शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठी लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर : झाडांची सर्रास कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:07 IST

दीपक पवार ।तांबवे : कोयना नदीकाठावर होणारे लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर उठले आहे. ठेकेदार मातीचे उत्खनन करताना अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे मुळासह उपटून काढत असल्यामुळे अनेक वृक्ष नष्ट होत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. तसेच लाल मातीच्या बेकायदा उत्खननावरही महसुल विभागाचा अंकुश राहिला नसल्याचे चित्र आहे.पर्यावरणाचा समतोल राहावा, ºहास ...

ठळक मुद्देअनेक वृक्ष मुळासह उखडले; ठेकेदाराचा मनमानी कारभार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

दीपक पवार ।तांबवे : कोयना नदीकाठावर होणारे लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर उठले आहे. ठेकेदार मातीचे उत्खनन करताना अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे मुळासह उपटून काढत असल्यामुळे अनेक वृक्ष नष्ट होत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. तसेच लाल मातीच्या बेकायदा उत्खननावरही महसुल विभागाचा अंकुश राहिला नसल्याचे चित्र आहे.

पर्यावरणाचा समतोल राहावा, ºहास होऊ नये, यासाठी शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत आहे. ‘एक मूल, एक झाड’ असेही समीकरण शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. गावोगावी शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत, वनविभाग यांच्या माध्यमातून झाडे लावली जात आहेत. मात्र, कोयना नदीकाठे लाल मातीसाठी झाडे मुळासकट उपटून टाकली जात आहेत. याकडे महसूल विभाग, वन विभागाने लक्ष दिले पाहिजे; पण असे न होता माती उपसा करणाºया ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार येथे होताना दिसत आहे. ठेकेदार जेसीबीने झाडे पाडत आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल सध्या ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

म्होप्रे, साकुर्डी, वसंतगड, तांबवे, सुपने, केसे, वारूंजी आदी गावातील कोयना नदीच्या काठावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. तसेच लाल मातीचे प्रमाणही जास्त आहे. यापैकी काही ठिकाणी माती उपशास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात परवान्यापेक्षा कित्तेक पट जास्त माती उत्खनन याठिकाणी होत आहे. माती उत्खननाबरोबरच जी झाडे माती उपसा करताना अडचण ठरत आहेत, ती झाडे कोणाच्याही परवानगीशिवाय हटवली जात आहेत. हे करताना ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ हे धोरण अवलंबले जात आहे. एकूणच माती उत्खननात सर्व काही अलबेल असल्याचे दिसून येत आहे.

नदीच्या काठावर झाडामुळे मातीचे संचयन होऊन सुपीक जमीन तयार होते. तसेच नदीचा काठ सुरक्षित राहतो. पक्ष्यांना आश्रयस्थान मिळते. मात्र, तीच झाडे तोडली जात असल्याने नदीचे काठ तुटणार असून, पात्र मोठे होणार आहे. पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट होणार आहे. नदीपासून केवळ ५० मीटर अंतरावर हे उत्खनन सुरू आहे. मातीचे ठेकेदार हा उद्योग करीत आहेत. येत्या पावसाळ्यात याचे गंभीर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.तोडलेल्या झाडांची परस्पर विल्हेवाटसाकुर्डी येथे सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराने अनेक झाडे मुळासकट उपटली आहेत. तर काही झाडे बुंध्यापासून तोडण्यात आली आहेत. या वृक्षांचीही परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. झाडे तोडण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार