शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

रिलायन्सचा ठेका काढून घ्या !-- गिरीश बापट -सातारा-पुणे हायवेचे तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:53 PM

सातारा/पुणे : ‘पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलिस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊनही

ठळक मुद्दे: राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीच्या बैठकीत सूचना एमएसईबीच्या डीपी स्थलांतरित करण्याबाबत निर्णय झालेला नसल्याने या पुलाचा सांगाडा ऊन, वारा, पाऊस झेलत उभा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/पुणे : ‘पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलिस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊनही या रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. या रस्त्याचे उर्वरित काम तत्काळ सुरू न केल्यास हे काम रिलायन्स इन्फ्राकडून काढून घ्यावे,’ अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, महावितरणचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एस. डी. चिटणीस आदी प्रशासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी विविध विभागांशी समन्वय साधत त्वरित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना बापट यांनी प्रशासकीय अधिकाºयांना दिल्या. रस्त्यांच्या कामाला गती प्राप्त होण्यासाठी या कामांचे टप्पे करून सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी सांगितले.प्रस्तावित बीआरटी मार्ग पिंपरी-चिंचवड महापालिकेने काढून टाकल्याने काम सुरू करण्यात अडथळा येणार नाही. चांदणी चौक ते ताम्हिणी घाट रस्त्याच्या भूसंपादनाच्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यातआला.

तळेगाव चाकण-शिक्रापूर नावरा चौफुला या रस्त्यावरून शहरात येणारी अवजड वाहतूक वळवता येऊ शकते. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकर सुरू करावे, असे नमूद करून या रस्त्याची स्वत: प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.१५ दिवसांनी घेणार आढावा...ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामाचा बापट यांनी आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत दर १५ दिवसांनी आढावा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील रस्त्याच्या प्रलंबित कामाबाबत जबाबदारी निश्चित करून काम जलद गतीने काम पूर्ण होईल, याचे नियोजन करावे, असेही बापट यांनी सांगितले.साताºयाच्या अर्धवट उड्डाणपुलाचे गजही गंजू लागले...आशियाई ४३ म्हणून नावारूपाला आलेल्या पुणे-बेंगलोर महामार्ग समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. मुदत संपून देखील अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. महामार्गावरील समस्यांमुळे १ हजार २०० च्यावर लोकांचा मृत्यू झाला आहे. आॅक्टोबर २०१० पासून या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. कामाची मुदत २०१३ साली संपली आहे. तरीही काम सुरू आहे. अनेक ठिकाणी जमीन संपादनाची कामेही केली गेली नाहीत. सातारा-लोणंद रस्ता वाढे फाटा येथून छेदून पुढे जातो, त्याच ठिकाणी वाहनांची कोंडी होत असते. अपघाताचे प्रमाण या ठिकाणी मोठे असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी होती. एमएसईबीच्या डीपी स्थलांतरित करण्याबाबत निर्णय झालेला नसल्याने या पुलाचा सांगाडा ऊन, वारा, पाऊस झेलत उभा आहे. याचे गजही गंजू लागले आहेत. ‘लोकमत’ने याबाबत आवाज उठविल्यानंतर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी हे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधितांना केले, पण कारवाई झालेली नाही.