शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

रत्नागिरी : आंबेनळी अपघातातील त्या मृतांचे साहित्य नातेवाईकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 3:05 PM

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देआंबेनळी अपघातातील त्या मृतांचे साहित्य नातेवाईकांना परतसाहित्य घेताना अनेकांचे अश्रू दाटले, दापोली कृषी विद्यापीठात उपस्थिती

दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.मोबाईल, बॅग, घड्याळ, एटीएम कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आढळली होती. पंचनाम्यादरम्यान वस्तूंची ओळख पटवून त्यांची यादी तयार करण्यात आली होती. ही यादी पूर्ण झाल्यानंतर गुरुवार, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी मृत कर्मचाऱ्यांचे साहित्य, पंचनामे, शवविच्छेदन अहवालाची प्रत नातेवाईकांना देण्यात आली.तपासिक अंमलदार पवार दापोलीत आले होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय इमारतीत मृतांच्या पत्नी व नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. काही पालक विद्यापीठात पोहोचू शकली नाहीत. अशा कर्मचाºयांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन वस्तू देण्यात आल्या आहेत. काही मोबाईलच्या माध्यमातून या अपघाताचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.अपघातस्थळावरून सापडलेल्या काही वस्तू नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. परंतु, सोन्याचे काही दागिने गायब झाले असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या वस्तूंचाही शोध सुरू आहे. नेमका अपघात कशामुळे झाला व गाडी कोण चालवत होते. याचे गूढ कायम असून, याबाबत तपास सुरु आहे.वस्तू पाहताच आठवणी दाटल्याकर्मचाऱ्यांचे साहित्य घेताना अनेकांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण जवळच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. त्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीने जड अंत:करणाने घटनास्थळी सापडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. परंतु, या वस्तूमुळे आठवणी ताज्या होऊन अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.घड्याळांची टिक टिक थांबली...घड्याळांची टिक टिक ११ वाजून १७ मिनिटांनी किंवा ११ वाजून १६ मिनिटांनीच बंद पडल्याचे तपासादरम्याने सापडलेल्या घड्याळांवरून दिसत आहे. तपासादरम्याने सापडलेली ही घड्याळे सव्वा अकरानंतर बंद पडल्यामुळे अपघात अंदाजे ११ वाजल्यानंतर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.अजूनही दु:खाचे सावट कायमआंबेनळी दुर्घटनेला २१ दिवस उलटून गेले असून, मृत कर्मचाऱ्यांची कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेली नाहीत. दापोलीवर अजूनही दु:खाचे सावट असून, या धक्क्यातून ना विद्यापीठ सावरले ना दापोलीकर! परंतु, दापोलीकरांप्रमाणेच विद्यापीठानेही मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीDapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणे