जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांसाठी १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये विविध धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे आणि धरणांचाही समावेश आहे.
पावसाळ्यात जिल्ह्यातील पर्यटनस्थळी गर्दी होत असते. या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्बंध लागू केले आहेत. अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, उरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर आणि पाचगणीतील पर्यटनस्थळे व धरणे अशा स्थळांच्या परिसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असते. यासाठी निर्बंध लागू केले आहेत. २० जूनपासूनच हा आदेश लागू झाला आहे.
असे असतील निर्बंध
- पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे यावर बंदी- धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे याला बंदी- पावसामुळे धोकादायक ठिकाणी धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी आणि चित्रीकरण करण्याला बंदी - धबधब्यांच्या परिसरात मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे याला परवानगी नाही.- वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवता येणार नाही.- सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड, असभ्य वर्तन करणाऱ्यावर कठोर कारवाई- सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा, डीजे वाजविणे यावर बंदी