शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात ‘आयटीआय’साठी अर्जांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST

कमी खर्चातील शिक्षण : नोकरीची हमी असल्याने ग्रामीण भागातून वाढतेय मागणी प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आर्थिक ...

कमी खर्चातील शिक्षण : नोकरीची हमी असल्याने ग्रामीण भागातून वाढतेय मागणी

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : आर्थिक विवंचनेतून तातडीने बाहेर पडून सक्षम होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी अजूनही आयटीआय अभ्यासक्रम नोकरीदायी आहे. दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण करून खात्रीशीर नोकरी मिळवून देणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी यंदाही जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. ३ हजार ९०० जागांसाठी तब्बल ६४६६ अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशासाठी अर्ज करायला अद्याप आठ दिवस असल्याने ही यादी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात आयटीआयचे ११ शासकीय आणि ७ खासगी प्रशिक्षण केंद्र आहेत. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीही येथे प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज करतात. शासकीय प्रशिक्षण केंद्रात अडीच हजार रुपयांमध्ये वर्षभराचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये पदवी संपादन करून हाताला काम मिळत असल्याने ग्रामीण भागातून याला सर्वाधिक मागणी आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आयटीआय प्रवेशासाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. प्रवेशाच्या विविध फेऱ्यांच्या माध्यमातून यंदाही प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील शासकीय आयटीआय :

शासकीय प्रवेश क्षमता : ३२३६

खासगी आयटीआय : ६६४

एकूण प्रवेश क्षमता : ३९००

आत्तापर्यंत आलेले अर्ज : ६४६६

तालुकानिहाय शासकीय प्रवेश क्षमता

सातारा : ८७६

कऱ्हाड : ९००

लोणंद : २९२

वाई : २१२

महाबळेश्वर : १०८

मेढा : १५२

दहिवडी : १०८

फलटण : १०४

खटाव : १४४

कोरेगाव : १९२

पाटण : १४८

खासगी प्रवेश क्षमता

कऱ्हाड : १८४

सातारा : ८०

पाटण : २१२

ढेबेवाडी : १००

सोमंथळी : ८८

गतवर्षीइतकाच प्रतिसाद

आयटीआय केल्यानंतर विविध कारखान्यांमध्ये नोकरीची खात्रीशीर संधी असल्याचे गणित विद्यार्थ्यांच्या डोक्यात पक्के असल्यामुळे यंदाही गतवर्षीइतकेच प्रवेश झाले आहेत. कमी कालावधीत हाताला काम देऊन कुटुंब स्थिर करण्याचा हमखास मार्ग म्हणूनही विद्यार्थ्यांनी याकडे जाण्याचा कल दर्शविला आहे.

यामुळे टिकून आहे सातत्य...!

कोविडमध्ये अनेकांच्या हातचे काम गेले, तर कोणाला पगार कपातीला सामोरे जावे लागले. या दोन्ही परिस्थितीत हातात कला असणाऱ्यांना मात्र कुठेही अडचण आली नाही, हे सत्य अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेण्याकडे कल ठेवला आहे.

कोट :

व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी अद्यापही ग्रामीण भागातील मुलांचा ओढा सर्वाधिक आहे. दोन वर्षे शिक्षणानंतर तातडीने हाताला काम देणारे शिक्षण म्हणून याला सर्वाधिक मागणी आहे. यंदाही प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा अधिकचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले आहेत.

- सचिन धुमाळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सातारा

पाच हजार रुपयांत शिक्षण आणि तातडीने हाताला रोजगार मिळवून देणारे शिक्षण म्हणजे आयटीआय. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आम्ही स्वावलंबी बनण्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागत नाही. त्यामुळे हा अभ्यासक्रम निवडण्याचे ठरवले.

- भरत मर्ढेकर, विद्यार्थी