शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Satara: एकीकडे दरडी कोसळण्याचा धोका, दुसरीकडे संरक्षक कठड्याची दुरवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 12:11 IST

तुटलेल्या संरक्षक कठड्याचे बांधकाम करण्याची मागणी

पेट्री : यवतेश्वर घाटात मागील आठवड्यात महाकाय दगड कोसळून संरक्षक कठडा तुटला होता. दहा-बारा दिवस होऊन गेल्यानंतरही अद्याप सात मीटर लांबीचा तुटलेला संरक्षक कठडा नादुरुस्त अवस्थेत असल्याने अपघाताचा संभव असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ लागला आहे. यामुळे एकीकडे दरड कोसळण्याचा धोका, तर दुसरीकडे संरक्षक कठड्याची दुरवस्था अशी परिस्थिती आहे.कास, बामणोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असल्याने परिसरात पर्यटनासाठी साताऱ्याहून यवतेश्वर घाटमार्गे प्रवास करावा लागतो. येथून सतत वर्षभर वाहतूक सुरू असते. खासगी वाहने, अवजड मालाची वाहने, महाविद्यालयीन तरुण, शाळकरी मुले, नोकरदार वर्गाचीही परिसरातून सतत रहदारी असते. शनिवार, रविवार, जोडून सुटीत मोठ्या प्रमाणावर यामार्गे वाहतूक सुरू असते.कास पठारावरील फुलांच्या हंगामात तर देश-विदेशांतून लाखोंच्या संख्येने पर्यटकांची मार्गावरून वर्दळ असते. पावसाळ्यातही घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त असते. दोन आठवड्यांपूर्वी घाटात छोट्या-मोठ्या स्वरूपात दरडी कोसळल्या. अशावेळी एकीकडे कोसळलेली दरड, तर दुसरीकडे दुरवस्थेत असलेला संरक्षक कठडा अशा बिकट परिस्थितीत पाऊस, दाट धुक्यातून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी कोसळलेल्या महाकाय दगडामुळे तुटलेल्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती ‘जैसे थे’ आहे. तुटलेला संरक्षक कठडा नव्याने बांधकाम करण्याची; तसेच रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्स, सूचना फलक बसविण्याची मागणी वाहनचालक, पर्यटकांतून जोर धरत आहे. घाटातून प्रवास करताना काहीजण स्टंट, तसेच हुल्लडबाजी करताना दिसतात. कित्येक पर्यटक कठड्यांवर उभे राहून फोटो सेशन करीत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकीकडे आड, तर...!घाटातून प्रवास करताना काहीजण स्टंट, तसेच हुल्लडबाजी करताना दिसतात. ट्रीपल सीटचादेखील अपवाद वगळता येत नाही. एका बाजूने रस्त्यालगत कोसळणारी दरड, तर दुसरीकडे तुटलेल्या संरक्षक कठड्यामुळे ‘एकीकडे आड, तर दुसरीकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आकस्मिक दरडी कोसळण्याची शक्यता अधिक असल्याने घाटात वाहने थांबवून फोटो सेशन, सेल्फी काढणे धोकादायक आहे.

दरड कोसळून तुटलेल्या कठड्यांभोवती पट्टी व दगड लावले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावून तुटलेला संरक्षक कठडा तत्काळ नव्याने बांधण्यात यावा. कोणतीही विपरीत घटना घडण्याअगोदर संबंधित विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक, पर्यटक, स्थानिकांतून होत आहे. - निकेश मोहिते, वाहनचालक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन