शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये साडेसातशे गाड्यांची दुरुस्ती पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:41 IST

सातारा : नोकरीसाठी मुलाखत, महत्त्वाची मुलाखत किंवा पाहुण्यांकडे चांगले कपडे घालून जायचे अन् रस्त्यात पाऊस गाठतो. भलेही एसटीतून प्रवास ...

सातारा : नोकरीसाठी मुलाखत, महत्त्वाची मुलाखत किंवा पाहुण्यांकडे चांगले कपडे घालून जायचे अन् रस्त्यात पाऊस गाठतो. भलेही एसटीतून प्रवास सुरू असला तरी एसटीच्या छतातून पावसाचा थेंब टिपकायला सुरुवात होते. त्यातही गंजलेला पत्रा असला तर तांबूस डाग पांढऱ्याशुभ्र कपड्यावर पडलाच म्हणून समजा. पण हे प्रसंग यंदा फारसे अनुभवास मिळाले नाहीत. कोरोना काळात ही सर्व कामे करण्यात आली होती. राज्य परिवहन महामंडळाची एसटी ही सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी असते. हजारो नोकरदार दररोज एसटीने कामाच्या ठिकाणी ये-जा करतात. मात्र पूर्वी अनेक गाड्या गळक्या असायच्या. त्यामुळे प्रवास करणं डोकेदुखी वाटत असायची. हे चित्र दरवर्षीच अनुभवास मिळत असायचे. मात्र सातारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट साधारणत: फेब्रुवारीत आली आणि मार्चपासून एसटी पुन्हा बंद करावी लागली. मात्र एसटी आगार, कार्यशाळेतील कर्मचारी येतच होते. त्यांच्या ठरलेल्या वार्षिक नियोजनानुसार सर्व कामे सुरू होती. गाड्या आगारातच असल्याने या काळात सर्व डागडुजी करण्यात आली आहे.

एकही गाडी गळकी नाही

सातारा विभागात साडेसातशे एसटी गाड्या आहेत. सर्व गाड्यांची दुरुस्ती, डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणती गाडी गळकी असल्याची अजूनही एकही तक्रार आलेली नाही.

- सुहास भोसले, विभागीय यंत्र अभियंता, चालन

कोट :

एसटीतील अधिकारी कितीही एसटी सुस्थितीत असल्याचे सांगत असले तरी ग्रामीण भागात येणाऱ्या गाड्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. अनेक गाड्या गळत असतात. हेडलाइटच लागत नाही. तर काहींचे वायफर नादुरुस्त असतात.

- सागर माने, सातारा

कोट :

एसटीतील जुन्या बनावटीच्या पत्र्याच्या गाड्या गळक्या होता. आता आलेल्या गाड्यांमध्ये ही समस्या दिसत नाही. त्यामुळे अशाच गाड्या रस्त्यावर आणल्या तर समस्या भेडसावणार नाही.

- विलास साबळे, सातारा

चौकट

आसनावरील कुशनची मात्र वाट लागली

लॉकडाऊन काळात एसटी गाड्या एकाच ठिकाणी उभ्या होत्या. या काळात कारागिरांनी भलेही यांत्रिक कामे नियमित केले. गाड्या सुरू करणे, एखादी फेरी मारून पुन्हा लावल्या आहेत. त्यामुळे यांत्रिक बिघाड जाणवले नाहीत.

आतील भागांचा वापरच न झाल्याने आसनांची, कुशनची मोठ्या प्रमाणावर नादुरुस्ती झाली आहे. अनेक गाड्यांचे सीट फाटले आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत.

अनेक शिवशाही गाड्यांचे दरवाजे उघडे होते. त्यामुळे कोणीही येऊन बसत असायचे. त्यामुळे अनेकदा पडदेही चोरीला गेले आहेत. त्यामुळे आगीची घटना घडल्यानंतर हे प्रमाण कमी आले आहे.