शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

इमारतींना रेनकोट गवताचे । महाबळेश्वरमधील अती पावसापासून रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 19:15 IST

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग

ठळक मुद्दे झड्या लावण्यास प्रारंभ

अजित जाधव ।महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग महाबळेश्वरमधील शासकीय इमारती, घरं तरी कसं सुटतील. मुसळधार पावसापासून इमारतींना वाचविण्यासाठी गवतांपासून झड्या लावल्या जातात. हे त्यांचे रेनकोट. झड्या लावण्याच्या कामांनी सध्या वेग घेतला आहे.

पावसाची संततधार, दाट धुके व पावसाळी गारठा हे पावसाळी हंगामाचे खास वैशिष्ठ आहे. या वातावरणापासून इमारतीचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक महाबळेश्वरवासीयांना काहीना काही तरी काळजी घ्यावीच लागते.सध्या त्याच गडबडीत महाबळेश्वरचे नागरिक आहेत. काही इमारतींना पारंपरिक गवताच्या झड्या म्हणजेच झडपा लावल्या जातात. काही इमारतींना विविध रंगाचे प्लास्टिक कागद लावून त्या संरक्षित केले. काहींना पत्राच्या झडपा लावल्याचे दिसत आहे.

पावसाळी वातावरणापासून इमारतीचे संरक्षण व्हावे, याासाठी गवताच्या झड्या वापरण्याची येथील फार जुनी व खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक उपाययोजना आहे. येथील बहुतेक ठिकाणी झड्याच वापरात यायची. या झड्या विशिष्ट पद्धतीने बनविल्या जातात. या बनविताना कारवीच्या काठ्या किंवा बाबू यांचे दोन तट्टे व त्यामध्ये दोन प्रकारचे गवत वापरले जाते. झडीच्या वरचे आवरण लांब-लांब कोळंब जातीच्या नळीसारख्या गवतांचे बनविलेले असते. इमारतीच्या भिंतीवर पडलेले पाणी जमिनीपर्यंत वाहून नेण्याचे काम हे आवरण करते. यामुळे पावसाळी थंडीपासून भिंतींचे रक्षण केले जाते.

गवताच्या पारंपरिक झड्यामुळे पावसाळ्यात धो-धो पाऊस पडूनही इमारतींच्या भिंतीपर्यंत पाणी व थंडही पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे भिंती सुकलेल्या व उबदार राहतात. यामुळे त्याचे रक्षणही होत असे. तसेच या झड्यांसाठी लागणारे सर्व साधनसामुग्री याच परिसरातील जंगलातच उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर करणेही कमी खर्चिक आहे. पाण्याने कुजलेले गवत गुरांच्या गोट्यात गुरांना बसण्यासाठी वापरता येते. नंतर ते शेतात खत म्हणून वापरले जाते. तसेच झड्याच्या निकामी झालेल्या काठ्या पावसानंतर जळण म्हणून नागरिक वापरतात.जून महिनाअखेर ठरणार अग्निपरीक्षाइमारतींना लावल्या जाणाºया झड्या खºया अर्थाने पर्यावरणपूरक आहे. झड्या बनविण्यासाठी खूप मेहनत आहे. गवत, काठ्या जंगलातून आणण्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. पूर्वीपेक्षा अलीकडे दिवसेंदिवस या गोष्टी किचकट व खर्चिक होऊ लागल्या आहेत. नव्या पिढीची बदलती मानसिकता, त्याच्यात कष्ट करण्याची पूर्वीच्या लोकांइतकी क्षमताही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान