शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेल मागणी कमी; दर स्थिर, पालेभाज्या उतरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 15:03 IST

CoronaVirus vegetable Satara : कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊन असल्याने खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर स्थिर राहिला आहे. मात्र, दुसरीकडे पालेभाज्यांचा भाव उतरला असून वाटाण्याचाच फक्त दर वाढला आहे. सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला ८ ते १० हजारांपर्यंत भाव मिळत आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देखाद्यतेल मागणी कमी; दर स्थिर, पालेभाज्या उतरल्या वाटाण्याला क्विंटलला १० हजारांपर्यंत भाव

सातारा : कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊन असल्याने खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर स्थिर राहिला आहे. मात्र, दुसरीकडे पालेभाज्यांचा भाव उतरला असून वाटाण्याचाच फक्त दर वाढला आहे. सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला ८ ते १० हजारांपर्यंत भाव मिळत आहे.सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक राहतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही माल येत असतो. मात्र, कोरोना लॉकडाऊन असल्याने मागील काही दिवसांत आवक कमी झालेली आहे.

सातारा बाजार समितीत रविवारी ६७४ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १८३, बटाटा १७८, लसूण १२ आणि आल्याची ४ क्विंटल आवक राहिली. आंबा, खरबूज, कलिंगड यांचीही आवक झाली.सोयाबीन तेल डबा २४००मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. सध्या लॉकडाऊन असून दर स्थिर असलातरी सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहेच. सूर्यफूल तेल डबा २५५० ते २६०० पर्यंत मिळत आहे. शेंगतेल डबा २७०० ते २८००, सोयाबीनचा २४०० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर पामतेल डबा २१०० रुपयांपर्यंत आहे.आंब्याची आवक वाढलीसातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, खरबूज आवक होत आहे. रविवारी आंब्याची सर्वाधिक ४२ क्विंटलची आवक झाली. तर कलिंगडाची आवक थोडी झाली.मिरचीला दर...सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ८० ते १००, फ्लॉवर १०० ते १५०, दोडका २०० ते २५०, मिरचीला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. मंडई बंद आहेत. त्यामुळे घरासमोर विक्रेते येतात. त्यांच्याकडून खरेदी करतो. दर अधिक असतो. तसेच सर्व भाज्या मिळत नाहीत.- रामचंद्र काळे, ग्राहक

मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. दरात तेजी असल्याने सोयाबीन तेलाला मागणी आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. दर स्थिर राहिले आहेत.- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी कमीच आहे. बाजार समितीतही शेतमालाला दर कमी आहे. काही शेतमाल तर विक्रीअभावी कुजून जाऊ लागलाय.- प्रकाश पाटील, शेतकरी

 

टॅग्स :MarketबाजारSatara areaसातारा परिसरvegetableभाज्या