शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

इमारतींना रेनकोट गवताचे । महाबळेश्वरमधील अती पावसापासून रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 19:15 IST

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग

ठळक मुद्दे झड्या लावण्यास प्रारंभ

अजित जाधव ।महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग महाबळेश्वरमधील शासकीय इमारती, घरं तरी कसं सुटतील. मुसळधार पावसापासून इमारतींना वाचविण्यासाठी गवतांपासून झड्या लावल्या जातात. हे त्यांचे रेनकोट. झड्या लावण्याच्या कामांनी सध्या वेग घेतला आहे.

पावसाची संततधार, दाट धुके व पावसाळी गारठा हे पावसाळी हंगामाचे खास वैशिष्ठ आहे. या वातावरणापासून इमारतीचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक महाबळेश्वरवासीयांना काहीना काही तरी काळजी घ्यावीच लागते.सध्या त्याच गडबडीत महाबळेश्वरचे नागरिक आहेत. काही इमारतींना पारंपरिक गवताच्या झड्या म्हणजेच झडपा लावल्या जातात. काही इमारतींना विविध रंगाचे प्लास्टिक कागद लावून त्या संरक्षित केले. काहींना पत्राच्या झडपा लावल्याचे दिसत आहे.

पावसाळी वातावरणापासून इमारतीचे संरक्षण व्हावे, याासाठी गवताच्या झड्या वापरण्याची येथील फार जुनी व खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक उपाययोजना आहे. येथील बहुतेक ठिकाणी झड्याच वापरात यायची. या झड्या विशिष्ट पद्धतीने बनविल्या जातात. या बनविताना कारवीच्या काठ्या किंवा बाबू यांचे दोन तट्टे व त्यामध्ये दोन प्रकारचे गवत वापरले जाते. झडीच्या वरचे आवरण लांब-लांब कोळंब जातीच्या नळीसारख्या गवतांचे बनविलेले असते. इमारतीच्या भिंतीवर पडलेले पाणी जमिनीपर्यंत वाहून नेण्याचे काम हे आवरण करते. यामुळे पावसाळी थंडीपासून भिंतींचे रक्षण केले जाते.

गवताच्या पारंपरिक झड्यामुळे पावसाळ्यात धो-धो पाऊस पडूनही इमारतींच्या भिंतीपर्यंत पाणी व थंडही पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे भिंती सुकलेल्या व उबदार राहतात. यामुळे त्याचे रक्षणही होत असे. तसेच या झड्यांसाठी लागणारे सर्व साधनसामुग्री याच परिसरातील जंगलातच उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर करणेही कमी खर्चिक आहे. पाण्याने कुजलेले गवत गुरांच्या गोट्यात गुरांना बसण्यासाठी वापरता येते. नंतर ते शेतात खत म्हणून वापरले जाते. तसेच झड्याच्या निकामी झालेल्या काठ्या पावसानंतर जळण म्हणून नागरिक वापरतात.जून महिनाअखेर ठरणार अग्निपरीक्षाइमारतींना लावल्या जाणाºया झड्या खºया अर्थाने पर्यावरणपूरक आहे. झड्या बनविण्यासाठी खूप मेहनत आहे. गवत, काठ्या जंगलातून आणण्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. पूर्वीपेक्षा अलीकडे दिवसेंदिवस या गोष्टी किचकट व खर्चिक होऊ लागल्या आहेत. नव्या पिढीची बदलती मानसिकता, त्याच्यात कष्ट करण्याची पूर्वीच्या लोकांइतकी क्षमताही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान