शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

इमारतींना रेनकोट गवताचे । महाबळेश्वरमधील अती पावसापासून रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 19:15 IST

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग

ठळक मुद्दे झड्या लावण्यास प्रारंभ

अजित जाधव ।महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग महाबळेश्वरमधील शासकीय इमारती, घरं तरी कसं सुटतील. मुसळधार पावसापासून इमारतींना वाचविण्यासाठी गवतांपासून झड्या लावल्या जातात. हे त्यांचे रेनकोट. झड्या लावण्याच्या कामांनी सध्या वेग घेतला आहे.

पावसाची संततधार, दाट धुके व पावसाळी गारठा हे पावसाळी हंगामाचे खास वैशिष्ठ आहे. या वातावरणापासून इमारतीचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक महाबळेश्वरवासीयांना काहीना काही तरी काळजी घ्यावीच लागते.सध्या त्याच गडबडीत महाबळेश्वरचे नागरिक आहेत. काही इमारतींना पारंपरिक गवताच्या झड्या म्हणजेच झडपा लावल्या जातात. काही इमारतींना विविध रंगाचे प्लास्टिक कागद लावून त्या संरक्षित केले. काहींना पत्राच्या झडपा लावल्याचे दिसत आहे.

पावसाळी वातावरणापासून इमारतीचे संरक्षण व्हावे, याासाठी गवताच्या झड्या वापरण्याची येथील फार जुनी व खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक उपाययोजना आहे. येथील बहुतेक ठिकाणी झड्याच वापरात यायची. या झड्या विशिष्ट पद्धतीने बनविल्या जातात. या बनविताना कारवीच्या काठ्या किंवा बाबू यांचे दोन तट्टे व त्यामध्ये दोन प्रकारचे गवत वापरले जाते. झडीच्या वरचे आवरण लांब-लांब कोळंब जातीच्या नळीसारख्या गवतांचे बनविलेले असते. इमारतीच्या भिंतीवर पडलेले पाणी जमिनीपर्यंत वाहून नेण्याचे काम हे आवरण करते. यामुळे पावसाळी थंडीपासून भिंतींचे रक्षण केले जाते.

गवताच्या पारंपरिक झड्यामुळे पावसाळ्यात धो-धो पाऊस पडूनही इमारतींच्या भिंतीपर्यंत पाणी व थंडही पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे भिंती सुकलेल्या व उबदार राहतात. यामुळे त्याचे रक्षणही होत असे. तसेच या झड्यांसाठी लागणारे सर्व साधनसामुग्री याच परिसरातील जंगलातच उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर करणेही कमी खर्चिक आहे. पाण्याने कुजलेले गवत गुरांच्या गोट्यात गुरांना बसण्यासाठी वापरता येते. नंतर ते शेतात खत म्हणून वापरले जाते. तसेच झड्याच्या निकामी झालेल्या काठ्या पावसानंतर जळण म्हणून नागरिक वापरतात.जून महिनाअखेर ठरणार अग्निपरीक्षाइमारतींना लावल्या जाणाºया झड्या खºया अर्थाने पर्यावरणपूरक आहे. झड्या बनविण्यासाठी खूप मेहनत आहे. गवत, काठ्या जंगलातून आणण्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. पूर्वीपेक्षा अलीकडे दिवसेंदिवस या गोष्टी किचकट व खर्चिक होऊ लागल्या आहेत. नव्या पिढीची बदलती मानसिकता, त्याच्यात कष्ट करण्याची पूर्वीच्या लोकांइतकी क्षमताही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान