शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ऊन्हामुळे रसवंती गृह फुलली

By admin | Updated: March 25, 2017 17:14 IST

तडाखा वाढला : ज्युस, ऊसाचा रस, थंड पेयांना मागणी

आॅनलाईन लोकमत

ओगलेवाडी, दि. २५ : मार्च महिन्यातच सुर्यनारायण कोपला असल्याने वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाच्या तडाक्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने अशात कानावर रसवंतीगृह व गुऱ्हाळावरील घुंगराचा आवाज पडला की, थंडगार ऊसाचा रस पिण्यासाठी प्रवाशी व नागरिकाची पावले आपोआप वळू लागले आहेत.

फेबु्रवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळा ऋतूचे असतात. या चार महिन्यात सुयार्ची उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. सध्या तर मार्च महिन्यातच उष्णतेने तीस अंश सेल्सीअसचा टप्पा ओलांडला आहे. अशा या उष्म्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे.

उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शितपेयांना खूप मागणी असते.ं यामध्ये जास्तकरून ऊसाचा रस व नारळपाणीही पिले जाते. लिंबू, आलेयुक्त ऊसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला फे्र श आणि ताजेतवाणे करीत असतो. वषार्नुवर्षे भारतीयांच्या आवडीचे असणारे हे पेय आजही लोक मोठ्या आवडीने पीत असतात.

या गुऱ्हाळघरांचे वैशिष्टे म्हणजे घुंगराचा मधूर आवाज. गुऱ्हाळाच्या चाकांना लावलेल्या घुंगराच्या मधूर आवाजाने जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. आणि आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देते. दूरवरून येणारा आवाज ओळखूनच माणूस आता रस्त घेवूया, असे ठरवत रसवंतीगृहाकडे मोर्चा वळवतो.

विविध कंपन्यांचे शीतपेय हे शरीराला हानी पोहचविणारे असतात. त्यामुळे सध्या अनेक लोक या शितपेयांपासूर दूर राहत आहेत. तसेच या शीतपेयांतील घटकांपासून वजन वाढण्याचाही धोका असल्याने आरोग्याबाबत चोखवळ असलेली आजची तरूणाई या पेयांना नापसंती दर्शवत आहे. तर भारतीय लिंबू सरबत आणि ऊसाचा ताजा रसाला अधिक पसंती दाखवत आहेत. त्यामुळेच घुंगराच्या आवाजाकडे लहानथोर सर्वांचीच पावले आपोआपच वळताना दिसत आहेत.रस चांगला मात्र, बफार्चे काय?रसवंती गृहावर मिळणारा रस हा सकस आणि आरोग्यवर्धक असतो. मात्र, हा रस थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बफार्बाबत अनेकांच्या मनात शंका असते. तसेच हा बर्फ फोडण्यासाठी वापरली जाणारी पिशवी आणि हा बर्फ साठवून ठेवण्याची पद्धत ही वेगळीच असते. गोणपटामध्ये ठेवण्यात आलेला बर्फ खाण्यासाठी योग्य असेलच असे नाही. याबाबत मात्र, खात्री देता येत नाही.