शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

तांदूळच बनला रेठऱ्याचा ‘ब्रँड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST

काही गावे ऐतिहासिक स्थळे व वारसा त्याचबरोबर नावीन्यपूर्ण लौकिकामुळे सर्वदूर ओळखली जातात. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रूक गावालाही पाच ...

काही गावे ऐतिहासिक स्थळे व वारसा त्याचबरोबर नावीन्यपूर्ण लौकिकामुळे सर्वदूर ओळखली जातात. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रूक गावालाही पाच दशकांपासून ‘रेठरा बासमती’ तांदळाची नवी ओळख मिळाली आहे. ही ओळख देशभर पोहोचली असून, परदेशातही हा तांदूळ ‘ब्रँड’ ठरत आहे.

पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीकाठी रेठरे बुद्रूक गाव वसले आहे. याठिकाणी १९६१ मध्ये कृष्णा कारखाना उभा राहिला आणि हा कारखाना विभागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला. कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाकडे कल वाढला. मात्र, १९७०च्या दशकात याच साखरपट्ट्यात ऊस सोडून ‘बासमती’ भात पीक लावण्याचा प्रयोग केला गेला आणि तो यशस्वीही झाला. त्याकाळी कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते यांनी हिमाचल प्रदेशमधील नैनिताल येथून बासमती तांदळाचे ३७० वाणाचे बियाणे आणले. ते बियाणे त्यांनी त्यांच्या शेतात पेरले. त्यानंतर बासमती तांदूळ रेठऱ्याच्या मातीत रुजला. आणि या पिकाच्या सुवासाने परिसर भरून गेला.

आबासाहेब मोहिते यांच्या शेतातील बासमती तांदळाचे पीक पाहण्यास त्यावेळी आसपासचे शेतकरी येऊ लागले. त्यानंतर पुढच्याच वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी हे पीक घेण्यास सुरुवात केली. आसपासच्या गावातही या वाणाची बीजे पसरली. सध्या दर्जेदार व सुवासिक बासमती तांदूळ येथील शिवारात मातीतील विशिष्ट गुणधर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकत असून, हा तांदूळ शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना हुकमी उत्पन्नही मिळू लागले असून, गावच्या तिन्ही बाजूला असणारे कृष्णेचे पाणी या पिकासाठी पोषक ठरत आहे.

- संजय पाटील

- चौकट

... म्हणून पिकतो तांदूळ !

खरंतर तांदूळ हे समुद्र किनारपट्टीच्या भागातील पीक मानले जाते. महाराष्ट्रात कोकण भागात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मात्र, शास्त्रज्ञांच्या मते रेठरे गावच्या तिन्ही बाजूंनी वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्यातील बाष्पीभवनामुळे तांदूळ पिकासाठी लागणारी उपयुक्त आर्द्रता शिवारात सर्वत्र निर्माण होते. याचा फायदा तांदळाच्या चवीला व सुवासिकपणाला होतो.

- चौकट

घरोघरी सुगंध

रेठरे बुद्रूक गावातील अपवाद वगळता सर्वच शेतकरी बासमती तांदळाचे उत्पादन घेतात. सुगीच्या कालावधीत गावामध्ये प्रवेश केला की घराघरातून या तांदळाचा सुवास नक्की अनुभवता येतो.

- चौकट

दुकानाबाहेर पाट्या; दुबईतही सुगंध

सातारा, सांगली, कोल्हापूरसह पुणे, मुंबईच्या बाजारपेठेतही ‘रेठरा बासमती’ तांदळाला विशेष मागणी आहे. काही ठिकाणी तर दुकानाबाहेर ‘रेठरा तांदूळ मिळेल’ असे फलकच लावलेले दिसतात. दुबईपर्यंत या तांदळाचा सुगंध पोहोचला असून, तेथेही या तांदळाला चांगली मागणी आहे.

फोटो : १०संडे०१, ०२, ०३

कॅप्शन : प्रतीकात्मक