या धरणात एकूण ९.९६ टीएमसी इतका पाणीसाठा होत आहे. या धरणातील पाण्यावर माण, खटाव आणि सातारा तालुक्यातील बहुतांशी शेती अवलंबून आहे. त्यासाठी आवश्यक असणाºया कालव्याची कामे अद्यापही सुरू आहेत. या सिंचन प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यताप्राप्त किंमत २१२.०७ कोटी (२०००-२००१ ची दरसूची) होती. तर अद्ययावत सुधारित किंमत १४१७.७५ कोटींवर पोहोचली आहे.दरवर्षी शेतकºयाला हेक्टरी चार हजार खर्चउरमोडी धरणावर अवलंबून असणाºया पाणी योजनेमुळे माण आणि खटाव तालुक्याला मोठा फायदा होणार आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरवर होणारे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. तसेच उन्हाळ्यातही सिंचनाची सुविधा होणार आहे. या योजनेसाठी शेतकºयाला दरवर्षी हेक्टरी अवघा चार हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच सध्या या सिंचन योजनेतून अवघे ३५०० हेक्टर क्षेत्र भिजत आहे. माणमध्ये कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी सुरू आहे. कामे पूर्ण नसल्याने अनेक ठिकाणी ओढे, तलावात पाणी सोडण्यात येत आहे.

धरणातील पाण्याचा वापर सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्याचे नियोजन आहे; पण सध्या कालव्यांची कामे सुरू असल्याने फक्त ४ ते ५ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे धरणात बरेच पाणी शिल्लक राहते. येत्या दोन वर्षांत संपूर्ण पाण्याचा वापर होईल, असे उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSatara areaसातारा परिसर