शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्याला परतीचा तडाखा, शिरवळमध्ये चोवीस तासांत ११४ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:58 IST

सातारा जिल्ह्याला परतीच्या पावसाने यंदा अक्षरश: झोडपून काढले असून, अजूनही ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. कधी नव्हे ते दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्यातही दमदार पाऊस झाल्याने नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परंतु शेतीपिकांचे प्रचंंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देखेमावती नदीला पूर, वसना नदीवरील पुलाचा भराव गेला वाहूनतीन गावांचा संपर्क तुटला, फलटण तालुक्याच्या पश्चिम भागालाही झोडपले

सातारा : सातारा जिल्ह्याला परतीच्या पावसाने यंदा अक्षरश: झोडपून काढले असून, अजूनही ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. कधी नव्हे ते दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्यातही दमदार पाऊस झाल्याने नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परंतु शेतीपिकांचे प्रचंंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.खंडाळा तालुक्यात सोमवारी सायंकाळी सात ते मंगळवारी सकाळी सात या चोवीस तासांत तब्बल ११४ तर वाठार बुद्रुक मंडलात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे लोणंदच्या खेमावती नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिरवळ येथील सटवाई कॉलनीतील मांड ओढ्यावरील पूल महिनाभरात तब्बल सात वेळा पाण्याखाली गेला आहे.खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती जलमय झाल्याने नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. खंडाळ्यासह फलटण तालुक्याच्या पश्चिम भागालाही परतीच्या पावसाने झोडपून काढले. कोरेगाव तालुक्यातील दहिगाव येथील वसना नदीवरील पुलाचा भराव वाहून गेल्याने तीन गावांचा संपर्क तुटला आहे.या पावसामुळे माण, खटाव तालुक्यांतील नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला असून, जिल्ह्यातील १ हजार ३०९ गावांतील अंदाजे ११ हजार ८०० हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.यंदा दुप्पट पाऊससातारा जिल्ह्यात यावर्षी ३१ आॅक्टोबरपर्यंत पाच महिन्यांत १ हजार ७६१ मिलिमीटर पाऊस पडलाय. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ८३४.२५ मिलिमीटर पाऊस होतो. तर आॅक्टोबरपर्यंत ९१८ मिलिमीटरपर्यंत पर्जन्यमानाची नोंद होते; पण यावर्षी तब्बल १ हजार ७०० हून अधिक मिलिमीटर पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १९१ इतकी आहे. म्हणजे जवळपास यावर्षी दुप्पट पाऊस झाला आहे.महाबळेश्वरात सर्वाधिक नोंदजिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात ३१ आॅक्टोबरअखेरपर्यंत सर्वाधिक ८ हजार १३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाची टक्केवारी ३६५ इतकी आहे. तर सातारा तालुक्यात २ हजार २४४, जावळी २ हजार ७८८, पाटण २ हजार ४६७, कºहाड १ हजार ३६३, कोरेगाव १ हजार ८०, खटाव ८६२, माण ५७५, फलटण ५८६, खंडाळा ९१२ आणि वाई तालुक्यात १ हजार २५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर