शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळच बनला रेठऱ्याचा ‘ब्रँड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST

काही गावे ऐतिहासिक स्थळे व वारसा त्याचबरोबर नावीन्यपूर्ण लौकिकामुळे सर्वदूर ओळखली जातात. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रूक गावालाही पाच ...

काही गावे ऐतिहासिक स्थळे व वारसा त्याचबरोबर नावीन्यपूर्ण लौकिकामुळे सर्वदूर ओळखली जातात. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रूक गावालाही पाच दशकांपासून ‘रेठरा बासमती’ तांदळाची नवी ओळख मिळाली आहे. ही ओळख देशभर पोहोचली असून, परदेशातही हा तांदूळ ‘ब्रँड’ ठरत आहे.

पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीकाठी रेठरे बुद्रूक गाव वसले आहे. याठिकाणी १९६१ मध्ये कृष्णा कारखाना उभा राहिला आणि हा कारखाना विभागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला. कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाकडे कल वाढला. मात्र, १९७०च्या दशकात याच साखरपट्ट्यात ऊस सोडून ‘बासमती’ भात पीक लावण्याचा प्रयोग केला गेला आणि तो यशस्वीही झाला. त्याकाळी कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते यांनी हिमाचल प्रदेशमधील नैनिताल येथून बासमती तांदळाचे ३७० वाणाचे बियाणे आणले. ते बियाणे त्यांनी त्यांच्या शेतात पेरले. त्यानंतर बासमती तांदूळ रेठऱ्याच्या मातीत रुजला. आणि या पिकाच्या सुवासाने परिसर भरून गेला.

आबासाहेब मोहिते यांच्या शेतातील बासमती तांदळाचे पीक पाहण्यास त्यावेळी आसपासचे शेतकरी येऊ लागले. त्यानंतर पुढच्याच वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी हे पीक घेण्यास सुरुवात केली. आसपासच्या गावातही या वाणाची बीजे पसरली. सध्या दर्जेदार व सुवासिक बासमती तांदूळ येथील शिवारात मातीतील विशिष्ट गुणधर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकत असून, हा तांदूळ शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना हुकमी उत्पन्नही मिळू लागले असून, गावच्या तिन्ही बाजूला असणारे कृष्णेचे पाणी या पिकासाठी पोषक ठरत आहे.

- संजय पाटील

- चौकट

... म्हणून पिकतो तांदूळ !

खरंतर तांदूळ हे समुद्र किनारपट्टीच्या भागातील पीक मानले जाते. महाराष्ट्रात कोकण भागात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मात्र, शास्त्रज्ञांच्या मते रेठरे गावच्या तिन्ही बाजूंनी वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्यातील बाष्पीभवनामुळे तांदूळ पिकासाठी लागणारी उपयुक्त आर्द्रता शिवारात सर्वत्र निर्माण होते. याचा फायदा तांदळाच्या चवीला व सुवासिकपणाला होतो.

- चौकट

घरोघरी सुगंध

रेठरे बुद्रूक गावातील अपवाद वगळता सर्वच शेतकरी बासमती तांदळाचे उत्पादन घेतात. सुगीच्या कालावधीत गावामध्ये प्रवेश केला की घराघरातून या तांदळाचा सुवास नक्की अनुभवता येतो.

- चौकट

दुकानाबाहेर पाट्या; दुबईतही सुगंध

सातारा, सांगली, कोल्हापूरसह पुणे, मुंबईच्या बाजारपेठेतही ‘रेठरा बासमती’ तांदळाला विशेष मागणी आहे. काही ठिकाणी तर दुकानाबाहेर ‘रेठरा तांदूळ मिळेल’ असे फलकच लावलेले दिसतात. दुबईपर्यंत या तांदळाचा सुगंध पोहोचला असून, तेथेही या तांदळाला चांगली मागणी आहे.

फोटो : १०संडे०१, ०२, ०३

कॅप्शन : प्रतीकात्मक